शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याला महिला मुख्यमंत्री हव्या पण रश्मी ठाकरेंचं नाव नको; किशोरी पेडणेकर असं का बोलल्या?
2
...तर २ टर्म मी केंद्रात मंत्री असतो; मुख्यमंत्रिपदावरून नाना पटोलेंचं थेट उत्तर
3
Ganesh Visarjan 2024 Live: किनाऱ्यावर भाविकांची गर्दी; 'लालबागचा राजा'चं समुद्राकडे मार्गक्रमण
4
"तुम्ही प्रश्न विचारू शकता, वाद घालू नका"; मणिपूरच्या प्रश्नावर अमित शाहांचा पत्रकाराला सल्ला
5
"दादांनी थांबवलं तरी भाजपाविरोधात निवडणूक लढणार"; अजित पवार गटातील नेत्याचा इशारा
6
नवाब मलिक यांच्या जावयाच्या कारचा भीषण अपघात; समीर खान गंभीर जखमी
7
NPS Vatsalya Scheme: मुलांचं पेन्शन अकाऊंट, वर्षाला करू शकता ₹१००० पासून गुंतवणूक; पाहा स्कीमच्या डिटेल्स
8
पेजर हॅक झाले की मोसादने कंपन्यांसोबत डील केली; लेबनॉन बॉम्बस्फोटानंतर प्रश्न उपस्थित
9
EPFO News : EPFO मध्ये मोठ्या बदलाचे सरकारचे संकेत, फायदा होणार की नुकसान? पाहा संपूर्ण डिटेल्स
10
सूरजला ओळखता येईना पाणगेंडा, अंकिताला विचारतो दिसतो कसा? टास्कदरम्यानचा व्हिडिओ पाहून आवरणार नाही हसू
11
आजचे राशीभविष्य, १८ सप्टेंबर २०२४; खूप मोठा आर्थिक लाभ होईल, यश व कीर्ती वाढेल
12
ममता बॅनर्जी यांना कोर्टाने फटकारले! महिला डॉक्टरांना नाईट शिफ्टपासून रोखू नका
13
देशभरातील बुलडोझर कारवाईवर बंदी, आमच्या आदेशाशिवाय बांधकामे पाडू नका: सर्वोच्च न्यायालय
14
राजधानीत 'आतिशी 'बाजी, केजरीवाल यांचा राजीनामा; आतिशी मार्लेना दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री होणार
15
मोहना सिंगची 'गगनचुंबी' झेप! बनली तेजस फायटर फ्लीटमधील पहिली महिला फायटर पायलट
16
'दगडूशेठ'च्या बाप्पांची श्री उमांगमलज रथातून सांगता मिरवणूक उत्साहात; भाविकांची झुंबड
17
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रावरील शस्त्रक्रिया यशस्वी; दुखापतग्रस्त हाताने खेळलेला 'डायमंड लीग'
18
अचलपूर तालुक्यात गणेश विसर्जना करण्यासाठी गेलेले दोन कर्मचारी पूर्णा नदीपात्रात गेले वाहून
19
हातगाडी लावण्यावरून चाकू हल्ल्यात एकाचा खून; कोल्हापूरच्या आराम कॉर्नर येथील घटना
20
जळगाव जामोदमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीवर दगडफेक, तरुण जखमी; पोलिसांचा हस्तक्षेप

जी-20 सदस्य देशांनी केला दहशतवादाचे कंबरडे मोडण्याचा संकल्प

By admin | Published: July 08, 2017 6:49 AM

जर्मनीतील हॅम्बर्ग येथे सुरू असलेल्या जी-20 संमेलनातील सर्व नेत्यांनी दहशतवादाविरोधात आपली स्पष्ट भूमिका मांडली. संमेलनाच्या शेवटी प्रसिद्ध

 ऑनलाइन लोकमत

हॅम्बर्ग, दि. 8 - जर्मनीतील हॅम्बर्ग येथे सुरू असलेल्या जी-20 संमेलनातील सर्व नेत्यांनी दहशतवादाविरोधात आपली स्पष्ट भूमिका मांडली. संमेलनाच्या शेवटी प्रसिद्ध करण्यात आलेल्या संयुक्त निवेदनात जी-20 नेत्यांनी जगभरातील दहशतवादी कारवायांचा तीव्र शब्दात निषेध केला. तसेच दहशत आणि दहशतवाद्यांना आर्थिक रसद पुरवणाऱ्यांविरोधात एकजूट करण्याची घोषणा केली. 
जी-20 संमेलनात जगातील आघाडीच्या देशांचे नेते म्हणाले, " दहशतवादाच्या प्रसारासाठी इंटरनेट आणि सोशल मीडियाचा उपयोग होऊ नये, यासाठी सर्व देश खाजगी विभागासोबत मिळून काम करतील." यावेळी सर्व देशांमध्ये दहशतवादासंदर्भातील माहितीची देवाणघेवाण करण्याबाबतही एकमत झाले. जेव्हा दहशतवाद्यांना जगात कुठेही सुरक्षित आसरा आणि आर्थिक मदत मिळणार नाही, तेव्हाच दहशतवादाचा खात्मा करणे शक्य होईल, असेही या नेत्यांनी सांगितले.  
कार्यक्रमाच्या अखेरीच दहशतवादाच्या मुद्द्यावर बोलताना जी-20 देशांचे नेते म्हणाले, दहशतवाद हा आज एक जागतिक आजार बनला आहे. त्यामुळे सर्वांनी मिळून त्याच्याशी लढण्याची गरज आहे. दहशतवाद्यांची जगातील आश्रयस्थाने नष्ट झाली पाहिजेत." 
त्याआधी जी-20 संमेलनात  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवादाविरोधात कडक भूमिका मांडली होती. मोदींनी यावेळी दहशतवादाविरोधात लढा देण्यासाठी 10 मोठ्या योजनांची घोषणा केली. दहशतवादाचा बीमोड करण्यासाठी एक अ‍ॅक्शन प्लानच जगासमोर ठेवला. 
मोदींनी दहशतवादाविरोधात जगातील इतर देशांना एकत्र येण्याचे आवाहनही केले इसिस, अल कायदा या दहशतवादी संघटनांप्रमाणेच पाकिस्तानल्या दहशतवादी संघटना कार्यरत आहेत आणि दहशतवाद पसरवत आहेत. मिडल ईस्टमध्ये अल कायदा, दक्षिण आशियात लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मद, हक्कानी नेटवर्क आणि नायजेरियात बोको हरम यांसारख्या दहशतवादी संघटनांनी अनेक देशांत उच्छाद मांडला आहे. या संघटनांचे दहशतवादी निरपराध लोकांचे जीव घेऊन समाजात दुही माजवण्याचं काम करत आहेत. 
तरुणांना दहशतवादी संघटनांमध्ये सहभागी करून घेण्यासाठी सायबर स्पेस, इंटरनेट, सोशल मीडिया यांचाही हे दहशतवादी सर्रास वापर करत आहेत. दहशतवादाचा सामना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 10 सूत्रं जगासमोर ठेवली आहेत. मोदींच्या दहशतवादाविरोधातल्या लढ्याचं जर्मनीचे चॅन्सलर एंजेला मार्केल यांनीही तोंडभरून कौतुक केले आहे. दहशतवादाविरोधात सगळ्या देशांनी एकत्र यायला हवे आणि त्याचा बीमोड केला पाहिजे, असेही मोदी म्हणाले आहेत.