शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

भारतीय हद्दीत घुसखोरी करणाऱ्या चिनी सैनिकाला पकडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2021 06:04 IST

पूर्व लडाखमधील घटना; भरकटल्याने हद्दीत आल्याचा त्या सैनिकाचा दावा

लडाख : भारत आणि चीन यांच्यात तणाव कायम असतानाच पूर्व लडाखमध्ये चुशूल विभागातील गुरंग खोऱ्याजवळ प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर घुसखोरी करून भारतीय हद्दीत आलेल्या चीनी सैनिकाला भारतीय लष्कराने ताब्यात घेतले आहे. दिशा भरकटल्याने आपण भारताच्या हद्दीत आल्याचा दावा या सैनिकाने केला आहे. सध्या याची चौकशी सुरू असून समाधानकारक माहिती मिळाल्यानंतरच त्याला चीनी अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिले जाणार आहे.भारतीय लष्कराने माहिती दिली की, शुक्रवारी सकाळी भारतीय हद्दीत आलेल्या चीनी सैनिकाला पकडण्यात आले आहे. 

पूर्व लडाखमध्ये मागच्या वर्षीपासून दोन्ही देशांमध्ये कमालीचा तणाव आहे. दोन्ही देशांचे सैन्य सध्या समोरासमोर उभे आहे. दोन्ही बाजूंनी लढाऊ विमाने तसेच अत्याधुनिक शस्त्रे तैनात करण्यात आली आहेत.  दोन्ही देशांचे लष्करी अधिकारी आणि मुत्सद्दी याच्यात चर्चेच्या अनेक फेऱ्या पडल्या परंतु सीमावादातून कोणताही तोडगा निघू शकलेला नाही. आक्रमक चीनला भारताने प्रत्येक आघाडीवर तोडीस तोड उत्तर दिले आहे. (वृत्तसंस्था)

चीनमध्ये अडकलेले २३ भारतीय नाविक १४ पर्यंत परतणारनवी दिल्ली : चीनमध्ये अडकलेले २३ भारतीय नाविक १४ जानेवारीपर्यंत भारतात परतणार आहेत, अशी माहिती केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांनी दिली. मालवाहू जहाज एमव्ही जग आनंद जपानच्या चिबाकडे कूच करणार आहे. बंदरे व जहाजबांधणी राज्यमंत्र्यांनी एका ट्वीटमध्ये म्हटले आहे की, चीनमध्ये आमचे नाविक अडकलेले आहेत. एमव्ही जग आनंद या जहाजावर ते आहेत. चालक दलात बदल करण्यासाठी चिबा, जपानकडे ते जहाज प्रवास सुरू करणार आहे. भारतीय नाविक दलाचे दोन मालवाहू जहाज अनेक महिन्यांपासून चिनी जलक्षेत्रात उभे आहेत. इतर काही जहाजांनी त्यांचा माल उतरवला असला तरी या जहाजांना माल उतरण्याची परवानगी दिली जात नाही. चीनने २५ डिसेंबर रोजी म्हटले होते की, भारत-चीनच्या तणावपूर्ण संबंधांमुळे चीनच्या बंदरांवर भारतीय नाविक अडकलेले नाहीत.  विदेश मंत्रालयाने म्हटले होते की, दोन मालवाहू जहाज चिनी जलक्षेत्रात अडकले असून, त्यावर ३९ भारतीय नाविक आहेत. 

काय म्हणाले विदेश मंत्रालय?विदेश मंत्रालयाचे सचिव अनुराग श्रीवास्तव यांनी म्हटले होते की, या स्थितीत नाविक खूपच तणावात आहेत. या संकटाच्या काळात ग्रेट ईस्टर्न शिपींग कंपनीचा मानवीय दृष्टीकोन व संकटाच्या काळात त्यांच्याबरोबर उभे राहण्याचे करावे तेवढे कौतुक थोडे आहे. त्यांनी ३० डिसेंबर २०२० रोजी म्हटले होते की, चीनमध्ये अडकलेल्या नाविकांना लवकरच परत आणले जाईल. 

टॅग्स :chinaचीनIndiaभारतladakhलडाख