शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
3
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
4
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
5
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
6
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
7
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
8
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
9
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
10
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
11
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
12
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
13
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
14
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
15
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
16
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
17
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
18
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
19
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
20
मायेची फुंकर! ब्रेकअप-स्ट्रेस- रागावर नियंत्रण यासाठी थेरपी देणारी उशी,अनेक दुखण्यांवर औषध

'मला संसद बरखास्त करण्यासाठी भाग पाडले, हा राजकीय निर्णय', ओलींचे स्पष्टीकरण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2021 15:05 IST

Nepal Political Crisis: नेपाळ कम्युनिस्ट पक्षाच्या वाढत्या संघर्षा दरम्यान 20 डिसेंबर 2020 रोजी पंतप्रधान के.पी. ओली यांनी राष्ट्रपतींना त्याच दिवशी संसद बरखास्त करण्याची शिफारस केली होती.

ठळक मुद्देसंसद बरखास्त केल्यानंतर पंतप्रधान ओली यांनी मध्यावधी निवडणुकांसाठी 30 एप्रिल आणि 10 मे या तारखांची घोषणा केली होती.

काठमांडू : नेपाळचे काळजीवाहू पंतप्रधान के पी शर्मा ओली यांनी संसद बरखास्त करण्याचा निर्णय घेण्यास भाग पाडल्याचे म्हटले आहे. न्यायालयात या निर्णयाच्या आव्हानाशी संबंधित प्रश्नावर ओली म्हणाले, "संसद बरखास्त करणे एक राजकीय पाऊल होते आणि यामध्ये न्यायालयीन आढाव्यासाठी अधिकृत परवानगी नाही. पक्षातील काही नेत्यांनी मला हा निर्णय घेण्यास भाग पाडले."

द काठमांडू पोस्टच्या वृत्तानुसार, पीएम ओली यांनी 25 डिसेंबरच्या सर्वोच्च न्यायालयाच्या कारणे दाखवा नोटीसला उत्तर म्हणून अॅटर्नी जनरल कार्यालयामार्फत उत्तर दिले आहे. सर्वोच्च न्यायालयाला दिलेल्या 11 पानांच्या उत्तरात पंतप्रधान ओली म्हणाले, "संसद बरखास्त करण्याची शिफारस करणे आणि संसद बरखास्त करणे, दोन्हीही पूर्णपणे राजकीय निर्णय आहेत. सर्वोच्च न्यायालयाने स्वतःला हे सिद्धांत मांडले आहे की अशा विषयांवर घटनात्मक आणि कायदेशीर वैधतेचे प्रश्न न्यायालयीन आढाव्याचे विषय नसावेत. पक्षात वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर मला असे वाटले नाही की सरकार निवडणूक जाहीरनाम्यात दिलेली आश्वासने पूर्ण करू शकेल."

नवीन जनादेशसाठी आपल्याला संसद बरखास्त करण्यास भाग पाडले, कारण सरकार पक्षातील संघर्षात अडकले होते. आपला स्वार्थ केवळ समृद्ध नेपाळ आणि सुखी नेपाळी लोकांकरिता आहे, असेही ओली यांनी आपल्या लेखी उत्तरात नमूद केले आहे. संसद बरखास्त केल्यानंतर पंतप्रधान ओली यांनी मध्यावधी निवडणुकांसाठी 30 एप्रिल आणि 10 मे या तारखांची घोषणा केली होती. सरकार आणि संसदेवर पक्षाच्या अंतहीन समस्यांचा परिणाम होत असल्याने त्यांचे हे कार्य 'गरजेच्या सिद्धांतवर' आधारित असल्याचा दावा ओली यांनी केला आहे.

नेपाळ कम्युनिस्ट पक्षाच्या वाढत्या संघर्षा दरम्यान 20 डिसेंबर 2020 रोजी पंतप्रधान के.पी. ओली यांनी राष्ट्रपतींना त्याच दिवशी संसद बरखास्त करण्याची शिफारस केली होती. तेव्हापासून ओली दावा करीत आहेत की पुष्प कमल दहल प्रचंड, पक्षातील माधवकुमार नेपाळ आणि इतरांनी विरोधकांनी निर्माण केलेल्या अडचणींमुळे आपल्याला हे कठोर पाऊल उचलले गेले होते. मात्र, भारतविरोधी भूमिकेमुळे ओलीची लोकप्रियता सातत्याने कमी होत होती. भारताबद्दल कठोर विचारसरणी व विधानानंतरच कम्युनिस्ट पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्त्वाने त्यांच्यावर प्रश्नचिन्ह उभे केले. ओली यांच्यावर चीन समर्थक असल्याचा आणि भारतविरोधी भूमिका घेतल्याचा आरोप आहे. 

टॅग्स :Nepalनेपाळ