शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

हवामान बदल योजनेचा गरीब देशांना लाभ व्हावा

By admin | Published: April 24, 2016 4:09 AM

कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण आटोक्यात ठेवून पृथ्वीवरील वाढत्या तापमानाला आळा घालण्यासाठी भारतासह १७५ देशांनी पॅरिस हवामान बदल करारावर स्वाक्षरी केली आहे.

संयुक्त राष्ट्रे : कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण आटोक्यात ठेवून पृथ्वीवरील वाढत्या तापमानाला आळा घालण्यासाठी भारतासह १७५ देशांनी पॅरिस हवामान बदल करारावर स्वाक्षरी केली आहे. यासंदर्भात तयार करण्यात आलेली कृती योजना गरीब देशांपर्यंत पोहोचली पाहिजे आणि गरीब देशांनाही त्याचा फायदा मिळाला पाहिजे, यावर भारताने भर दिला आहे.उच्चस्तरीय परिषदेत बोलताना भारताचे पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले की, काही देश अतिशय विलासी जीवनशैली अवलंबीत आहेत. त्यामुळे एके दिवशी पृथ्वी राहण्यायोग्य राहणार नाही. व पृथ्वी, पर्यायाने मानवाचा विनाश होईल. त्यामुळे आपल्या जीवनशैलीत सावधानता बाळगणे आवश्यक आहे, असा इशाराही त्यांनी दिला. पॅरिस कराराची अंमलबजावणी करताना त्याचा फायदा केवळ श्रीमंत देशांना न होता खरा फायदा गरीब देशांना झाला पाहिजे. त्या दृष्टीने कृती योजनेची अंमलबजावणी झाली पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले.जावडेकर आणि ऊर्जामंत्री पीयूष गोयल यांनी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री जॉन केरी यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. (वृत्तसंस्था)