शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

कॅनडाचे पुन्हा भारतावर गंभीर आरोप! परराष्ट्र मंत्रालयाने दिले चोख प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2024 19:39 IST

गेल्या वर्षी कॅनडाने भारतावर गंभीर आरोप केले.

गेल्या वर्षी कॅनडाने भारतावर गंभीर आरोप केले. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरची हत्या भारत सरकारच्या इशाऱ्यावर करण्यात आली असल्याचा आरोप केला होता. यानंतर दोन्ही देशांकडून आरोप-प्रत्यारोप झाले होते. आता दोन्ही देशांमधील संबंध सुधारताना दिसत असतानाच कॅनडाने पुन्हा एकदा भारतावर नवा आरोप केला आहे. त्यांच्या देशात सुरू असलेल्या निवडणुकांमध्ये भारत हस्तक्षेप करत असल्याचा आरोप कॅनडा सरकारकडून करण्यात आला होता. यावर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाकडूनही तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली आहे.

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी हे आरोप फेटाळून लावले आणि ते निराधार असल्याचे म्हटले. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले,'परकीय हस्तक्षेपाची चौकशी करणाऱ्या कॅनेडियन कमिशनचे मीडिया रिपोर्ट्स आम्ही पाहिले आहेत. कॅनडाच्या निवडणुकीत भारताच्या हस्तक्षेपाचे असे निराधार आरोप आम्ही ठामपणे नाकारतो, इतर देशांच्या लोकशाही प्रक्रियेत हस्तक्षेप करणे हे भारत सरकारचे धोरण नाही.

पाकिस्तान: मतदान सुरु असतानाच दहशतवादी हल्ला, निवडणूक कर्तव्यावर असलेले ४ पोलीस ठार

रणधीर जैस्वाल म्हणाले, 'येथे परिस्थिती उलट आहे. किंबहुना, याच्या अगदी उलट, कॅनडा आपल्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करत आहे. आम्ही त्यांच्यासोबत हा मुद्दा नियमितपणे मांडत आहोत आणि आम्ही कॅनडाला आमच्या मुख्य चिंता दूर करण्यासाठी प्रभावी पावले उचलण्यास सांगत आहोत.

कॅनेडियन सिक्युरिटी इंटेलिजेंस सर्व्हिस, देशाची सर्वोच्च विदेशी गुप्तचर संस्था, नुकत्याच एका अहवालात आरोप केला आहे की, भारत देशाच्या निवडणुकीत संभाव्य हस्तक्षेप करत आहे. अहवालात भारताला “परकीय हस्तक्षेपाचा धोका” असे वर्णन केले आहे आणि “कॅनडाच्या मजबूत लोकशाही संस्था आणि प्रक्रियांचे रक्षण करण्यासाठी” सरकारने आणखी काही करण्याचे निर्देश दिले आहेत. चीन आणि रशिया हे इतर दोन देश आहेत ज्यांना कॅनडाच्या राजकारणात हस्तक्षेप केल्याच्या आरोपांचा सामना करावा लागत आहे.

टॅग्स :Canadaकॅनडा