शहरं
Join us  
Trending Stories
1
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
2
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
3
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
4
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
5
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
6
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
7
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
8
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
9
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
10
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण
11
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
12
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?
13
जिंकलंस मित्रा! वकील बनून लढला स्वत:च्या किडनॅपिंगची केस, १७ वर्षांनंतर ८ गुन्हेगारांना शिक्षा
14
ENG vs AUS : WHAT A BALL! स्टीव्ह स्मिथ 'क्लिन बोल्ड', ऑस्ट्रेलियन दिग्गजाचाही विश्वास बसेना
15
"म्यानमारमधून ९०० कुकी अतिरेकी मणिपूरमध्ये घुसले", सुरक्षा सल्लागारांनी दिला दुजोरा, चिंता वाढली
16
58 कर्मचाऱ्यांशी शारीरिक संबंध अन्...! कोण आहे चीनची ही 'सुंदर गव्हर्नर'? ठोठावण्यात आली 13 वर्षांची शिक्षा
17
“ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र मविआत नाही”; संजय राऊत स्पष्टच बोलले
18
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
19
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
20
भारतात WANTED असलेला फरार इस्लामिक धर्मगुरू झाकिर नाईक पाकिस्तानात 'पाहुणा'

पठाणकोट हल्ल्यामुळे चर्चेला खीळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2016 3:27 AM

पठाणकोट येथील हल्ल्याने भारत-पाकिस्तान यांच्यातील शांतता चर्चेवर विपरीत परिणाम झाल्याची कबुली पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी शनिवारी दिली. शरीफ यांचे

इस्लामाबाद : पठाणकोट येथील हल्ल्याने भारत-पाकिस्तान यांच्यातील शांतता चर्चेवर विपरीत परिणाम झाल्याची कबुली पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी शनिवारी दिली. शरीफ यांचे हे वक्तव्य पाकिस्तानी लष्कराला आणि त्यातही लष्करप्रमुख राहील शरीफ यांना संदेश म्हणून मानले जात आहे. भारत-पाकिस्तान यांच्यात शांतता चर्चा व्हावी यासाठी नवाज शरीफ प्रयत्नशील होते; पण लष्कर अशा चर्चेला अनुकूल नव्हते. त्याचवेळी पठाणकोट हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराच्या भूमिकेचा इन्कारही केला जात नाही.पठाणकोट हल्ल्यावर प्रतिक्रिया देताना नवाज शरीफ म्हणाले की, भारतासोबत चर्चेची प्रक्रिया पुढे मार्गक्रमण करीत होती; पण पठाणकोट हल्ल्याने त्यावर परिणाम झाला. या हल्ल्यामागील सूत्रधार आणि जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मौलाना मसूद अजहर याच्याविरुद्ध ठोस कारवाई करण्याची मागणी भारत करीत आहे. या पार्श्वभूमीवर शरीफ यांचे हे वक्तव्य आले आहे.पठाणकोट हल्ल्यामागे मसूदच्या असलेल्या भूमिकेचा पुरावा भारताने पाकिस्तानला दिला आहे; पण तीन आठवडे होऊनही पाकिस्तानने अद्याप ठोस कारवाई केलेली नाही. त्यामुळे दोन्ही देशांतील विदेश सचिवांची चर्चाही लटकली आहे. पाकिस्तानने ठोस कारवाई केल्यानंतरच चर्चा सुरू केल्याचे संकेत भारत सरकारने दिले आहेत. लाहोर येथे पत्रकारांशी बोलताना शरीफ पुढे म्हणाले की, पठाणकोट हल्ल्याची चौकशी लवकरच पूर्ण होईल. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आकस्मिकरीत्या पाकिस्तानला भेट दिल्यानंतर उभय देशांतील संबंध योग्य दिशेने जात होते; पण पठाणकोट हल्ल्याने ही प्रक्रिया थांबली. परंतु आता दहशतवादी पराभूत झाले असून, ते निराश झाले आहेत. आपली उपस्थिती दाखविण्यासाठीच ते अशा घटना घडवून आणत आहेत. भारतासोबत चर्चेची प्रक्रिया पुढे मार्गक्रमण करीत होती; पण पठाणकोट हल्ल्याने त्यावर परिणाम झाला. पठाणकोट हल्ल्यासाठी आमच्या जमिनीचा वापर करण्यात आला काय? हे शोधून काढण्याची आमची जबाबदारी आहे. आम्ही ते काम करू .- नवाज शरीफ