शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

दहशतवादी हाफिज सईद आणि पाक पंतप्रधान इम्रान खान यांच्यात हातमिळवणी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2019 13:29 IST

काश्मीरमधील लोकांच्या मानवाधिकाराचा मुद्दा उचलून पाक भारतावर खोटे आरोप करत आहे.

नवी दिल्ली - जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटविल्यानंतर पाकिस्तान बिथरलं आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर काश्मीरचा मुद्दा घेऊन गेल्यानंतरही पाकिस्तानच्या पदरी निराशा पडली आहे. त्यामुळे सैरभैर झालेल्या पाकिस्तानकडून दहशतवादाचा वापर केला जाऊ लागला आहे. जगातील इतर देशांमध्ये चीनशिवाय कोणत्याही देशाने पाकिस्तानला पाठिंबा दिला नाही. 

अशातच पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आणि मुंबईमधील 26/11 दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माईंड हाफीद सईद यांचे पोस्टर्स लाहोरमध्ये लागले आहेत. त्यामुळे भारतात पुन्हा दहशतवादी हल्ला घडवून आणण्याचं षडयंत्र रचलं जात आहे का असा सवाल सर्वांच्या मनात निर्माण होईल. काश्मीरमधील लोकांच्या मानवाधिकाराचा मुद्दा उचलून पाक भारतावर खोटे आरोप करत आहे. पाकिस्तानच्या स्वातंत्र्य दिनादिवशी हे पोस्टर्स संपूर्ण लाहोर शहरात आणि पाकिस्तानातील काही भागात झळकले होते. यात निळ्या अक्षरात हाफिज मोहम्मद सईद लिहिलं आहे तर पिवळ्या अक्षरात जश्न ए आजादी मुबारक असं लिहिलं आहे. 

एकीकडे भारत पाकिस्तान यांच्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी चर्चा करण्याचं नाटक करायचं तर दुसरीकडे पाकिस्तानातील दहशतवाद्यांना खतपाणी घालयाचं हे उद्योग करणाऱ्या पाकचा बुरखा या पोस्टर्सच्या निमित्ताने पुन्हा एकदा फाटला आहे. लाहोर शहरात लागलेल्या या पोस्टर्सवरून हाफिज सईदसोबत पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांचे किती जवळचे संबंध आहेत हे स्पष्ट होतं. पाकिस्तानी सरकारकडून त्या देशात कार्यरत असणाऱ्या दहशतवाद्यांना पाठबळ दिलं जातं. त्यांच्यावर कोणतीही ठोस कारवाई केली जात आहे. मात्र हाफिज सईदला जेलमध्ये टाकल्याचं सांगत आलीशान गेस्ट हाऊसमध्ये ठेवण्यात आलं आहे. तसेच बाकी दहशतवाद्यांना अंडरग्राऊंड राहण्याचं फर्मान सोडले आहे. पाकिस्तान स्वत:वरील आरोप कितीही फेटाळून लावत असले तरी दरवेळी पाकिस्तानचा खरा चेहरा समोर येतोच. या पोस्टर्सवरून हाफिज सईदला हाताशी घेत भारतावर दहशतवादी हल्ला करण्याचं षडयंत्र पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान रचत आहेत का? हा गंभीर प्रश्न निर्माण होतो. 

काही दिवसांपूर्वीच अमेरिकेत पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी सांगितले होते की, त्यांच्या देशातील आधीच्या सरकारने कधी सत्य समोर आणलं नाही की, पाकिस्तानात 40 वेगवेगळे दहशतवादी गट सक्रीय आहेत. मात्र पाकिस्तान दहशतवाद या विषयाकडे किती गांभीर्याने पाहते हे या पोस्टर्समधून समोर येत आहे.  

 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानJammu Kashmirजम्मू-काश्मीरterroristदहशतवादीhafiz saedहाफीज सईदImran Khanइम्रान खानIndiaभारत