शहरं
Join us  
Trending Stories
1
देवीचे दर्शन करून घराकडे निघालेले कोल्हापुरातील दोन भाविक अपघातात ठार, दोघे गंभीर जखमी
2
४१००० मृत्यू, मोठा विध्वंस, तरीही हमासचे सैन्य मागे हटलेले नाही; १०१ इस्रायली अजूनही ओलीस
3
श्रीकांत शिंदेंचा विश्वासू शिलेदार उद्धव ठाकरेंकडे परतला; CM एकनाथ शिंदेंना धक्का
4
Mumbai Metro 3 Opens Today: मुंबईच्या पोटातून प्रवासाला सुरुवात, मेट्रो-३ मार्गिकेवरुन सुटली पहिली गाडी
5
"चिरंजीवाचे प्रताप वडिलांनी एकदा समजून घ्यावेत"; वर्षा बंगल्याचा उल्लेख करत राऊतांचा श्रीकांत शिंदेंवर निशाणा
6
गायक अदनान सामींना मातृशोक, ७७ व्या वर्षी आईने घेतला अखेरचा श्वास
7
नितीश कुमारांनी वाढवलं भाजपाचं टेन्शन; दसऱ्यानंतर होणार राजकीय 'भूकंप'?
8
कुछ तो गडबड है दया! शिवाजी साटम यांनी सांगितलं CID मालिका बंद होण्याचं कारण
9
रायबरेलीमध्ये मोठी दुर्घटना टळली; रुळावर मातीचा ढीग, लोको पायलटने ट्रेन थांबवली अन्...
10
लाखो लोक, ट्रॅफिक जॅम, रेल्वे स्टेशन फुल पॅक आणि...; मरिना बीचवरचे धडकी भरवणारे फोटो
11
बिग बॉस मराठीच्या ग्रँड फिनालेनंतर जिनिलिया देशमुखची पोस्ट, म्हणाली, "पुढच्या पर्वासाठी..."
12
Prajakta Mali : "तुझ्यातला प्रामाणिकपणा, जिद्द..."; प्राजक्ता माळीने केलं सूरज चव्हाणचं झापुक झुपूक अभिनंदन
13
इस्रायली नागरिक अचानक भारत सोडून जाऊ लागले; पर्यटनाचे बुकिंग रद्द, विमाने फुल
14
मॉलच्या मेन गेटमधून आतही जाऊ दिलं नाही, पायऱ्यांवर पाहावी लागली वाट; Zomato चे CEO म्हणाले...
15
"...तेव्हा मला कुणी साधं भेटायलाही तयार नव्हतं..."; Bigg Boss 18 मध्ये गेलेल्या मराठी अभिनेत्रीचा कटू अनुभव
16
"एकनाथ शिंदे दावोसमध्ये हॉटेलचं बिल न देताच..." जयंत पाटलांचा मुख्यमंत्र्यांना खोचक टोला
17
'सुप्रिया सुळेंना फुकटचं खायची सवय, १५०० दिले तर पवारांच्या...', भाजप आमदाराची टीका
18
Share Market Opening : शेअर बाजाराची सकारात्मक सुरुवात; Hero, HCL मध्ये तेजी, टायटन, अदानी पोर्ट्स घसरले
19
"सिंचन घोटाळा झाल्याचं पंतप्रधान मोदींनीच कबूल केलं"; पृथ्वीराज चव्हाणांनी अजित पवारांना पुन्हा डिवचलं
20
Adani's Big Move: अदानींनी सुरू केला भारतातील 'हा' मोठा प्रोग्राम, घरातील गॅस पुरवठ्याचं चित्र बदलणार, कसा होईल फायदा?

भारतासोबत संबंध सुधारा, तरच परिस्थिती सुधारेल; पाकिस्तानी माध्यमांचा सरकारला सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2023 3:26 PM

पाकिस्तान गेल्या काही महिन्यांपासून आर्थिक संकटात सापडलाय.

पाकिस्तान गेल्या काही महिन्यांपासून आर्थिक संकटात सापडलाय. महागाई मोठ्या प्रमाणात वाढली असून तेल, डाळ, पीठांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. यामुळे देशभरात सरकारविरोधात निदर्शने केली जात आहेत. तर दुसरीकडे सरकार आयएमएफकडे कर्जासाठी प्रयत्न करत आहे. पण, अजुनही आयएमएफ ने कर्ज दिलेले नाही, यामुळे पाकिस्तानची परिस्थिती आणखी बिघडली आहे. आर्थिक परिस्थिती बिघडूनही पाकिस्तानन सरकारने भारताविरोधात बोलण्याचे थांबवलेले नाही. यापार्श्वभूमीवर आता पाकिस्तानमधील माध्यमांनी सरकारला भारतासोबत संबंध सुधारण्याचा सल्ला दिलाय.

पाकिस्तानमध्ये आता सत्ताधाऱ्यांच्या जुन्या भूमिकेतून यू-टर्न घेत भारतासोबतचे आर्थिक संबंध दृढ करण्याची वेळ आली आहे, असा सूर आळवला जात आहे. पाकिस्तानी प्रसारमाध्यमांमध्ये उठलेली ही मागणी भारताचे उपउच्चायुक्त सुरेश कुमार यांच्या विधानानंतर समोर आली आहे, यात लाहोर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या एका कार्यक्रमात बोलताना कुमार यांनी शुक्रवारी सुचवले की, अनेक दशके जुना पाकिस्तान-भारत वाद मिटला पाहिजे. यासाठी दोन्ही देशांनी सखोल आर्थिक संबंध पुन्हा प्रस्थापित केले पाहिजेत.

कुमार म्हणाले, "भारताला पाकिस्तानसोबत चांगले संबंध हवे आहेत कारण आपण आपला भूगोल बदलू शकत नाही." कुमार यांनी दोन्ही देशांना व्यापार संबंध सामान्य करण्याचे आवाहन केले. यावर पाकिसितानमधील वृत्तपत्रात संपाककीय मध्येही ही मागणी केली आहे. ' लाहोर चेंबरने आपल्या समारंभासाठी भारतीय अधिकाऱ्याला आमंत्रित करणे आणि नवी दिल्लीच्या प्रतिनिधीने संबंध सुधारण्यासाठी बोलणे हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. वृत्तपत्राने संपादकीयमध्ये लिहिले आहे की, गेल्या काही वर्षांत विषारी वक्तृत्वाच्या युगाला निरोप देण्याची वेळ आली आहे. २०१९ मध्ये पाकव्याप्त काश्मीरमधील घटनांनंतर दोन्ही देशांमधील संबंध ताणले आणि व्यापारी संबंधही संपुष्टात आले, असंही या संपादकीयमध्ये म्हटले आहे.

ICC नं काढलं अरेस्ट वॉरंट; भारत दौऱ्यावर आल्यावर पुतिन यांना अटक होऊ शकते का?

'या क्षणी हा पर्याय अशक्य वाटू शकतो, पण सध्याचे द्विपक्षीय संबंध लक्षात घेता, व्यापार संबंध पूर्ववत झाल्यास, पाकिस्तानच्या आर्थिक संकटांचे वाईट दिवस दूर होऊ शकतात. दोन्ही देशांमधील चांगले व्यापारी संबंध उपखंडात अधिक अनुकूल वातावरण निर्माण करू शकतात, असेही वृत्तपत्राने लिहिले आहे. भारत आणि आपल्या शेजारील इतर राज्यांशी व्यापार, खरेतर, व्यापक आशियाई प्रदेशात भौगोलिक-आर्थिक समज पुनर्संचयित करतो, जो पाकिस्तानसाठी फायदेशीर आहे, असंही यात म्हटले आहे.

पाकिस्तानच्या प्रमुख पाश्चात्य व्यापारी भागीदारांच्या – अमेरिका आणि युरोपीय संघाच्या – अर्थव्यवस्था मंदावल्या आहेत, असा दावाही पाकिस्तानी माध्यमांमध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे प्रादेशिक व्यापारी भागीदारांसोबत सध्याचे सुस्त असलेले संबंध सुधारणे आवश्यक आहे, असंही यात म्हटले आहे. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारत