शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
4
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
5
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
6
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
7
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
8
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
9
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
10
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
11
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
12
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
13
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
14
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
15
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
16
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
17
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
18
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
19
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
20
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...

टेहळणी करणारे ड्रोन पाडल्याचा पाकचा दावा भारताने फेटाळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2019 01:04 IST

बाघ क्षेत्रामध्ये नियंत्रण रेषेजवळ टेहळणी करणारे भारताचे ड्रोन विमान (क्वाडकॉप्टर) पाडल्याचा पाकिस्तानी लष्कराने केलेला दावा भारताने फेटाळून लावला आहे.

इस्लामाबाद : बाघ क्षेत्रामध्ये नियंत्रण रेषेजवळ टेहळणी करणारे भारताचे ड्रोन विमान (क्वाडकॉप्टर) पाडल्याचा पाकिस्तानी लष्कराने केलेला दावा भारताने फेटाळून लावला आहे.या ड्रोन विमानाचे छायाचित्र पाकिस्तानी लष्कराच्या आंतरदलीय जनसंपर्क विभागाचे महासंचालक मेजर जनरल असिफ गफूर यांनी मंगळवारी टिष्ट्वटरवर झळकवले. त्यांनी म्हटले आहे की, आमच्या हद्दीत भारताच्या जवानांनाच नव्हे, तर त्यांचे ड्रोनही येऊ दिले जाणार नाही.यासंदर्भात भारतीय लष्कराच्या सूत्रांनी सांगितले की, नियंत्रण रेषेवर अशी कोणतीही घटना घडलेली नाही. भारताची चार ड्रोन विमाने गेल्या वर्षात पाडण्यात आली, असा दावाही पाकिस्तानी लष्कराने केला आहे.काश्मीरमधील उरी येथील लष्करी तळावर दहशतवाद्यांनी १८ सप्टेंबर २०१६ रोजी केलेल्या हल्ल्यात १८ जवान शहीद झाले होते. पाकिस्तानच्या पाठिंब्यानेच हा हल्ला झालेला होता. त्यामुळे त्याच महिन्यात २९ सप्टेंबर रोजी भारतीय जवानांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये जाऊन तेथील दहशतवाद्यांच्या तळावर लक्ष्यभेदी हल्ला केला. जशास तसे उत्तर मिळाल्यामुळे पाकिस्तानने त्यावेळी भारताविरुद्ध खूप आकांडतांडव केले होते. (वृत्तसंस्था)दहशतवादी कारवाया सुरूचपाकिस्तानातून भारतात दहशतवाद्यांची घुसखोरी सुरूच राहिली आहे. ते काश्मीरमध्ये घातपाती कारवाया घडवत असतात. पंजाबमध्येही खलिस्तान लिबरेशन फोर्सला हाताशी धरून आयएसआय या गुप्तहेर संघटनेने काही महिन्यांपूर्वी बॉम्बस्फोट घडवून आणला.या राज्यात दहशतवादाला पुन्हा खतपाणी घालण्याचे कारस्थान पाकिस्तानने रचले आहे. सीमेवर त्या देशाचे सैनिक शस्त्रसंधीचे उल्लंघन करून भारतीय लष्करावर वारंवार गोळीबार करीत असतात. अशा स्थितीत टेहळणी करणारे भारतीय ड्रोन पाडल्याचा पाकिस्तानचा दावाही पोकळ आहे, असे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :Pakistanपाकिस्तान