शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
2
"Today I say to the whole world..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
3
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
4
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
5
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
6
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
7
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
8
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
9
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
10
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
11
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
12
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
13
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
14
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
15
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
16
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
17
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
18
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
19
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
20
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार

Coal india : देशात कोळशाची कमतरता ही अफवाच, सितारमण यांनी फेटाळले वृत्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2021 18:44 IST

Coal india : ऊर्जामंत्री आरके सिंह यांनी काही महिन्यांपूर्वीच यासंदर्भात माहिती दिल्याचं सांगितलं. तसेच, कोळशाची कमतरता किंवा वीजेचं संकट हे वृत्त निराधार आहे. देशातील प्रत्येक वीज उत्पादक कंपनीकडे पुढील 4 दिवसांचा स्टॉक शिल्लक आहे.

ठळक मुद्देऊर्जामंत्री आरके सिंह यांनी काही महिन्यांपूर्वीच यासंदर्भात माहिती दिल्याचं सांगितलं. तसेच, कोळशाची कमतरता किंवा वीजेचं संकट हे वृत्त निराधार आहे.

नवी दिल्ली - देशात गेल्या काही दिवसांपासून कोळसा संकट अधिक गडद होताना दिसत आहे. वीज संकट दिवसागणिक तीव्र होत आहे. भारतासह जागतिक पातळीवर हे संकट आहे. भविष्यात पारंपारिक ऊर्जास्रोत कमी होत जाणार आहेत. त्यामुळे सरकारने अपारंपारिक ऊर्जेवर लक्ष केंद्रित केले आहे. मात्र, देशात कोळशाच्या कमतरतेमुळे वीजपुरवठा खंडित होण्याची भीती असताना केंद्र सरकारने कोळशाची कमतरता नसल्याचे स्पष्ट केले आहे. आता, अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनीही कोळसा संकट ही अफवा असल्याचं म्हटलंय.  

देशात "कोळशाचा पुरवठा सुरू आहे. लवकरच सर्व औष्णिक वीज केंद्रांवर कोळशाचा पुरेसा साठा असेल," अशी माहिती केंद्रीय कोळसा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिली होती. आता, निर्मला सितारमण यांनीही हे वृत्त निराधार असल्याचे म्हटले. देशात कोळशाची कमतरता नाही, भारत एक पॉवर सरप्लस देश आहे, असे सितारमण यांनी अमेरिकेच्या हॉवर्ड कॅनेडी स्कूलमध्ये बोलताना याबाबत माहिती दिली. हॉवर्ड येथील प्राध्यापक लॉरेंस समर्स यांनी भारतातील कोळशाच्या कमतरतेबाबत प्रश्न विचारल होता. त्यावेळी, उत्तर देताना निर्मला सितारमण यांनी ही माहिती दिली. 

ऊर्जामंत्री आरके सिंह यांनी काही महिन्यांपूर्वीच यासंदर्भात माहिती दिल्याचं सांगितलं. तसेच, कोळशाची कमतरता किंवा वीजेचं संकट हे वृत्त निराधार आहे. देशातील प्रत्येक वीज उत्पादक कंपनीकडे पुढील 4 दिवसांचा स्टॉक शिल्लक आहे. तर, कोळसा पुरवठ्याची साखळीही अखंडीत सुरू आहे. देशातील वीजनिर्मित्ती सक्षम आणि परिपूर्ण असून भारत सरप्लस देश आहे, असेही सितारमण यांनी म्हटलं. 

काय म्हणाले ऊर्जामंत्री

"कोल इंडियाने सोमवारी १९.४ लाख टन कोळसा पुरवठा केला आहे. घरगुती कोळशाचा हा आतापर्यंतचा सर्वात मोठा पुरवठा आहे. तेथे १५-२० दिवसांचा कोळसा साठा होता, तो खाली आला आहे. पण आता कोळशाचा पुरवठा वाढला आहे. त्यामुळे घाबरण्याची गरज नाही," असे ऊर्जामंत्र्यांनी सांगितलं होतं. "अतिवृष्टीमुळे कोळसा उत्पादनाच्या कामावर परिणाम झाला. याशिवाय आयात करण्यात येणाऱ्या कोळशाच्या किंमतीत अचानक वाढ झाल्याने देशांतर्गत कोळशावर दबाव वाढला. ज्या वीज प्रकल्पांनी त्यांचे उत्पादन थांबवले किंवा कमी केले ते आयात होणाऱ्या कोळशावर अवलंबून होते," असंही जोशी यांनी सांगितलं.

नियमानुसार २० दिवसांच साठा असावा

केंद्रीय वीज प्राधिकरणाच्या (CEA) अहवालानुसार, २७ वीज प्रकल्पांमध्ये एक दिवसाचा कोळसा साठा आहे, २० वीज प्रकल्पांमध्ये दोन दिवसांचा आणि २१ वीज प्रकल्पांमध्ये तीन दिवसांचा कोळशाचा साठा आहे. तसंच २० वीज प्रकल्पांमध्ये ४ दिवसांचा साठा आहे, पाच प्रकल्पांमध्ये पाच दिवसांचा आणि आठ वीज प्रकल्पांमध्ये सहा दिवसांचा कोळशाचा साठा उपलब्ध आहे. कोणत्याही वीज प्रकल्पांमध्ये सात दिवसांचा साठा नाही, असं यात नमूद करण्यात आलं आहे. नियमानुसार, किमान २० दिवसांचा साठा असणं आवश्यक आहे. 

टॅग्स :Nirmala Sitaramanनिर्मला सीतारामनcorona virusकोरोना वायरस बातम्याCoal Shortageकोळसा संकटministerमंत्री