शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

संयुक्त राष्ट्रांमध्ये भारतानं केलं पाकिस्तानचं समर्थन, त्या प्रस्तावाला दिला पाठिंबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2023 09:13 IST

India Vs Pakistan: एकमेकांचे शेजारी पण कट्टर वैरी असलेल्या भारत आणि पाकिस्तानमध्ये संयुक्त राष्ट्रांमध्ये नेहमीच जोरदार खडाजंगी होत असते. मात्र नुकतेच संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार परिषदेमध्ये वेगळेच चित्र दिसले.

एकमेकांचे शेजारी पण कट्टर वैरी असलेल्या भारत आणि पाकिस्तानमध्ये संयुक्त राष्ट्रांमध्ये नेहमीच जोरदार खडाजंगी होत असते. मात्र नुकतेच संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार परिषदेमध्ये वेगळेच चित्र दिसले. संयुक्त राष्ट्रातील मानवाधिकार परिषदेमध्ये कुराण जाळण्याविरोधात पाकिस्तानने दाखल केलेल्या निषेध प्रस्तावाला भारताने पाठिंबा दिला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार परिषदेमध्ये धार्मिक द्वेषाशी संबंधित प्रस्ताव आणला होता. या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे. या प्रस्तावाच्या माध्यमातून जगभरातील सरकारांना धार्मिक द्वेष रोखण्यासाठी कठोरातील कठोर पावलं उचलण्याचं आवाहन करण्यात आलं होतं.

संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार परिषदेने सांगितले की, ५७ इस्लामिक देशांची संघटना असलेल्या ओआयसीकडून पाकिस्तान आणि पॅलेस्टाईन यांनी आणलेल्या या प्रस्तावाला २८-१२ असा पाठिंबा मिळाला. तर ७ देश मतदानाला गैरहजर राहिले. १२ देशांनी या प्रस्तावाला विरोध केला. विरोध करणाऱ्या देशांमध्ये अमेरिका, ब्रिटन, बेल्जियम, जर्मनी, रोमानिया, लिथुआनिया, कोस्टा रिका आणि फिनलँड यांचा समावेश आहे. तर भारत आणि चीन या बड्या देशांसह एकूण २८ देशांनी या प्रस्तावाला पाठिंबा दिला. मतदानावेळी अनुपस्थित राहणाऱ्या देशांमध्ये नेपाळचा समावेश होता.

प्रस्तावाला पाठिंबा देणाऱ्या देशांनी सांगितले की, फ्रीडम ऑफ स्पीचच्या नावाखाली अशा घटनांना प्रोत्साहन दिले जाऊ शकत नाही. तर पाश्चात्य देशांनी या घटनांचा निषेध केला. मात्र फ्रीडम ऑफ स्पीचचा अर्थ कधी कधी असह्य विचारांना सहन करणे होतो, असा तर्कही मांडला. अनेक विकसनशील देशांनी या प्रस्तावाला पाठिंबा दिला. तर अमेरिका आणि युरोपियन युनियनने या प्रस्तावाला विरोध केला. दरम्यान, या प्रस्तावाच्या समर्थनार्थ मिळालेली २८ मतं म्हणजे पाश्चात्य देशांचा पराभव आहे, असा दावा पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी केला आहे.

हा प्रस्ताव गेल्या महिन्यात स्वीडिश अधिकाऱ्यांनी एका इराकी व्यक्तीला स्टॉकहोम मशिदीसमोर कुराण जाळण्याची परवानगी दिल्याच्या पार्श्वभूमीवर आणण्यात आला होता. तसेच या घटनेमुळे इस्लामिक देशांमध्ये संतापाचं वातावरण पसरलं होतं. तसेच त्यांनी कारवाईची मागणी केली होती.  

टॅग्स :united nationsसंयुक्त राष्ट्र संघIndiaभारतPakistanपाकिस्तानInternationalआंतरराष्ट्रीय