शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
VIDEO: क्रिकेट मॅचमध्ये तुफान राडा! खेळाडूंमध्ये हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी झाली तुडवातुडवी
3
"हिंदूंसोबत विश्वासघात, देव..."; तिरुपतीच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी प्रकरणावरून भाजपची प्रतिक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदर्भातील स्वागतासाठी भाजपाची जय्यत तयारी, तर काँग्रेसचे १० सवाल
5
सातारा: अल्पवयीन मुलाचा ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; घराच्या टेरेसवर घडला किळसवाणा प्रकार
6
हातात खराटा अन् स्वच्छतेचा मंत्र... नागपुरात रेल्वे व्यवस्थापकांनी केली स्थानकावर साफसफाई
7
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
8
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
9
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
10
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
11
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
12
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
13
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
14
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
15
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
16
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
17
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
18
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
20
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश

"बांगलादेशातील परिस्थिती जास्त चिंताजनक नाही"; सर्वपक्षीय बैठकीत सरकारने दिलं स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2024 11:33 AM

बांगलादेशच्या संकटावर चर्चा करण्यासाठी भारत सरकारने सकाळी १० वाजता सर्वपक्षीय बैठक बोलावली होती.

All Party Meeting on Bangladesh Situation : शेख हसीना यांनी मंगळवारी बांगलादेशच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊन देश सोडला. शेख हसीना यांनी लष्करी हेलिकॉप्टरमधून देश सोडून भारतात आश्रय घेतला. आरक्षणावरून दोन महिने सुरु असलेल्या गदारोळानंतर बांगलादेशात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झालीय. बांगलादेशच्या या संकटावर भारताचे बारीक लक्ष आहे. बांगलादेशातल्या परिस्थितीबाबत परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक झाली. या बैठकीला गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि काँग्रेस नेते राहुल गांधी उपस्थित होते. यावेळी सरकारने बांगलादेशातील भारतीयांबाबत भूमिका स्पष्ट केली आहे.

बांगलादेशातील आरक्षणविरोधी हिंसक आंदोलनांदरम्यान पंतप्रधान शेख हसीना यांनी अचानक राजीनामा देऊन देश सोडल्याने तेथे अराजकतेची स्थिती निर्माण झाली आहे. बांगलादेशच्या संकटावर चर्चा करण्यासाठी भारत सरकारने सकाळी १० वाजता सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी या बैठकीत सदस्यांना बांगलादेशातील परिस्थितीबाबत माहिती दिली. यानंतर सरकार संसदेत याविषयी महत्त्वाची देणार आहे.

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, हिंसाचारग्रस्त देशातील १२,०००-१३,००० भारतीयांना बाहेर काढण्यासाठी बांगलादेशातील परिस्थिती इतकी चिंताजनक नव्हती असे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी मंगळवारी सांगितले . बांगलादेशातील सरकारविरोधी निदर्शने आणि ३०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्यामुळे शेख हसिना यांच्या नेतृत्वाखालील सरकार पडल्यानंतर सरकार बांगलादेशातील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे, असेही एस जयशंकर म्हणाले.

"सुमारे ८,००० भारतीय विद्यार्थी हे बांगलादेशातील हिंसाचारानंतर भारतात परतले आहेत. सोमवारी पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊन भारतात पळून आलेल्या हसिना यांच्याशी सरकारने थोडक्यात चर्चा केली आहे. सरकारला हसीना यांला त्यांच्या भविष्यातील योजना ठरवण्यासाठी थोडा वेळ द्यायचा आहे,” असे जयशंकर यांनी सांगितले.

यावेळी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी यासाठी एक दीर्घकालीन रणनीती असली पाहिजे, ज्यामध्ये बांगलादेशमध्ये निवडणुका होईपर्यंत अंतरिम सरकारचे शासन असेल, असे म्हटलं. यावर बोलताना एस जयशंकर म्हणाले की, "यासंदर्भात परिस्थिती विकसनशील आहे. जे सरकार येईल ते भारताशी योग्य व्यवहार करेल."

टॅग्स :BangladeshबांगलादेशS. Jaishankarएस. जयशंकरIndiaभारत