शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
2
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
3
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
5
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
6
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
7
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
8
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
9
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
10
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
11
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
12
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
13
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
14
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
15
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
16
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
17
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
18
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
19
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
20
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल

दख्खन ज्वालामुखीने डायनोसॉर्सचा अंत

By admin | Published: July 07, 2016 4:10 AM

सुमारे ६६ दशलक्ष वर्षांपूर्वी बाह्य अवकाशातील एक विशाल अशनी अथवा लघुग्रह (अ‍ॅस्ट्रॉईड) येऊन आदळल्याने झालेला विनाश हेच पृथ्वीवर त्यावेळी असलेली डायनोसॉरसह बव्हंशी सजीवसृष्टी

पॅरिस: सुमारे ६६ दशलक्ष वर्षांपूर्वी बाह्य अवकाशातील एक विशाल अशनी अथवा लघुग्रह (अ‍ॅस्ट्रॉईड) येऊन आदळल्याने झालेला विनाश हेच पृथ्वीवर त्यावेळी असलेली डायनोसॉरसह बव्हंशी सजीवसृष्टी नष्ट होण्याचे एकमेव कारण नव्हते. भूगर्भशास्त्रात ‘डेक्कन ट्रॅप्स’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व आज भारतात असलेल्या भूप्रदेशात झालेला ज्वालामुखीचा प्रचंड उद्रेक हेही त्याचे एक तेवढेच महत्वाचे कारण होते, असा दावा अमेरिकेतील वैज्ञानिकांनी नव्या संशोधनाच्या आधारे केला आहे.आजच्या मेक्सिकोमध्ये असलेल्या चिक्सुलब नावाच्या ठिकाणी झालेल्या अशनीच्या आघाताने डायनोसोर युगाचा अंत झाला, असे मानले जात होते. मात्र हे वैज्ञानिक म्हणतात की, अशनीचा आघात व ‘डेक्कन ट्रॅप्स’मध्ये झालेला ज्वालामुखीचा उद्रेक या कालमापनाच्या दृष्टीने काही शे वर्षांच्या अंतराने घडलेल्या दोन घटनांचा एकत्रित परिणाम डायनोसोरचे कर्दनकाळ ठरले. या दोन्ही घटनांमुळे वातावरणात एवढ्या मोठ्या प्रमाणावर धूर, वाफ व धूळ पसरली की प्रदीर्घ काळ पृथ्वीवर सूर्यप्रकाश पोहोचणेही मुश्किल झाले. परिणामी या दोन्ही घटनांच्या अलीकडे-पलीकडे सुमारे एक हजार वर्षांचा तीव्र जागतिक हवामान बदलाचा कालखंड निर्माण झाला व त्याच्याशी जुळवून घेणे न जमल्याने डायनोसॉर विनष्ट झाले. अमेरिकेतील मिशिगन विद्यापीठातील तीन वैज्ञानिकांच्या चमुने हे नवे संशोघन केले असून त्यांचा त्यावरील शोधनिबंध ‘नेचर कम्युनिकेशन्स’ या वैज्ञानिक नियतकालिकात प्रसिद्ध झाला आहे. (वृत्तसंस्था)काय व कसे केले संशोधन?आज सदैव बर्फाच्छादित असलेल्या अंटार्क्टिक खंडावर लाखो वर्षांपूर्वी जलवनस्पतींची जंगले होती. या द्विपकल्पाच्या उत्तरेकडील टोकावरील त्रिभूज प्रदेशाशेजारी असलेल्या उथल पाण्याच्या किनारी भागात जिवाश्म रूपात सापडलेल्या २९ शिंपल्यांचा अभ्यास करून या वैज्ञानिकांनी ३५ लाख वर्षांच्या कालखंडतील तापमानाचा आलेख तयार केला. जिवाश्म रूपाने सापडलेले हे शिंपले ज्या काळात डायनोसॉरस विनष्ट झाले, साधारणपणे त्याच काळातील आहेत.तापमानाच्या या आलेखावरून वैज्ञानिकांना असे आढळले की, हजारो वर्षे सुरू राहिलेला ‘डेक्कन ट्रॅप्स’मधील ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर पृथ्वीवरील सागरांचे तापमान ७.८ अंश सेल्सियसने वाढले. त्यानंतर सुमारे दीड लाख वर्षांनी अशनीचा आघात झाला, तेव्हा पुन्हा एकदा सागरी तापमानात १.१ अंश सेल्सियसची वाढ झाली. या दोन्ही घटनांमुळे पृथ्वीच्या वातावरणात वाढ करणारे आज जे ‘ग्रीनहाऊस गॅसेस’ म्हणून ओळखले जातात, त्या वायूंसह प्रचंड प्रमाणावर धूर, वाफ व धूळ वातावरणात पसरली. यामुळे ‘हवामान बदला’चा कालखंड सुरू झाला.काय आहे ‘डेक्कन ट्रॅप्स’? : ‘डेक्कन ट्रॅप्स’ म्हणून ओळखला जाणारा भूप्रदेश भारतीय उपखंडाच्या पश्चिम-उत्तर क्षेत्रात सुमारे दोन लाख चौ. किमी भागावर पसरलेला आहे. सह्याद्रीच्या रांगामधील महाबळेश्वर आणि त्या परिसरात दिसणारे संपूर्ण अखंड पाषाणाचे डोंगरही त्यातच मोडतात. ज्वालामुखीच्या प्रचंड उद्रेकाने सुमारे १२,२७५ घनमैल एवढा लाव्हा भूगर्भातून बाहेर येऊन त्याचा ६,५०० फूटांचा थर जमिनीवर पसरला गेला. हा लाव्हा थंड झाल्यावर जो भूप्रदेश तयार झाला तो ‘डेक्कन ट्रॅप्स’ म्हणून ओळखला जातो.