शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

कुवेतच्या सुपरमार्केटमध्ये भारतीय उत्पादनावर बंदी; BJP प्रवक्त्याचं विधान भोवलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2022 23:19 IST

पैंगबरांवर केलेल्या विधानामुळे नाराज असलेले अल अरदिया-को ऑपरेटिव्ह सोसायटी स्टोअरनं भारतीय चहा आणि अन्य उत्पादनाला इस्लामोफोबिक सांगितले आहे.

नवी दिल्ली - भाजपा प्रवक्त्यांनी मोहम्मद पैंगबर यांच्याविरोधात केलेल्या वादग्रस्त विधानानंतर त्याचे जगभर पडसाद थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. आखाती देशांमध्ये भारताविरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो लावून निषेध व्यक्त केला जात आहे. त्यातच आता कुवेतच्या सुपरमार्केटमध्ये हा वाद पोहचला आहे. याठिकाणी बाजारातून भारतीय उत्पादनावर बंदी आणली आहे. 

पैंगबरांवर केलेल्या विधानामुळे नाराज असलेले अल अरदिया-को ऑपरेटिव्ह सोसायटी स्टोअरनं भारतीय चहा आणि अन्य उत्पादनाला इस्लामोफोबिक सांगितले आहे. सौदी अरब, कतार यासह अनेक देशांनी भाजपा प्रवक्त्याच्या विधानाचा निषेध केला आहे. कुवेत शहराच्या अगदी बाहेर सुपरमार्केटमध्ये, तांदळाची पोती, मसाले आणि मिरचीचे शेल्फ प्लास्टिकच्या आवरणाने झाकलेले होते. त्यावर अरबी भाषेत 'आम्ही भारतीय उत्पादने काढून टाकली आहेत' असे लिहिले आहे. "कुवैती मुस्लिम म्हणून आम्ही पैगंबर मोहम्मद यांचा अपमान सहन करणार नाही," असे स्टोअरचे मुख्य कार्यकारी अधिकारी नासेर अल-मुतारी यांनी एएफपीला सांगितले. बहिष्काराचा कंपनी स्तरावर विचार केला जात आहे असं सुपरमार्केट स्टोअरच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. 

नुपूर शर्मा यांना पक्षाने निलंबित केलेरविवारी भाजपने नुपूर शर्मा यांच्यावर कारवाई करत त्यांना ६ वर्षांसाठी निलंबित केले. पक्ष सर्व धर्मांचा आदर करतो आणि शर्मा यांचे विचार पक्षाशी जुळत नसल्याचे म्हटले आहे. शर्मा यांनी ट्विटरवर म्हटले होते की, त्यांचे हे वक्तव्य भगवान शिवाच्या अपमानाला प्रत्युत्तर आहे. माझ्या बोलण्याने कोणाच्याही धार्मिक भावना दुखावल्या गेल्या असतील किंवा कोणाच्याही धार्मिक भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी माझे विधान बिनशर्त मागे घेते असे त्या म्हणाल्या. 

भारतासाठी आखाती देशाचे महत्त्व काय? आखाती देशांचं भारतासाठी राजकीय, आर्थिक, सामरिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे. जीसीसी देश परस्पर सहकार्याने पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे भारतासाठी व्यापार, गुंतवणूक, ऊर्जा यांसारख्या क्षेत्रात सहकार्याच्या संधी निर्माण होत आहेत. त्याचबरोबर भारतीय तंत्रज्ञान, बांधकाम, हॉटेल आणि फायनान्सशी संबंधित कंपन्या आखाती देशांमध्ये सक्रिय आहेत. याशिवाय भारताचे आखाती देशांशी चांगले व्यापारी संबंध आहेत. त्यात यूएई आणि सौदी अरेबियाचा सर्वाधिक सहभाग आहे. याशिवाय आखाती देशांना भौगोलिक राजकीय महत्त्व आहे. भारत इराणमार्गे मध्य आशिया आणि युरोपमध्ये पोहोचतो, तर ओमानमार्गे पश्चिम हिंदी महासागरावर आपली पकड कायम ठेवतो. ओमानमध्ये भारताचे तीन नौदल तळ आणि एक एअरबेस आहे.

टॅग्स :BJPभाजपा