शहरं
Join us  
Trending Stories
1
NCP च्या जागेवर दावा; मुलाच्या उमेदवारीसाठी माजी आमदाराची उद्धव ठाकरेंकडे मागणी
2
एका घरात पाच मृतदेह! चार मुलींसह वडिलांनी संपवलं आयुष्य, कारण...
3
मुंबईत ठाकरेंच्या युवासेनेचा जल्लोष; सिनेट निवडणुकीत पुन्हा एकदा १० पैकी १० विजयी
4
विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात घ्या; शिंदेसेना, अजित पवार गटाची मागणी
5
Today Daily Horoscope आजचे राशीभविष्य: विविध पातळ्यांवर यश, किर्ती व लाभासह धन प्राप्ती होईल
6
'ती माझी मुलगी आहे...', IIFA सोहळ्यावेळी आराध्याबद्दल विचारताच ऐश्वर्याचं पत्रकाराला थेट उत्तर
7
आज शेअर बाजार खुला राहणार, NSE वर होणार विशेष ट्रेडिंग सेशन; कारण काय?
8
Zomatoच्या सह-संस्थापक आकृती चोप्रा यांचा राजीनामा; १३ वर्षाचा प्रवास थांबला, पाहा त्यांची Networth किती?
9
Bigg Boss Marathi Season 5: राखी सावंतची घरात एन्ट्री! 'ड्रामा क्वीन'ला पाहून निक्कीची झाली अशी अवस्था; प्रोमो व्हायरल
10
धक्कादायक! नांदेडमध्ये पाण्यातून दोनशेहून अधिक जणांना विषबाधा, ६ जण गंभीर
11
उद्धव युवासेनेचा अखेर सिनेटवर झेंडा; विद्यापीठाच्या निवडणुकीत अभाविपचा उडाला धुव्वा
12
अग्रलेख : फडणवीसांचा कबुलीनामा; अजित पवारांना सोबत घेतल्यानंतर ‘परिवार’ फारच अस्वस्थ
13
मतदारांची गैरसोय झाल्यास अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई; केंद्रीय निवडणूक आयोगाचा इशारा
14
बहिणींच्या पैशांवर नजर ठेवाल तर खबरदार...; फडणवीस यांचा विरोधकांना इशारा
15
मध्य रेल्वेवर उद्या ५ तासांचा मेगाब्लॉक; तिन्हा मार्गांवरील लोकल धावणार उशिरा
16
महायुतीमधील वाद विकोपाला गेले तर बसेल फटका; मीरा-भाईंदर, ऐरोली, बेलापूर, ठाणे मतदारसंघात अंतर्गत धुसफूस
17
आजारी पडू नका; खर्च नाही पेलणार, उपचारावर होणारा खर्च ११.३५% वाढला
18
"मला क्लीन चिट मिळाल्यामुळेच चांदीवाल आयोगाचा अहवाल दडवला", अनिल देशमुखांचा शिंदे सरकारवर आरोप
19
सरकारची मोठी कारवाई, Aadhaar आणि PAN Card चा डेटा लीक करणाऱ्या ३ वेबसाइट्स ब्लॉक! 
20
ऋता आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करा; व्हायरल व्हिडीओवरून परांजपे यांची मागणी

काश्मीर मुद्याशिवाय भारताशी चर्चा अशक्य

By admin | Published: September 09, 2015 2:53 AM

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पाकिस्तानशी चर्चेसाठी अटी लादत आहेत. तथापि, आम्हीही काश्मीरच्या मुद्याशिवाय कुठलीही चर्चा स्वीकारूच शकत नाही, अशा शब्दांत

इस्लामाबाद : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पाकिस्तानशी चर्चेसाठी अटी लादत आहेत. तथापि, आम्हीही काश्मीरच्या मुद्याशिवाय कुठलीही चर्चा स्वीकारूच शकत नाही, अशा शब्दांत पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सरताज अजीज यांनी आज दोन्ही देशांतील चर्चेच्या पूर्वसंध्येला आपली आडमुठी भूमिका जाहीर केली. पाकिस्तान रेंजर्स आणि सीमा सुरक्षा दलाच्या प्रमुखांची बुधवारी नवी दिल्लीत बैठक होत आहे. अजीज म्हणाले की, मोदी यांनी पाकिस्तानविरोधी भूमिका घेऊनच निवडणुका लढविल्या आणि आज ते चर्चेसाठी आमच्यावर अटी लादत आहेत; मात्र आम्ही या अटी मान्य करणार नाही, असा संदेश आम्ही नवी दिल्लीतही दिला आहे. नियंत्रण रेषेवर भारताकडून होत असलेल्या गोळीबाराचा मुद्दा बैठकीत उपस्थित केला जाईल. नियंत्रण रेषेवरील तणाव कमी करणे हा या बैठकीचा मूळ उद्देश आहे. २००३ मध्ये झालेल्या संघर्ष विराम कराराचा विषयही चर्चिला जाईल. पाकिस्तानच्या पंतप्रधानांचे परराष्ट्र विषयांचे विशेष सहायक तारिक फातमी यांनी चीनच्या सरकारी वृत्तपत्राशी बोलताना सांगितले की, भारत जर त्यांच्या पूर्वअटींवर कायम राहिला तर भारत-पाकिस्तान यांच्यात चर्चा होऊ शकत नाही. भारत व पाकिस्तानात यापूर्वी अशा अटींवर आधारित चर्चा कधी झाली नाही, असेही फातमी म्हणाले.