शहरं
Join us  
Trending Stories
1
"आत्ता कुठे सुरुवात...!" वक्फ कायद्यानंतर पुढे काय? भाजपनं व्हिडिओ शेअर करत स्पष्टच सांगितलं
2
"हिंदीसारख्या भारतीय भाषेला विरोध करता अन् इंग्रजीचे मात्र गोडवे गाता"; देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
3
IPL Playoff Scenario: पांड्याच्या MI ला 'चौकार' पुरेसा; धोनीच्या CSK समोर 'सिक्सर' मारण्याचं चॅलेंज
4
"मोदीजी या लोकांना रोखले नाही, तर..."; निशिकांत दुबे यांच्या विधानावरून ओवेसींचा हल्लाबोल
5
"राज ठाकरे यांच्याकडून तुतारी गटाने आदर्श घ्यायला हरकत नाही, जर...!" राष्ट्रवादीच्या आमदाराची खुली ऑफर
6
MI विरुद्धच्या पराभवानंतर MS धोनीनं सांगून टाकला Playoffs च्या पुढचा प्लॅन; म्हणाला...
7
"ती शिवसेनेकडून झालेली मोठी चूक..., राज ठाकरे अध्यक्ष झाले असते, तर आज शिवसेनेचे दोन तुकडे झाले नसते!"
8
61 पैशांच्या शेअरवर तुटून पडले लोक, सातत्याने लागतंय अप्पर सर्किट; कंपनी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
9
IPL 2025 : जड्डूच्या 'तलवारबाजी'सह दुबेची फिफ्टी! CSK समोर पुरून उरली MI ची रोहित-सूर्या जोडी!
10
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशानभूमी; मोहन भागवतांनी सांगितला जातिवाद मिटवण्याचा मार्ग
11
आता काय बाउंड्री लाइनच्या बाहेर येतोस का? कॅच घेताना सँटनरची कसरत अन् डग आउटमध्ये रोहितची 'धडपड' (VIDEO)
12
5000 KM राम वनगमन मार्ग अन् 293 ठिकाणे; अयोध्या ते श्रीलंका उभारले जाणार श्रीराम स्तंभ
13
CSK विरुद्ध कडक फिफ्टी! MI चा राजा रोहित शर्मानं केली किंग कोहलीची बरोबरी
14
कर्नाटकचे माजी डीजीपी ओम प्रकाश यांची निर्घृण हत्या; पत्नीवर संशय, कारण काय..?
15
MI vs CSK ...अन् सूर्या दादानं थोपटली CSK कडून धमाकेदार पदार्पण करणाऱ्या Ayush Mhatre ची पाठ
16
काँग्रेस सोडायची वेळ का आली? संग्राम थोपटेंनी यादीच वाचली; भाजपा प्रवेशाची तारीखही सांगितली
17
'INDIA आघाडी कायम राहणार; आगामी निवडणुका एकत्र लढू', अखिलेश यादवांचे सूचक विधान
18
चालताना छत्रीचा धक्का लागल्याने गर्दुल्ल्याचा महिलेवर हल्ला, वरळी सी फेसजवळील घटना
19
IPL 2025 PBKS vs RCB : किंग कोहलीचं विक्रमी अर्धशतक! पंजाबला पराभूत करत आरसीबीनं मारला 'पंजा'
20
डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण; चिठ्ठी सापडली..आत्महत्येचे कारण आलं समोर?

चीनसोबत मैत्री महागात पडली! भारताने बांगलादेशला दिला धक्का, शेजारील देशांसोबत व्यवसाय करणे कठीण होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2025 20:06 IST

भारताने बांगलादेशला मोठा झटका दिला आहे.

बांगलादेशमधील शेख हसीना यांचे सरकार सत्तेतून गेल्यानंतर भारताचे आणि बांगलादेशचे संबंध बिघडले आहेत. काही दिवसापूर्वी, बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे सल्लागार मोहम्मद युनूस यांनी भारताच्या ईशान्येकडील प्रदेशावरुन मोठं विधान केलं होतं.यावर आता तीव्र टीका झाली आहे. आता भारताने बांगलादेशला दिलेली महत्त्वाची ट्रान्सशिपमेंट सुविधा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आता बांगलादेशला मोठा फटा बसला आहे.

आधी 84% टॅरिफ, आता चीनचा अमेरिकेवर आणखी एक हल्ला; 18 कंपन्यांवर कडक कारवाई

याअंतर्गत, बांगलादेशचा निर्यात माल भारतीय जमीन सीमाशुल्क केंद्रे, बंदरे आणि विमानतळांद्वारे तिसऱ्या देशांमध्ये नेण्याची परवानगी देण्यात आली. पण आता भारताने ही सुविधा रद्द केल्यानंतर, बांगलादेशचा नेपाळ, भूतान आणि म्यानमार सारख्या शेजारील देशांसोबतच्या व्यापारावर परिणाम होऊ शकतो. भारताच्या या पावलाकडे मोहम्मद युनूस यांच्या विधानाला प्रतिसाद म्हणून पाहिले जात आहे, मोहम्मद युनूस यांनी ईशान्य भागात चिनी अर्थव्यवस्थेच्या विस्ताराचे समर्थन केले होते.

हा निर्णय ८ एप्रिल रोजी केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाने जारी केलेल्या परिपत्रकाद्वारे घेण्यात आला आहे. या अधिसूचनेत म्हटले आहे की, '२९ जून २०२० रोजीचे परिपत्रक तात्काळ प्रभावाने रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, 'भारतात आधीच प्रवेश केलेल्या मालवाहतुकीला त्या परिपत्रकात दिलेल्या प्रक्रियेनुसार भारतीय हद्दीतून बाहेर पडण्याची परवानगी दिली जाऊ शकते, असं  यामध्ये असे म्हटले होते. 

व्यापार तज्ज्ञांच्या मते, ही सुविधा मागे घेतल्याने कापड, पादत्राणे, रत्ने आणि दागिने यासह अनेक भारतीय निर्यात क्षेत्रांना फायदा होण्याची अपेक्षा आहे. 

मोहम्मद युनूस यांनी काही दिवसापूर्वी चार दिवसांच्या चीन दौऱ्यात भारताच्या ईशान्येकडील प्रदेशाचे वर्णन "लॅन्डलॉक्ड" आणि "समुद्रा पर्यंत पोहोचण्यासाठी रस्ता नाही" असे केले होते आणि बांगलादेशला या प्रदेशाचे मुख्य प्रवेशद्वार म्हटले होते. दक्षिण आशियातील महासागराचे एकमेव संरक्षक म्हणून ढाका दर्शविताना, मुख्य सल्लागार युनूस यांनी चीनला बांगलादेशमध्ये आपली आर्थिक गुंतवणूक वाढवण्याचे आवाहन केले होते. 

टॅग्स :BangladeshबांगलादेशTrade Tariff Warटॅरिफ युद्ध