शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

भारतीय जवानांशी टक्कर, एक पाऊल मागे हटण्यास चीन 'मजबूर'; म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2021 17:32 IST

तत्पूर्वी, भारतीय लष्कराने सोमवारी सांगितले होते, की सिक्किमच्या उत्तरेला असलेल्या नाकूला भागात 20 जानेवारीला भारत आणि चिनी सैन्यांत ‘सामान्य बाचाबाची’ झाली होती. निर्धारित प्रोटोकॉलनुसार, स्थानिक कमांडरांकडून हा वाद मिटवण्यात आला. 

गेल्या आठवड्यात सिक्किमच्या नाकू ला भागातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारतीय लष्करासोबत झालेल्या झटापटीनंतर चीनला मागे हटावे लागले आहे. तसेच सीमा रेषेवर शांतता कायम ठेवण्यास आम्ही वचनबद्ध आहोत, असेही चीनने म्हटले आहे. याशिवाय, भारताने कुठल्याही प्रकारची एकतर्फी कारवाई करू नये, असेही चीनने म्हटले आहे. 

चिनी परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी म्हटले आहे की, आमचे सैनिक भारत-चीन सीमा भागात शांतता कायम ठेवण्यास वचनबद्ध आहेत. तसेच, चीन भारताला आवाहन करतो, की सीमेवरील परिस्थिती बिघडेल अशी एकतर्फी कारवाई होणार नाही याकडे भारताने लक्ष द्यावे. सीमावर्ती भागात शांतता रहावी यासाठी प्रयत्न करावेत."

तत्पूर्वी, भारतीय लष्कराने सोमवारी सांगितले होते, की सिक्किमच्या उत्तरेला असलेल्या नाकूला भागात 20 जानेवारीला भारत आणि चिनी सैन्यांत ‘सामान्य बाचाबाची’ झाली होती. निर्धारित प्रोटोकॉलनुसार, स्थानिक कमांडरांकडून हा वाद मिटवण्यात आला. 

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, यासंदर्भात भारतीय लष्कराने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे, ‘‘स्पष्ट करण्यात येते, की उत्तर सिक्किमच्या नाकू ला येथे 20 जानेवारीला ‘सामान्य बाचाबाची’ झाली होती. हा वाद निर्धारित प्रोटोकॉलनुसार स्थानिक कमांडर्सनी सोडवला होता. माध्यमांना आवाहन करत आहोत, की ही घटना मोठी करून दाखवू नये. कारण ते तथ्यात्मक दृष्ट्या चुकीचे आहे.’’ घटनेची माहिती असणाऱ्यांनी सांगितल्यानुसार चिनी सैनिकांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषा (एलएसी) ओलांडून भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, भारतीय जवानांनी त्यांना अडवले. त्यांचे म्हणणे आहे, की दोन्ही देशांच्या सैनिकांत भांडणही झाले होते.

गलवान घाटीमध्ये पहिला हल्ला -15 जूनला चीनच्या सैनिकांनी गलवान घाटीमध्ये पहिला हल्ला केला होता. खिळे असलेले लोखंडी रॉड, अणुकुचीदार जाळी आदींनी भारतीय जवानांवर हल्ला केला होता. भारतीय जवानांनी लगेचच सावध होत चीनच्या सैनिकांना चोख प्रत्यूत्तर दिले होते. यामध्ये २० भारतीय जवान शहीद झाले होते. तर ४० हून अधिक चिनी सैनिक मारले गेले होते. देशातील असंतोष रोखण्यासाठी चीनने अद्याप हे मान्य केलेले नाही. 

 

टॅग्स :india china faceoffभारत-चीन तणावsikkimसिक्किमBorderसीमारेषाchinaचीनSoldierसैनिकIndian Armyभारतीय जवान