शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे तर व्होट कटिंग मशिन..."; 'परिवर्तन महाशक्ती' तिसऱ्या आघाडीवर संजय राऊत बरसले
2
भाजपाची ऑफर नाकारली, काँग्रेसमध्ये घरवापसी; खतगावकरांचा पुढचा प्लॅन ठरला?
3
Kolkata Doctor Case : "मृत्यूच्या काही तास आधी लेकीशी बोललो होतो..."; डॉक्टरच्या वडिलांनी CBI ला केली 'ही' विनंती
4
वडीगोद्री ते जालना मार्गावर बस - टेम्पोचा भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, १७ जखमी
5
Exclusive: 'युध्रा' मधून साऊथ ब्युटीचं हिंदीत पदार्पण, म्हणाली, "सिनेमात केवळ बाहुली बनून..."
6
अयोध्येत पुन्हा होणार प्राणप्रतिष्ठापना, २२ जानेवारीचा मुहुर्त, तयारीला सुरुवात, नेमकं काय होणार?
7
'बिग बॉसचे पहिले 4 सिझन गाजले नाहीत', केदार शिंदेंच्या वक्तव्यावर मेघा धाडेची लक्षवेधी कमेंट
8
तिरुपती लाडू प्रकरण : पवन कल्याण म्हणाले, "आता सनातन धर्म रक्षण बोर्ड स्थापन करण्याची वेळ आलीय"
9
'या' कंपनीच्या गोल्ड लोन व्यवहारावरील बंदी हटवली; रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय; शेअरमध्ये तुफान तेजी
10
शिवसेना-भाजपा वाद संपेना; आमदार योगेश कदमांविरोधात भाजपा पदाधिकारी संतापले
11
४०० पारचा प्रयत्न फसला; ३७ धावांत ४ विकेट्स! ३७६ धावसंख्येवर आटोपला टीम इंडियाचा पहिला डाव
12
जुना अनुभव फार डेंजर, बॅकअप प्लॅन तयार ठेवलाय; अपक्ष आमदाराचा महायुतीला सूचक इशारा
13
Piccadily Agro Share : ही तर कमालच! १ लाखांचे झाले १ कोटी रुपये, मद्य तयार करणाऱ्या कंपनीकडून गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस
14
आमदार आदित्य ठाकरेंना निमंत्रण; मनसेच्या 'व्हिजन वरळी'त काका-पुतणे एकत्र येणार?
15
Post Office Saving Scheme : Post Office ची सुपरहिट स्कीम! ५ वर्षांपर्यंत दर महिन्याला मिळतील ₹९,२५०; पाहा स्कीमचे फायदे
16
iPhone 16 ची भारतात विक्री सुरू होताच खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड; मुंबई, दिल्लीत लागल्या रांगा  
17
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
18
मारु का सोडू? संभ्रमात पडल्यामुळं फसला जड्डू! शतकासह 'द्विशतकी' डावही हुकला
19
Aadhaar Card : Aadhaar मध्ये केवळ एकदा करू शकता 'हा' बदल; अनावधानानेही करू नका 'ही' चूक; पुन्हा संधी मिळणार नाही
20
उर्वशी रौतेला क्रिकेटर ऋषभ पंतला करतेय डेट? अभिनेत्री म्हणाली...

राष्ट्रहितासाठी हाफिज सईद नजरकैदत - पाकिस्तान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 01, 2017 9:36 AM

डोनाल्ड ट्रम्प यांनी मुस्लिमबहुल देशांतील नागरिकांना अमेेरिका प्रवेशबंदी केल्यानंतर पाकिस्तानची घाबरगुंडी उडाली आहे. हाफिज सईदला राष्ट्रहितासाठी नजरकैद ठेवले असून आम्हाला भारतासोबत युद्ध नकोय, अशी भूमिका पाकिस्तानने मांडली आहे.

ऑनलाइन लोकमत

इस्लामाबाद, दि. 1 -  सात मुस्लिम बहुल देशांतील नागरिकांना अमेरिका प्रवेश बंदी घालण्यात आल्यानंतर या यादीत आगामी काळात पाकिस्तानाचाही समावेश होणार असल्याचे अमेरिकेकडून देण्यात आले आहेत. यामुळे पाकिस्तानची घाबरगुंडी उडाल्याचे पाहायला मिळत आहे.  

या पार्श्वभूमीवर 'जमात-उद-दावाचा प्रमुख आणि कुख्यात दहशतवादी हाफिज सईदला राष्ट्रहितासाठी नजरकैद ठेवण्यात आले असून भारतासोबत आम्हाला युद्ध करायचे नाही', अशी भूमिका पाकिस्तानी सैन्याने मांडली आहे. 'राष्ट्रहितासाठी घेण्यात आलेल्या धोरणात्मक निर्णयांतर्गत हाफिज सईदवर नजरकैदेची कारवाई करण्यात आली आहे', असे पाकिस्तानी सैन्याने मंगळवारी सांगितले.  शिवाय, आम्हाला भारतासोबत युद्ध करायचे नाही, असा दावा करतेवेळी या निर्णयाला पाकिस्तानची कमजोरी समजू नका, अशा फुशारक्याही पाकिस्ताननं मारल्या आहेत. 
 
पाकिस्तानातील इंटर-सर्विसेज पब्लिक रिलेशन्स (ISPR)चे डीजी मेजर जनरल आसिफ गफूर यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना हे विधान केले आहे. पाकिस्तानातील वृत्तपत्र 'डॉन'ने दिलेल्या माहितीनुसार, आसिफ गफूर यांनी हाफिज सईदला नजरकैदेत ठेवण्यामागे कोणत्याही अन्य देशांचा दबाव असल्याच्या बातम्यांना फेटाळून लावले. जमात-उद-दावाचा प्रमुख आणि मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईदला सोमवारी पाकिस्तानात नजरकैदेत ठेवण्यात आले. पाकिस्तान सरकारकडून जमात-उद-दावावरही कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 
 
(हाफिज सईदवर विश्वासार्ह कारवाई करा, भारतानं पाकला ठणकावलं)
 
दरम्यान, आसिफ गफूर यांनी भारत-पाकिस्तानमधील वाढलेल्या तणावासंदर्भात भाष्य करताना सांगितले की, 'आम्हाला कुणाही सोबत युद्ध नकोय. युद्ध हे कोणत्याही समस्येवरील समाधान नाही', असा सभ्यपणाचा आव आणला. मात्र याचवेळी काश्मीरचा मुद्दा उपस्थित करत 'संयुक्त राष्ट्रांच्या चर्चेच्या माध्यमातून आम्हाला काश्मीर समस्येवर तोडगा हवाय, मात्र शांततेसाठीच्या आमच्या इच्छेला कमजोरी समजण्याची चूक करू नका', अशी दुटप्पी भूमिकाही पाकिस्तानने यावेळी मांडली.
 
डॉनने दिलेल्या बातमीनुसार, आसिफ गफूर यांनी भारताने पाकिस्तानविरोधात केलेल्या सर्जिकल स्ट्राईक कारवाईला 'ड्रामा'चा एक 'भाग' असल्याचा थयथयाट केला. शिवाय, काश्मीरच्या मुद्यावरुन जगाचे लक्ष भरकटवण्यासाठी भारत असे वागत असल्याचा कांगावाही त्यांनी केला.