शहरं
Join us  
Trending Stories
1
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
2
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
3
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
4
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
5
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
6
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
7
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
8
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
9
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
10
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
11
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
12
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
13
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
14
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
15
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
16
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
17
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
18
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
19
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
20
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू

भारत पाकमधल्या धरमशालातल्या वर्ल्ड कप सामन्यावर धर्मसंकट

By admin | Published: March 01, 2016 1:28 PM

हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री विरभद्र सिंग यांनीच सुरक्षा व्यवस्थेचं कारण देत हा सामना रद्द करण्याची मागणी केली आहे

ऑनलाइन लोकमत
सिमला, दि. 3 - टी - 20 वर्ल्ड कपमधला भारत पाकिस्तान यांच्यातला सामना हिमाचल प्रदेशमधल्या धरमशाला येथे 19 मार्च रोजी आयोजित करण्यात आला आहे. मात्र, खुद्द हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री विरभद्र सिंग यांनीच सुरक्षा व्यवस्थेचं कारण देत हा सामना रद्द करण्याची मागणी केली आहे. भारत व पाकिस्तान या पारंपरिक शत्रूंमधलं मैदानावरचं युद्ध पाहण्याची हौस प्रत्येकाला असते, परंतु पाकिस्तानी खेळाडुंना भारतात खेळू देण्यावरून भारतीय जनमत प्रतिकूल होत असल्याचं दिसत असून आता हिमाचल प्रदेशच्या सरकारनेही सुरक्षा पुरवण्यास असमर्थता दर्शवली आहे.
याआधी केवळ शिवसेनेने भारत पाकिस्तान सामने होऊ देणार नाही अशी भूमिका घेतली होती. 1991 वानखेडेचं पिच खोदून शिवसैनिकांनी सामना रद्द करण्यास भाग पाडलं. त्यानंतर याचपद्धतीने शिवसेनेने 1998 मध्ये मुंबईतली कसोटी, 1999मध्ये दिल्लीतला सामना, 2003 मध्ये आग्रा येथला सामना होऊ दिला नव्हता.
आता हिमाचल प्रदेशमध्येही भारत पाक सामना सुरक्षितरीत्या होऊ शकणार नाही अशी भीती मुख्यमंत्र्यांना वाटत आहे. यासंदर्भात त्यांनी बीसीसीआयला पत्र पाठवून हा सामना रद्द करण्याची व अन्यत्र भरवण्याची विनंती केली आहे.
मात्र, बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर यांनी एक वर्ष आधी या सगळ्या सामन्यांचं नियोजन झालेलं असल्यामुळे ऐनवेळी असा बदल करता येणार नाही अशी भूमिका मांडली आहे. एकीकडे राज्याचे मुख्यमंत्रीच सामना सुरक्षित होऊ शकत नाही, असं सांगत आहेत, तर दुसरीकडे ऐनवेळा ठिकाण बदलणं शक्य नसल्याचं बीसीसीआय म्हणत आहे. यामुळे धरमशाला येथील भारत पाक सामन्यावर धर्मसंकट आलं आहे हे मात्र खरं.