शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
3
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
4
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
5
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
6
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
7
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   
8
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
9
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
10
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
11
जिद्द असावी तर अशी! अंगणवाडी ते IAS अधिकारी; ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास
12
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
13
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
14
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
15
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
16
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
17
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
18
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
19
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
20
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'

भारताकडून 'चायना किलर' अग्नी-5 क्षेपणास्त्राची चाचणी, सीमा प्रश्न सोडविण्यासंदर्भात ड्रॅगननं केलं मोठं वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2024 16:01 IST

भारताने नुकतेच 'चायना किलर' म्हटल्या जाणाऱ्या अग्नी-5 या अणु क्षेपणास्त्राची चाचणी केली आहे. यानंतर चीनचे हे वक्तव्य आले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अरुणाचल प्रदेश दौऱ्याला विरोध करणाऱ्या चीनचा सूर बदलला आहे. चीनने सीमाप्रश्नासंदर्भात भाष्य केले आहे. सीमाप्रश्न लवकरात लवकर सोडविणे दोन्ही देशांच्या हिताचे असल्याचे चीनने म्हटले आहे. तसेच, दोन्ही देशाच्या नेत्यांच्या सहमतीने भारत आणि चीन लवकरच परस्पर स्वीकारार्ह तोडगा काढतील, जो प्रासंगिक करारांनुसार असेल, अशी आशा चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वांग वेनबिन यांनी बुधवारी व्यक्त केली. महत्वाचे म्हणजे, भारताने नुकतेच 'चायना किलर' म्हटल्या जाणाऱ्या अग्नी-5 या अणु क्षेपणास्त्राची चाचणी केली आहे. यानंतर चीनचे हे वक्तव्य आले आहे. 

अग्नी-5 क्षेपणास्त्र हे भारताचे सर्वात लांब पल्ल्याचे MIRV तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेले क्षेपणास्त्र आहे. या क्षेपणास्त्रात एकाच वेळी अनेक अणुबॉम्ब वाहून नेण्याची क्षमता आहे. चीनच्या सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाईम्सनेही भारताच्या या क्षेपणास्त्राची प्रशंसा केली होती. याशिवाय चीनच्या सिन्हुआ या वृत्तसंस्थेनेही या क्षेपणास्त्राच्या चाचणीचे वृत्त चिनी भाषेत प्रसिद्ध केले आहे. 

तत्पूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अरुणाचल प्रदेश दौऱ्यावर चीनच्या टिप्पणीवर भारताने तीव्र प्रतिक्रिया दिली होती. राज्य भारताचा अविभाज्य भाग आहे आणि नेहमीच राहील. चीनची टिप्पणी अस्वीकार्य आहे, असे भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी मंगळवारी म्हटले होते. 

अरुणाचलवर दावा करत चीनने पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याला विरोध केला होता. पीएम मोदींच्या अरुणाचल दौऱ्यामुळे सीमा विवाद अधिकच जटील होईल, असे चीनने म्हटले होते. याला भारताने कठोर भूमिका घेत प्रत्युत्तर दिले आहे.

टॅग्स :chinaचीनIndiaभारतBorderसीमारेषाborder disputeसीमा वाद