शहरं
Join us  
Trending Stories
1
Explainer: हरयाणाच्या निकालाने वाढवलं महाविकास आघाडीचं 'टेन्शन'; चार मुद्दे इथेही पडू शकतात भारी!
2
हरियाणा निकालाचे पडसाद महाराष्ट्रात; उद्धव ठाकरे आक्रमक, "CM पदाचा चेहरा.."
3
काँग्रेसचा हरयाणात पराभव; कुमारी शैलजा म्हणाल्या,'वेळेवर मौन बाळगणे..."
4
Haryana Assembly Election Results 2024 हरियाणात भाजपचा विजयी रथ का रोखू शकली नाही काँग्रेस? ही आहेत 5 महत्वाची कारणं
5
Haryana Jammu & Kashmir Assembly Election Results 2024 : हरियाणा-जम्मू काश्मीरमध्ये भाजपनं किती मुस्लिमांना दिलं होतं तिकीट? किती जिंकले?
6
अयोध्या आणि बद्रीनाथमध्ये BJP चा पराभव; जम्मू-काश्मीरमध्ये माता वैष्णोदेवीने दिला आशीर्वाद
7
अवघ्या २०० दिवसांत 'त्यांनी' सूत्रं हलवली, पुन्हा भाजपाची सत्ता आणून दाखवली! हरयाणातील 'मॅन ऑफ द मॅच' 
8
Haryana, Jammu & Kashmir Assembly Election Results 2024 Live: जम्मू काश्मीरचा अंतिम निकाल हाती, पाहा कुठल्या पक्षाला किती जागा...
9
निवडणुकीपूर्वीची भाजपाची 'अशी' रणनीती; ज्यानं हरियाणात बिघडला काँग्रेसचा खेळ
10
जुलाना दंगल! Vinesh Phogat नं मारलं मैदान; WWE रेसलिंगमधील 'राणी'चं डिपॉझिट जप्त
11
"भाजपाशी थेट लढाई असते तिथे काँग्रेस कमीच पडते"; ठाकरे गटाच्या प्रियंका चतुर्वेदी यांचा खोचक टोला
12
Haryana Results 2024: भाजपाने हरयाणा जिंकले, पण पाच मंत्री हरले; कोणी केला पराभव?
13
देशातील सर्वात श्रीमंत महिलेला भाजपनं तिकीट नाकारलं, पण अपक्ष म्हणून निवडणूक लढविली अन् जिंकलीही...
14
जम्मू-काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्सची 'बाजी', पण भाजपा 'बाजीगर'; जागा वाढल्या अन्...
15
सूरज चव्हाण बिग बॉस जिंकल्यावर मराठी अभिनेत्री म्हणते, 'छपरीपणा सुरु करायला हवा...'
16
हरियाणातील निकालामुळे राज्यात काँग्रेसवर दबाव?; पृथ्वीराज चव्हाणांनी मांडली भूमिका
17
भाजपची रणनीती कामी आली; हरयाणात 'ऑल इज वेल', शेतकरी-जवान नाराज नाहीत..!
18
"तुम्ही मला मत दिलं, तर मी तुम्हाला चंद्रावर घर देईन", उद्धव ठाकरे असं का म्हणाले?
19
SEBI नं १०० पेक्षा अधिक स्टॉक ब्रोकर्सना पाठवली नोटीस, काय आहे कारण; जाणून घ्या
20
कोण आहेत मेहराज मलिक? ज्यांच्यासाठी अरविंद केजरीवालांचा 'झाडू' चालला; भाजपचा किती मतांनी केला पराभव?

G20 Summit : जी-२०चे अध्यक्षपद मिळणे भारतीयांसाठी अभिमानास्पद - नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2022 7:35 AM

G20 Summit : भारत जी-२० गटाचे अध्यक्षपद भारताला मिळणे ही प्रत्येक भारतीयासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे. या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात भारत अतिशय कृतिशील व सर्वसमावेशक धोरण स्वीकारणार आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

बाली : भारत जी-२० गटाचे अध्यक्षपद भारताला मिळणे ही प्रत्येक भारतीयासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे. या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात भारत अतिशय कृतिशील व सर्वसमावेशक धोरण स्वीकारणार आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. जगात वाढलेले भू-राजकीय तणाव, आर्थिक मंदी, अन्नधान्य, ऊर्जा स्त्रोतांच्या गगनाला भिडलेल्या किमती या गोष्टींचे तडाखे बसत असतानाच्या काळात भारताकडे हे अध्यक्षपद आले आहे, याची जाणीव मोदी यांनी आपल्या भाषणात करून दिली.

बाली येथे आयोजित जी-२० गटाच्या दोन दिवसीय परिषदेचा बुधवारी समारोप झाला. त्याआधी झालेल्या समारंभात इंडोनेशियाने भारताला पुढील एक वर्षासाठी या गटाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली. रशियाने युक्रेनवर लादलेले युद्ध, जागतिक अर्थव्यवस्था रुळावर येण्यासाठी करावयाच्या उपाययोजना या मुद्द्यांवर या परिषदेत विविध देशांमधील मतभेद उघड झाले होते. 

त्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, अध्यक्षपदाच्या काळात भारत नवीन संकल्पना मांडेल, प्रत्यक्ष कृतीवर भर देईल. कोरोनाचा जगावर झालेला परिणाम दूरगामी आहे. त्याशिवाय अनेक प्रश्न आ वासून उभे आहेत. अशा स्थितीला सामोरे जाताना भारत अतिशय सर्वसमावेशक भूमिका स्वीकारणार आहे. (वृत्तसंस्था)

डिजिटल क्रांतीचे फायदे प्रत्येकाला मिळावेत जी-२० गटाचा नवा अध्यक्ष असलेल्या भारताच्या कार्यकाळाला येत्या १ डिसेंबरपासून प्रारंभ होईल. जी-२० परिषदेतील एका स्वतंत्र सत्रात मोदी म्हणाले की, डिजिटल क्रांतीचे फायदे मानवी समूहाच्या लहानशा हिश्शालाच मिळता कामा नये. प्रत्येकाला डिजिटल क्रांतीचे फायदे मिळावेत, यासाठी येत्या १० वर्षांत प्रयत्न केले पाहिजेत. 

दरवर्षी ३ हजार भारतीयांना नोकरीसाठी ब्रिटनचा व्हिसादरवर्षी भारतातील १८ ते ३० वर्षे वयोगटातील ३ हजार पदवीधर युवकांना ब्रिटनने नोकरीसाठी व्हिसा देण्याचे ठरविले आहे. या व्हिसाची मुदत दोन वर्षे असणार आहे. ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी जी-२० गटाच्या बाली येथील परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यावेळी झालेल्या चर्चेनुसार ही योजना जाहीर करण्यात आली आहे.

नैसर्गिक स्रोतांवरून जगात वादंग : माेदीपंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, नैसर्गिक स्रोतांच्या मालकीवरून सध्या जगात वाद सुरू असून, त्यातून होणाऱ्या संघर्षाचे प्रमाण वाढले आहे. ही स्थिती पर्यावरण नुकसानीचे मोठे कारण बनली आहे. त्यामुळे पृथ्वीच्या सुरक्षित भविष्यासाठी योग्य पावले उचलणे आवश्यक आहे.

जी-२०च्या बैठका होणार विविध राज्यांमध्ये विकासासाठी उपयुक्त माहिती’ हे सूत्र स्वीकारून भारत जी-२० गटाच्या अध्यक्षपदाच्या काळात आपले कामकाज करणार आहे. हे अध्यक्षपद मिळणे हे प्रत्येक भारतीयासाठी अभिमानास्पद आहे. जी-२० गटाच्या बैठका भारतातील विविध राज्ये, शहरांमध्ये आयोजिण्यात येतील. भारतामध्ये विविध परंपरा व सांस्कृतिक समृद्धी आहे. त्याचा अनुभव जी-२० देशांना द्यावा, अशी आमची इच्छा आहे.      - नरेंद्र मोदी, पंतप्रधान  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारत