शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : "बंगालमध्ये पुरामुळे विध्वंस, अनेक जिल्हे बुडाले"; ममता बॅनर्जींनी मोदींना लिहिलं पत्र, मागितली मदत
2
नांदेडमध्ये भाजपाला मोठा धक्का, भास्करराव पाटील खतगावकरांची समर्थकांसह काँग्रेसमध्ये घरवापसी 
3
Video : जंगलात फिरताना चुकून अस्वलाच्या घरात गेला अन्...; पहा इन्फ्लूअन्सर काय घडलं?
4
ऑनलाईन गेमच्या नादात JEE क्वालिफाय तरुणावर ९६ लाखांचं कर्ज; आयुष्य झालं उद्ध्वस्त, म्हणाला...
5
सर्वोच्च न्यायालयाचे यूट्यूब चॅनल हॅक, सगळे व्हिडीओ गायब, काय दिसतंय?
6
संग्रामसाठी पत्नी मैदानात; अंकिता, पॅडी कांबळेसह ट्रोलर्सला दिलं सडेतोड उत्तर, पाहा Video
7
अंबानींच्या ₹1च्या शेअरनं दिला खटा-खट परतावा, कर्ज कमी होताच पाडतोय पैशांचा पाऊस, करतोय मालामाल!
8
पगारातून पूर्ण होत नव्हते शौक, यूट्युबवरून शोधलं बनावट नोटा छापण्याचं तंत्र आणि..., ६ जण अटकेत 
9
होणारी सून निघाली हरवलेली मुलगी, नवऱ्याच्या आईला लग्नमंडपात कळलं सत्य अन् मग...
10
शनिवारी संकष्ट चतुर्थी: तुमची साडेसाती सुरु आहे? ‘हे’ उपाय अवश्य करा; बाप्पा-शनी शुभ करतील! 
11
एलन मस्कही चक्रावले! टेस्लाच्या सायबर ट्रकची रशिया-युक्रेन युद्धात एन्ट्री; सात किमीपर्यंत गनचा मारा
12
FSSAI चौकशी करणार, दोषींवर कारवाई होणार; तिरुपती लाडू वादावर आरोग्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
13
'आप'कडून अरविंद केजरीवालांसाठी सरकारी निवासस्थानाची मागणी, निवडणूक आयोगाच्या नियमांचा दिला हवाला 
14
पितृपक्षात संकष्टी चतुर्थी: ‘असे’ करा व्रत, गणपती होईल प्रसन्न; पाहा, चंद्रोदय वेळ, मान्यता
15
शाळा-कॉलेजात टॉपर, १३ गोल्ड मेडल; सरकारी अधिकारी होण्यासाठी नाकारली परदेशातील नोकरी
16
पितृपक्ष: तुळस ठरेल भाग्यकारक, ‘हे’ उपाय करा; शुभ-लाभ मिळवा, पितरांसह होईल लक्ष्मी कृपा!
17
'...तर आज काश्मीर पाकिस्तानचा भाग असता', मेहबुबा मुफ्ती यांच्या वक्तव्याने नवा वाद
18
एकीकडे सुरक्षेची चिंता, तर दुसरीकडे दुबईत शॉपिंग करताना दिसला सलमान खान; Video व्हायरल
19
'कुछ कुछ होता है' मधील शाहरुखची लेक 'अंजली' आता दिसते अशी, फोटो पाहून तुम्हीही व्हाल थक्क
20
Haryana Election : "आम्हाला संधी मिळाली तर अधिकारी...", काँग्रेस उमेदवार विनेश फोगाटचा मोठा दावा

पाणी द्या हो.. 25 देशांवर येणार भीषण संकट; १९६० पासून पाण्याची मागणी दुपटीहून अधिक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2023 1:34 PM

आफ्रिकी देशांमध्ये स्थिती अधिक गंभीर

लोकमत न्यूज नेटवर्क, वॉशिंग्टन: जगभरातील एक चतुर्थांश लोकसंख्या राहत असलेले तब्बल २५ देश गंभीर पाणीटंचाईचा सामना करीत आहेत. वर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूटच्या एक्वाडस्ट वॉटर रिस्क ॲटलसमध्ये हे चित्र समोर आले आहे. टंचाईचा सामना करीत असलेल्या देशांमध्ये भारताचा क्रमांक २४ व्या स्थानी आहे. जगभरातील निम्म्या लोकसंख्येला म्हणजेच सुमारे ४०० कोटी लोकांना दरवर्षी किमान महिनाभरासाठी टंचाईला सामोरे जावे लागते. जागतिक स्तरावर विचार केला तर १९६० पासून पाण्याची मागणी दुपटीहून अधिक वाढली आहे.

आफ्रिकी देशांमध्ये स्थिती अधिक गंभीर

  • ज्या देशांमध्ये नागरिक उपलब्ध पाण्याचा जवळपास पूर्णपणे वापर करतात तिथे पाण्याची अत्यंतिक चणचण आहे असे म्हटले जाते. या स्थितीत कमी दुष्काळ आला तरी गंभीर स्थिती उद्भवू शकते.
  • मध्य पूर्व आणि उत्तर आफ्रिकेत स्थिती गंभीर आहे. या भागात ८३ टक्के लोकसंख्येला पाण्याची चणचण जाणवते आहे. दक्षिण आशियामध्ये ७४ टक्के लोकसंख्येला गंभीर पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.

भारताच्या जीडीपीवर परिणाम 

जगभरातील जवळपास ६० टक्के लोकसंख्येला २०५० पर्यंत वर्षभरातून एका महिनाभरासाठी पाण्याच्या गंभीर टंचाईचा सामना करावा लागणार आहे. २०५० मध्ये भारत, मेक्सिको, इजिप्त आणि तुर्कस्तान या चार देशांच्या निम्म्याहून अधिक जीडीपीचे नुकसान केवळ पाण्याच्या कमतरतेमुळे होणार आहे.

खाद्यसुरक्षेवरही संकट

पाण्याच्या टंचाईमुळे देशातील औद्योगिक उत्पादनाला मोठा फटका बसतो. वीजनिर्मितीही घटते. शेती उत्पादनांवर गंभीर परिणाम होतो. पाणीटंचाईमुळे जगासमोर खाद्यसुरक्षेचे संकट उभे राहिले आहे. जगभरातील ऊस, गहू, तांदूळ आणि मका उत्पादक पाणीटंचाईमुळे मोठ्या संकटात सापडले आहेत. २०५० पर्यंत जगाची लोकसंख्या १० अब्जावर पोहोचण्याचा अंदाज आहे. इतक्या लोकसंख्येला पुरेल इतके अन्नधान्य पिकवावे लागणार आहे. यासाठी २०१० तुलनेत अन्नधान्याचे उत्पादन जवळपास ५६ टक्क्यांनी वाढवावे लागणार आहे.

टॅग्स :water shortageपाणीकपातWaterपाणी