शहरं
Join us  
Trending Stories
1
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
2
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
3
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
4
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
5
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
6
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
7
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
8
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
9
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
10
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
11
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
12
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
13
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
14
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
15
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
16
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
17
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
18
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
19
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

काश्मीर मुद्द्यावरून वाद पेटला; भारत पाकिस्तान युद्धाबद्दल इम्रान खान यांनी केलं मोठं विधान 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2019 4:07 PM

शुक्रवारी पुन्हा एकदा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी देशाला संबोधित करताना काश्मीरच्या प्रकरणावर आपला राग व्यक्त केला आहे

इस्लामाबाद - जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटविल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढला आहे. सैरभैर झालेल्या पाकिस्तानकडून युद्धाची भाषा येऊ लागली आहे. तर काश्मीर मुद्दा भारताचा अंतर्गत मामला नाही असं पाकिस्तानकडून जगाला सांगण्यात येत आहे मात्र चीनशिवाय इतर कोणताही देश पाकिस्तानला पाठिंबा देण्यास तयार नसल्याने पाक बिथरला आहे. 

शुक्रवारी पुन्हा एकदा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी देशाला संबोधित करताना काश्मीरच्या प्रकरणावर आपला राग व्यक्त केला आहे. अण्वस्त्र संपन्न दोन्ही देशांचे युद्ध झाले तर त्याचे परिणाम जगाला भोगावे लागतील अशी पोकळ धमकी इम्रान खान यांनी दिली आहे. जर पाकव्याप्त काश्मीरमध्ये कोणत्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर आम्ही त्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज आहोत असं इम्रान खान यांनी सांगितले आहे. 

यावेळी इम्रान खान म्हणाले की, आमचे लष्कर पाकव्याप्त काश्मीरात कोणती कारवाई केली तर त्याला निपटण्यासाठी सज्ज आहे हे मी मोदींना सांगू इच्छितो. जगाला हे माहित आहे जर अण्वस्त्र संपन्न देशात युद्ध झालं तर त्याचे परिणाम जगाला भोगावे लागणार आहेत. मी ज्यांना भेटतो त्यांना ही गोष्ट आर्वुजून सांगतो असंही त्यांनी सांगितले. 

काश्मीरमध्ये मुस्लिमांवर अन्याय होत असताना जगातील सर्व देश मौन बाळगतात. सर्व जगाला माहित आहे की, काश्मीरात काय परिस्थिती आहे. काश्मीरात मुस्लीम नसते तर सर्व जग त्यांच्यामागे उभं राहिलं असतं. काश्मीर कठीण संकटातून जात आहे असा आरोप पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केला. 

बालाकोटमध्ये भारतीय हवाई दलाने केलेल्या एअर स्ट्राईकला नाकारत असलेल्या पाकिस्तानच्या पंतप्रधानाने आता ही गोष्ट कबुल केली. भारतीय लष्कर बालाकोटप्रमाणे पीओकेमध्ये काहीतरी करण्याची शक्यता आहे. त्यामुळे संयुक्त राष्ट्र सभेच्या वार्षिक सभेत काश्मीर प्रकरण पुन्हा लावून धरणार आहोत. आरएसएस हिंदूंना श्रेष्ठ समजते. त्यामुळे मुस्लिमांना काश्मीरात दुय्यम दर्जाची वागणूक दिली जात आहे असा आरोपही इम्रान खान यांनी केला.   

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तानImran Khanइम्रान खानJammu Kashmirजम्मू-काश्मीर