शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
2
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
3
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
4
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
5
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
6
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
7
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
8
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
9
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
10
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
11
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
12
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू
13
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
14
सत्ता कुणाचीही येऊ देत, रामदास आठवलेंची जागा पक्की आहे- नितीन गडकरी
15
'यूपीआय'मध्ये मार्केटमध्ये PhonePe सुसाट! Google Pay, Paytm किती मागे?
16
video: दोन लाख रुपये देऊन बिहारचा तरुण बनला 'IPS' अधिकारी; पाहून पोलीसही चक्रावले...
17
"आम्ही कुणालाही सोडणार नाही!’’, तिरुपती लाडू भेसळीप्रकरणी आंध्र प्रदेश सरकार आक्रमक   
18
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
19
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
20
IND vs BAN : "मला कोणी गिफ्ट दिलं नाही...", 'सामनावीर' अश्विनची मिश्किल प्रतिक्रिया, संघाला जिंकवलं

ही वेळ योग्य नाही! पाकिस्तानच्या विजयानं इम्रान खान भलतेच खूश; भारताबद्दल बोलताना बदलला सूर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2021 7:52 AM

पाकिस्तानच्या विजयानं इम्रान खान यांना अत्यानंद; भारताला डिवचलं

इस्लामाबाद: विश्वचषक स्पर्धेत प्रथमच भारतावर मात केल्यानं पाकिस्तानमध्ये आनंदाचं वातावरण आहे. टी-२० विश्वचषक स्पर्धेत पाकिस्ताननं १० गडी राखून भारतावर मोठा विजय मिळवला. यानंतर लोकांनी गोळीबार करत विजय साजरा केला. त्यात १२ जण जखमी झाले. यानंतर आता पंतप्रधान इम्रान खान यांनी पाकिस्तानी संघाच्या विजयावर भाष्य केलं आहे.

भारतासोबतचे संबंध सुधारण्याची आवश्यकता असल्याचं मत इम्रान खान यांनी सौदी अरेबियात व्यक्त केलं. सध्याची वेळ संवाद साधण्यासाठी योग्य नाही. यामागे रविवारी झालेला भारत-पाकिस्तान सामना कारण असल्याचं खान म्हणाले. टी-२० विश्वचषक स्पर्धेत शेजारी देशाचा पराभव झाला आहे. त्यांच्याशी संबंध सुधारावेत म्हणून संवाद साधायला हवा. पण त्यासाठी ही वेळ योग्य नाही. कारण नुकताच त्यांचा पराभव झाला आहे. भारतासोबत संबंध सुधारल्यास ते दोन्ही देशांसाठी चांगलं असेल, असं खान यांनी म्हटलं. खान सध्या पाकिस्तान-सौदी गुंतवणूक परिषदेसाठी रियाधमध्ये आहेत.

रियाधमध्ये असलेल्या खान यांनी पुन्हा एकदा काश्मीर राग आळवला. भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये केवळ एकच विषय आहे आणि तो म्हणजे काश्मीर. दोन सभ्य शेजाऱ्यांप्रमाणे हा प्रश्न सोडवावा लागेल. ७२ वर्षांपूर्वी संयुक्त राष्ट्रात काश्मिरींच्या अधिकाऱ्यांबद्दल खात्री देण्यात आली होती. त्याशिवाय कोणताही मुद्दा आम्हाला महत्त्वाचा वाटत नाही, असं खान म्हणाले. 

टॅग्स :Imran Khanइम्रान खानT20 World Cupट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२१India vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तान