शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचा नेता ठाकरेंच्या शिवसेनेत करणार प्रवेश; सावंतवाडीत दीपक केसरकरांची चिंता वाढली?
2
IAS अधिकारी रानू साहू यांना अटक, 540 कोटींचा DMF घोटाळा काय?
3
इस्रायलच्या हल्ल्यात हमास प्रमुख याह्या सिनवार ठार; 3 महिन्यांत 3 मोठे शत्रू संपवले
4
Mahayuti: "रामटेकमध्ये जयस्वाल नकोच, महायुतीने दुसरा उमेदवार द्यावा"
5
आज माझं कुटुंब कोसळलं आहे, पण...; बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर मुलगा झिशान सिद्दिकींनी काय आवाहन केलं?
6
'जुन्या गोष्टी विसरुन भविष्याकडे वाटचाल करा', भारत-पाक संबंधांवर नवाझ शरीफ स्पष्ट बोलले
7
"वरोराची जागा भाजपलाच हवी, अन्यथा...", पक्षाला इशारा, इच्छुक धडकले कार्यालयात
8
सरकारनं खेळाडूंची बक्षिसं दिली नाहीत, विश्वविजेत्या संघातील काहींशी चर्चा झाली; आव्हाडांचा दावा
9
"तुमच्यात धमक असेल, तर..."; प्रवीण दरेकरांचं मनोज जरांगेंना खुलं आव्हान
10
'या खुर्चीने दगा दिला ऐसा की...'; शिंदेंच्या सेनेने ठाकरेंना व्यंगचित्रातून डिवचलं
11
IPL 2025: काव्या मारन खेळणार मोठा डाव; पॅट कमिन्स नव्हे, 'हा' स्टार क्रिकेटर खाणार जास्त 'भाव'
12
विधानसभेला भाजपचे प्रभाकर पाटील 'घड्याळ' हातात बांधणार?; महायुतीत हालचाली गतीमान; लवकरच शिक्कामोर्तब!
13
दोन महिन्यांपासून ठावठिकाणा नाही, शेख हसिना आहेत कुठे? समोर आली अशी माहिती
14
INDW vs NZW : टीम इंडियाची घोषणा! हरमनबद्दलच्या चर्चांना पूर्णविराम; रिचा १२वी बोर्ड परीक्षेमुळे मुकणार
15
माजी खासदार संभाजीराजेंचा मोठा गौप्यस्फोट; "लोकसभा निवडणुकीत काँग्रेस हायकमांडनं..."
16
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खासगी प्रवासी बसची टेम्पोला धडक; अपघातात २३ जण जखमी 
17
१८०० वर इच्छुकांसोबत आज केवळ चर्चा, निर्णय अंतिम बैठकीत समाज घेणार: मनोज जरांगे
18
पुन्हा रेल्वे अपघात, लोकमान्य टर्मिनल एक्स्प्रेसचे ८ डबे रुळावरून घसरले; आसाममध्ये रेल्वे सेवा विस्कळीत
19
VIDEO: इम्तियाज जलील यांची घोषणा; विधानसभेसह नांदेड लोकसभा पोटनिवडणूकही लढवणार
20
IND vs NZ : भारताची लाजिरवाणी कामगिरी; रोहितकडून मोठ्या चुकीची प्रामाणिक कबुली, म्हणाला...

'जुन्या गोष्टी विसरुन भविष्याकडे वाटचाल करा', भारत-पाक संबंधांवर नवाझ शरीफ स्पष्ट बोलले

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2024 9:31 PM

India Pakistan Relations: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी भारतासोबत संबंध सुधारण्याची इच्छा व्यक्त केली.

Nawaz Sharif On India-Pakistan Relations : मागील काही वर्षंपासून भारत आणि पाकिस्तानमधील सर्वप्रकारचे संपुष्टात आले आहेत. पण, गरिबीने त्रस्त झालेल्या पाकिस्तानला पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून मोठी आशा आहे. पाकिस्तानने अनेकदा दोन्ही देशांमधील व्यापारीक संबंध पुर्ववत करण्याची विनंती केली आहे, मात्र भारताकडून त्याला कुठलाही प्रतिसाद देण्यात आलेला नाही. अशातच, SCO शिखर परिषदेसाठी पाकिस्तानात गेलेले परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्या भेटीनंतर माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी भारत-पाक संबंधापर महत्वाचे वक्तव्य केले आहे. 

नवाझ शरीफ यांनी गुरुवारी (17 ऑक्टोबर) पाकिस्तानात भारतीय पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांना जयशंकर यांच्या भेटीबाबत विचारले असता त्यांनी ही तर सुरुवात असल्याचे म्हटले. तसेच, भारत आणि पाकिस्तान भूतकाळ सोडून भविष्याचा विचार करतील अशी आशा व्यक्त केली. नवाझ शरीफ म्हणाले, पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानात यावे, अशी आमची इच्छा होती. पण, त्यांनी परराष्ट्रमंत्री जयशंकर यांना पाठवले, त्याचाही आम्हाला आनंद आहे. आता कुठे नवी सुरुवात झाली आहे.

भूतकाळात डोकावू नका, भविष्याकडे वाटचाल करा. भूतकाळात अशा अनेक गोष्टी घडल्या आहेत, ज्या व्हायला नको होत्या. भविष्यात अनेक शक्यता आहेत, त्याकडे पाहिले पाहिजे. जिथे संबंध थांबले होते, तिथूनच पुन्हा सुरू करण्याची आमची इच्छा आहे. आपण आता भूतकाळ सोडून भविष्याकडे पाहिले पाहिजे. आम्हाला आता सकारात्मक पावले उचलायची आहेत, एक नवीन सुरुवात करायची आहे, असेही शरीफ यावेळी म्हणाले.

शरीफ पुढे म्हणतात, भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही देश आता व्यापार, हवामान बदल, व्यवसाय, उद्योग, क्रीडा इत्यादी क्षेत्रात पुढे जाऊ शकतात. 75 वर्षे अशीच वाया गेली, आता आणखी 75 वर्षे वाया घालवायचे नाही. क्रिकेटमधील भूतकाळातील चुकांमधून धडा घेतला पाहिजे. भारताने चॅम्पियनशिप ट्रॉफीसाठी आपला संघ पाठवावा. एकमेकांचे संघ एकमेकांच्या देशात न पाठवून काय मिळणार? भारतीय संघाने पाकिस्तानात यावे, ही माझी मनापासून इच्छा आहे. आपली (भारत-पाकिस्तान) संस्कृती, परंपरा, भाषा, खाद्यपदार्थ समान आहेत. आपल्या नेत्यांचे संबंध चांगले नसतील, पण देशातील लोकांचे नाते खूप चांगले आहे.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानNawaz Sharifनवाज शरीफNarendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारत