शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
2
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
3
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
4
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
5
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
6
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
7
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
8
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
9
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
10
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
11
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
12
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
13
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
14
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
15
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
16
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
17
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
18
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
19
Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...
20
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा

म्यानमारमध्ये येणार खरी लोकशाही?

By admin | Published: November 05, 2015 3:11 AM

म्यानमार या भारताच्या सख्ख्या शेजारी आणि आशियातील महत्त्वाच्या देशात सध्या निवडणुका होत आहेत. ८ नोव्हेंबर रोजी म्यानमारचे मतदार आपला भावी राज्यकर्ता ठरविणार आहेत.

यंगुन : म्यानमार या भारताच्या सख्ख्या शेजारी आणि आशियातील महत्त्वाच्या देशात सध्या निवडणुका होत आहेत. ८ नोव्हेंबर रोजी म्यानमारचे मतदार आपला भावी राज्यकर्ता ठरविणार आहेत. या निवडणुकीमध्ये ९१ नोंदणीकृत पक्षांनी आपले सहा हजार उमेदवार रिंगणात उतरविले आहेत.बंगालच्या उपसागरातील एक महत्त्वाचा देश, नैसर्गिक साधनसंपत्ती विपुल असणाऱ्या म्यानमारची राजकीय आणि सामाजिक, वांशिक रचना अत्यंत गुंतागुंतीची आहे. चीनप्रमाणे म्यानमारमधील अंतर्गत हालचालीदेखिल बांबूच्या पडद्याआडच चालतात, त्यामुळे इतर जगाला त्याची फार थोडी कल्पना येते. आताशा थोडी राजकीय माहिती जगाला समजू लागली आहे. या निवडणुकीमध्ये खरी लढत सध्याचे राष्ट्राध्यक्ष थेन सेन यांचा युनियन सॉलिडॅरिटी अँड डेव्हलपमेंट पार्टी आणि आंग सान सू की यांच्या नॅशनल लीग आॅफ डेमोक्रसी या पक्षांमध्ये होणार आहे. २०१२ साली पोटनिवडणुकांमधून संसदेत गेलेल्या सू की या सध्या विरोधी पक्षनेत्याची भूमिका बजावत आहेत. सतत लष्करशाही, किंवा लुटूपुटूची लोकशाही असे तळ्यात मळ्यात करणाऱ्या म्यानमारला खऱ्या अर्थाने लोकशाही मिळणार का हा प्रश्न आजही अनुत्तरितच आहे. (वृत्तसंस्था)संसदेची रचनाम्यानमार संसदेची भारताप्रमाणेच दोन सभागृहे आहेत. त्यातील कनिष्ठ सभागृह म्हणजेच हाऊस आॅफ रिप्रेझेंटेटिव्ह (प्यीदांग्सू ह्लुताव) च्या ३३० जागांसाठी निवडणूक होत आहे, तर वरिष्ठ सभागृह म्हणजेच हाऊस आॅफ नॅशनॅलिटिज (अम्योथा ह्लुताव) च्या १६८ जागांसाठी मतदान केले जाईल.रोहिंग्यांचे काय?म्यानमारच्या राखीन प्रांतातील रोहिंग्या या मुसलमानांना गेल्या दोन वर्षांमध्ये विस्तापित व्हावे लागले आहे. लाकडी बोटींमध्ये बसून या लोकांनी पूर्व आशियात जाण्याचा मार्ग स्वीकारला मात्र अनेकदा अपघाताने आणि बोटी फुटून त्यांना प्राण गमवावे लागले. बऱ्याचशा देशांनी त्यांना स्वीकारण्यास नकार दिला. म्यानमार सरकारने ही केवळ आमची जबाबदारी नाही, असे सांगत हात वर केले होते. आश्चर्यजनक गोष्ट म्हणजे आंग सान सू की यांनीही याबाबत कोणतीही भूमिका घेतली नाही. त्यामुळे संपूर्ण जगभरातून त्यांच्यावर टीका झाली. सू क्यी यांनी काहीतरी भूमिका घेऊन रोहिंग्यांचा प्रश्न सोडविला पाहिजे, अशी इच्छा तिबेटी बौद्धांचे सर्वोच्च धर्मगुरू दस्तुरखुद्द दलाई लामा यांनीच व्यक्त केली होती. आता निवडणुकांनंतर तरी रोहिंग्यांना माणूस म्हणून जगण्याची संधी नवे सरकार देणार का याकडे सर्वांंचे लक्ष लागून राहिले आहे.सू क्यी राष्ट्राध्यक्षहोतील का?म्यानमारमधील घटनेनुसार ज्या व्यक्तीच्या कुटुंबात परदेशी सदस्य असेल त्या व्यक्तीला राष्ट्राध्यक्ष होता येत नाही. सू की यांचे पती ब्रिटिश होते व त्यांच्या दोन्ही मुलांकडे ब्रिटिश पासपोर्ट आहे. त्यामुळे सध्याच्या नियमांनुसार सू की राष्ट्राध्यक्ष होऊ शकणार नाहीत.म्यानमार म्हटले की आंग सान यांच्या कुुटंबाची आठवण आपल्याला होते. १९८९ पासून अनेक वेळा सू की यांना घरातच बंदिस्तावस्थेत काळ काढावा लागला. २०१० साली पूर्ण सुटका झाल्यानंतर पोटनिवडणूक लढवून त्या संसदेत पोहोचल्या. १९४५ साली जन्म झालेल्या आंग सान सू क्यी आपल्या आई 'खीन की' यांच्यासह भारतामध्ये आल्या. भारतामध्ये 'खीन की' त्या काळामध्ये राजदूत म्हणून काम करीत होत्या. नेपाळ आणि भारतात खीन की यांनी आपली सेवा बजावली. नवी दिल्लीमधील लेडी श्रीराम कॉलेज येथे सू की यांचे शिक्षण झाले. त्यानंत सू की आॅक्सफर्डच्या सेंट ह्युजेस कॉलेजमध्ये शिक्षणासाठी गेल्या. गेली अनेक दशके काँग्रेस पत्राचे राष्ट्रीय मुख्यालय ज्या '२४, अकबर रोड' या जागी आहे, त्याच बंगल्यामध्ये सू की वास्तव्यास होत्या. या बंगल्याचे त्यावेळेस बर्मा हाऊस असे नामकरणही करण्यात आले होते. आंग सान सू की यांना नोबेल, राफ्तो, साख्रोव्ह, जवाहरलाल नेहरू त्याचप्रमाणे सायमन बोलिव्हर पुरस्काराने सन्मानित केले आहे. सू की यांनी क्युबातील हवाना येथे जन्मलेल्या मायकेल एरिस या ब्रिटिश इतिहासकाराशी विवाह केला. एरिस यांनी, तिबेट, भूतान, हिमालयन देशांच्या इतिहासावर व्याख्याने दिली असून या विषयांवर विपुल लेखनही केले आहे.