शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

भारताच्या मित्राला मध्यस्थीत यश येणार?; अन्यथा चीनसोबतचा तणाव पुन्हा वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2020 12:10 IST

या वाटाघाटीमध्येही LACवरील वादाचे निराकरण झाले नाही, तर दोन्ही देशांमधील राजनैतिक तणाव पुन्हा एकदा शिगेला पोहोचू शकतात.

लडाखमधील LACवर झालेल्या रक्तरंजित संघर्षानंतर भारत अन् चीनमधील तणाव विकोपाला पोहोचला आहे. चीनच्या आक्रमकपणाला भारतानंही जशास तसं उत्तर देण्याची तयारी चालवली आहे. त्याच पार्श्वभूमीवर वास्तविक नियंत्रण रेखे(LAC)वर सुरू असलेल्या तणावात मॉस्कोमध्ये होणाऱ्या शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनची (एससीओ) बैठक भारत-चीन द्विपक्षीय संबंधांसाठी निर्णायक ठरू शकते. दोन्ही देशांमधील तणाव कमी करण्यासाठी रशिया मॉस्को येथे भारत आणि चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक घेण्यासाठी प्रयत्नशील आहे. या वाटाघाटीमध्येही LACवरील वादाचे निराकरण झाले नाही, तर दोन्ही देशांमधील राजनैतिक तणाव पुन्हा एकदा शिगेला पोहोचू शकतात.वस्तुतः लष्करी व मुत्सद्दे पातळीवर अनेक फे-या बोलूनही चीनच्या वृत्तीमुळे हा वाद मिटला नाही. जयशंकर एससीओच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीला येणार आहेत, असे सूत्रांचे म्हणणे आहे. त्यांच्या चिनी समकक्ष वांग यी यांची भेट घेण्याची शक्यता आहे. एलएसी वादावर चीनकडून काही ठोस पुढाकार घेण्याची भारताची अपेक्षा आहे. हे निश्चित आहे की, जर या बैठकीवर सहमती झाली, परंतु त्यामध्ये काहीही सकारात्मक तोडगा निघू शकला नाही तर दोन्ही देशांमधील मुत्सद्दी व सैनिकी पातळीवरील संघर्ष शिगेला पोहोचतील. भारत सतत चीनला तसा निरोप देत आहे.गेल्या आठवड्यात चीनला वरच्या स्तरावरून भारतानं दोन मोठे संदेश दिले आहेत. सीडीएस बिपीन रावत म्हणाले की, हा वाद मिटविला नाही तर भारत लष्करी कारवाईचा पर्याय वापरू शकतो. तर परराष्ट्रमंत्र्यांनी 1962नंतर लडाखमधील अत्यंत तणावपूर्ण परिस्थितीचा उल्लेख केला. भारत आपल्या सार्वभौमत्वाचे रक्षण करेल, असे त्यांनी ठामपणे सांगितले. हा प्रत्यक्ष चीनला संदेश असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. भारताचा संयम सातत्याने कमी होत आहे. आतापर्यंत 106 अॅप्सवर बंदी घालून भारताने आणखी 225 अॅप्सची यादी तयार केले आहेत. जयशंकर-वांग यी यांच्यात होणाऱ्या चर्चेत कोणताही तोडगा न निघाल्यास भारत या योजनेची भारत जलद अंमलबजावणी करेल, असे सूत्रांचे म्हणणे आहे.भारत आपल्या भूमिकेवर ठाम जयशंकर-वांग यी यांची भेट 9 ते 11 सप्टेंबरदरम्यान होऊ शकते. या बैठकीत भारत आपल्या जुन्या भूमिकेवर ठाम राहील. सीमा विवादात वाटाघाटी करण्यापूर्वी चीनने एलएसीवरील आपले स्थान पूर्ववत करावे, अशी भारताची इच्छा आहे. लष्करी व मुत्सद्दी पातळीवरील चर्चेत चीन यास सहमती देत ​​आहे, परंतु जमिनीवर झालेल्या चर्चेदरम्यान झालेल्या कराराचे पालन करीत नाही.

टॅग्स :chinaचीनIndiaभारत