शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

चीनमधील २०० अमेरिकी कंपन्या येणार भारतात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2019 06:19 IST

रोजगार निर्मिती : निवडणुकीनंतर कंपन्या स्थलांतरित करण्याची तयारी

वॉशिंग्टन : अमेरिका आणि चीन यांच्यात व्यापार युद्ध सुरू असताना चीनसाठी एक नकारात्मक वृत्त आहे. अमेरिकेतील जवळपास २०० कंपन्या लोकसभा निवडणुकीनंतर आपले प्रकल्प चीनमधून भारतात स्थलांतरित करणार आहेत. अमेरिका आणि भारत यांच्यातील संबंध दृढ करू पाहणाऱ्या यूएस- इंडिया स्ट्रॅटेजिक अ‍ॅण्ड पार्टनरशिप फोरमने ही माहिती दिली आहे.

या स्वयंसेवी समूहाने म्हटले आहे की, चीनऐवजी अन्य पर्याय शोधू पाहणाऱ्या या कंपन्यांसाठी भारत एक शानदार पर्याय आहे. या समूहाचे अध्यक्ष मुकेश अघी यांनी सांगितले की, अनेक कंपन्या आमच्याशी चर्चा करीत आहेत आणि विचारत आहेत की, भारतात गुंतवणूक करून कशाप्रकारे चीनला पर्याय शोधला जाऊ शकतो. निवडणुकानंतर भारतात स्थापन होणाऱ्या नव्या सरकारला हा समूह सुधारणांबाबतचा सल्ला देणार आहे. मुकेश अघी सांगितले की, भारत- अमेरिका यांच्यातील मुक्त व्यापाराचे आम्ही समर्थन करतो.नव्या सरकारने सुधारणांना गती द्यावी

गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी नव्या सरकारने काय करायला हवे? असा प्रश्न केला असता मुकेश अघी यांनी सांगितले की, सरकारने सुधारणांची गती वाढवायला हवी. निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत पारदर्शकता आणायला हवी. अधिक पक्षांसोबत चर्चा करण्यावर भर द्यायला हवा. यामुळे मोठ्या देशात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होण्यास मदत होणार आहे.

चीनला दे धक्काचीनमधील २०० हून अधिक अमेरिकी कंपन्या भारतात येण्याचा विचार करत असल्याने चीनला हा मोठा दणका मानला जात आहे. यातून भारतीय अर्थव्यवस्थेला चालना मिळणार असून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होऊ शकते.

अमेरिकेतील तंत्रज्ञान आणि भारतीय मनुष्यबळ यांच्या एकत्रीकरणातून आर्थिक विकासाला चालना मिळणार आहे. त्यामुळे या अमेरिकन कंपन्यांना कशा प्रकारे आकर्षित करायचे याचा सरकारने विचार करावा. यासाठी भूसंपादनापासून ते परवानगी आणि कर आदी बाबींमध्ये सुटसुटीतपणा आणावा लागेल.

टॅग्स :chinaचीनIndiaभारतAmericaअमेरिका