शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

हाजी सय्यद सलमान चिश्ती यांना राजदूतपद बहाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2024 14:21 IST

जगातील शांतता, सहिष्णुता, एकजूट वाढविण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने ७२/१३० या प्रस्तावाद्वारे शांततामय सहजीवन दिन साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या आंतरराष्ट्रीय दिनानिमित्त जिनिव्हा येथे आयोजित एका कार्यक्रमात हाजी सय्यद सलमान चिश्ती यांना सन्मानित करण्यात आले. त्याप्रसंगी आणखी काही नामवंतांचाही सत्कार करण्यात आला.

जिनिव्हा :  संयुक्त राष्ट्रांतर्फे दरवर्षी १६ मे रोजी शांततामय सहजीवन आंतरराष्ट्रीय दिन साजरा करण्यात येतो. यंदाच्या वर्षी या दिनानिमित्त दरगाह अजमेर शरीफचे प्रमुख व चिश्ती फाऊंडेशनचे अध्यक्ष हाजी सय्यद सलमान चिश्ती यांची राजदूत म्हणून निवड करून त्यांचा सन्मान करण्यात आला. 

जगातील शांतता, सहिष्णुता, एकजूट वाढविण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने ७२/१३० या प्रस्तावाद्वारे शांततामय सहजीवन दिन साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या आंतरराष्ट्रीय दिनानिमित्त जिनिव्हा येथे आयोजित एका कार्यक्रमात हाजी सय्यद सलमान चिश्ती यांना सन्मानित करण्यात आले. त्याप्रसंगी आणखी काही नामवंतांचाही सत्कार करण्यात आला.

‘शांतता, ऐक्य यांचा प्रसार करत राहणार’चिश्ती फाऊंडेशनचे अध्यक्ष असलेले हाजी सय्यद सलमान चिश्ती हे आंतरधर्मीय सद्भाव व जागतिक शांतता या तत्वांचा प्रसार केला आहे. त्यांनी भारतासह १००हून अधिक देशांत सांप्रदायिक सद्भाव, सामाजिक न्याय, सांस्कृतिक मूल्ये या तत्वांचा प्रचार व प्रसार केला. हाजी सय्यद सलमान चिश्ती म्हणाले की, जगात शांतता व ऐक्य यांना प्रोत्साहन देण्यासाठी सर्वांनी कार्य करत राहिले पाहिजे. कोणाशीही भेदभाव न करण्याची शिकवण भारताने दिली आहे. त्याचा प्रसार साऱ्या जगात करण्याचे काम यापुढे करत राहीन. 

टॅग्स :united nationsसंयुक्त राष्ट्र संघ