शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
3
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
4
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
5
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
6
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
7
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   
8
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
9
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
10
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
11
जिद्द असावी तर अशी! अंगणवाडी ते IAS अधिकारी; ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास
12
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
13
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
14
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
15
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
16
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
17
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
18
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
19
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
20
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'

भारतासाठी महत्वाची बातमी; बांग्लादेश सरकारने रोहिंग्यां मुस्लिमांबाबत घेतला मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2024 11:56 IST

सध्या बांग्लादेशात दहा लाखांहून अधिक रोहिंग्या छावण्यांमध्ये राहतात.

ढाका: बांग्लादेशात शेख हसीना यांचे सरकार कोसळून एक महिना पूर्ण झाला आहे. सध्या दशात अंतरिम सरकार स्थापन झाले असून, मुहम्मद युनूस अंतरिम पंतप्रधान म्हणून देशाचे कामकाज पाहत आहेत. दरम्यान, युनूस यांनी रविवारी(दि.8) रोहिंग्या मुस्लिमांबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. दक्षिण आशियामध्ये राहणाऱ्या रोहिंग्या मुस्लिमांचे जलद पुनर्वसन करण्याची घोषणा त्यांनी केली आहे. 

मुहम्मद युनूस म्हणाले की, म्यानमार आणि त्याच्या सीमेला लागून असलेल्या राज्यांमध्ये सातत्याने वाढणाऱ्या हिंसाचारापासून संरक्षण करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. म्यानमारचे सत्ताधारी सैन्य आणि देशातील बौद्ध बहुसंख्य असलेले शक्तिशाली वांशिक मिलिशिया अरकान आर्मी यांच्यातील लढाई तीव्र झाल्याने सुमारे आठ हजार रोहिंग्या मुस्लिमांनी सीमा ओलांडून बांगलादेशात पलायन केले आहे. हे सर्वजण बांग्लादेशच्या कॉक्स बाजार जिल्ह्यातील छावण्यांमध्ये आधीच राहणाऱ्या दहा लाखांहून अधिक रोहिंग्या निर्वासितांमध्ये सामील झाले आहेत. त्यापैकी बहुतांश 2017 साली म्यानमार लष्कराच्या नेतृत्वाखालील क्रॅकडाउनमधून पळून आलेले आहेत.

रोहिंग्या निर्वासितांची वापसीबांग्लादेशचे परराष्ट्र मंत्री मोहम्मद तौहीद हुसेन म्हणाले की, बांग्लादेश आणखी रोहिंग्या निर्वासितांना स्वीकारू शकत नाही. मात्र हुसैन यांनी भारत आणि इतर देशांमध्ये राहणाऱ्या लोकांना परत घेण्याबाबत सूचक वक्तव्य केले आहे. राखीन राज्यातील रोहिंग्यांवर होणारे हल्ले थांबवण्यासाठी आराकान आर्मीवर अधिक दबाव आणण्याचे आवाहनही त्यांनी आंतरराष्ट्रीय समुदायाला केले आहे.

रोहिंग्या निर्वासितांचे पुनर्वसन प्रक्रियारोहिंग्या निर्वासितांना त्यांच्या मायदेशी परतण्याची फारशी आशा नाही. बांग्लादेशच्या अंतरिम सरकारने पुनर्वसन प्रयत्नांना गती देण्यासाठी इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर मायग्रेशन (IOM) सोबत बैठकही घेतली. या बैठकीनंतर युनूस म्हणाले की, पुनर्वसन प्रक्रिया सुलभ, नियमित आणि सुरळीत असायला हवी. बांगलादेशातील आयओएमचे प्रमुख अब्दुसत्तोर एसो म्हणाले की, रोहिंग्यांचे तिसऱ्या देशांमध्ये पुनर्वसन 12 वर्षांच्या कालावधीनंतर 2022 मध्ये पुन्हा सुरू झाले, परंतु यावर्षी त्यात वेग आला आहे. वॉशिंग्टनने हजारो रोहिंग्यांना युनायटेड स्टेट्समध्ये पुनर्वसन करण्याच्या आपल्या वचनबद्धतेची पुष्टी केली आहे, परंतु या प्रक्रियेला अद्याप वेग आलेला नाही.

टॅग्स :BangladeshबांगलादेशRohingyaरोहिंग्याIndiaभारत