शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
2
"Today I say to the whole world..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
3
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
4
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
5
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
6
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
7
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
8
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
9
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
10
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
11
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
12
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
13
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
14
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
15
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
16
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
17
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
18
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
19
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
20
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार

चीनवर नजर! भारत अरुणाचल प्रदेशात १२ जलविद्युत प्रकल्प उभारणार, 'वॉटर वॉर'ला चोख प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2023 08:33 IST

सीमेजवळ चीनच्या धरण बांधणीला धोरणात्मक प्रतिसाद म्हणून, अरुणाचल प्रदेशातील २,००० मेगावॅट अप्पर सुबनसिरी प्रकल्पासह १२ प्रलंबित जलविद्युत प्रकल्प जलद पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

भारत सरकारने ईशान्य सीमेजवळ चीनच्या धरण बांधणीला धोरणात्मक प्रतिसाद म्हणून अरुणाचल प्रदेशातील २,००० मेगावॅटच्या अप्पर सुबनसिरी प्रकल्पासह १२ प्रलंबित जलविद्युत प्रकल्पांची पूर्तता करण्यासाठी तीन सार्वजनिक क्षेत्रातील जलविद्युत प्रकल्पांची स्थापना केली आहे. 

शरद पवार-अजित पवार गुफ्तगू, उद्योजकाकडे ४ तास गुप्त बैठक; चर्चांना उधाण

३ सार्वजनिक क्षेत्रातील जलविद्युत कंपन्या NHPC, SJVN आणि NEEPCO, औष्णिक उर्जा क्षेत्रातील दिग्गज NTPC च्या उपकंपनीने 11,517MW क्षमतेचे एकूण प्रकल्प हाताळण्यासाठी इटानगरमधील अरुणाचल प्रदेश सरकारसोबत सामंजस्य करार केले आहेत. यापूर्वी नोव्हेंबर २०२२ मध्ये, एक अहवाल समोर आला होता. यात ऊर्जा मंत्रालय ३०,००० मेगावॅट क्षमतेचे रखडलेले जलविद्युत प्रकल्प हाताळण्यासाठी जलविद्युत कंपन्यांना सज्ज करत आहे.

भारत सरकारचे हे पाऊल चीनसोबतच्या 'जलयुद्ध'च्या धोक्याला प्रत्युत्तर देण्याबरोबरच, २०३० पर्यंत जीवाश्म नसलेल्या इंधन स्रोतांमधून ५०% पेक्षा जास्त वीज मिळविण्यासाठी उचलण्यात आले आहे. भारताने २०७० पर्यंत कार्बन उत्सर्जनात स्वतःला 'निव्वळ शून्य' बनवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. हे पाऊल त्याच्या हवामान कृती धोरणाचा भाग म्हणून जलविद्युत प्रकल्पांवर सरकारचा भर अधोरेखित करते.

सध्या, भारताच्या एकूण वीज पुरवठ्यापैकी ७०% कोळशातून आणि २५% अक्षय ऊर्जा स्रोतांमधून येतो. हे प्रकल्प अरुणाचल प्रदेश सरकारने खासगी विकासकांना दिले होते. मात्र निधी, तज्ज्ञता, भूसंपादन, मंजुरी आदी मुद्द्यांमुळे ते रखडले. NHPC ला एकूण 3,800 MW क्षमतेचे २ प्रकल्प, SJVN 5,097 MW चे ५ प्रकल्प आणि 2,620 MW चे NEEPCO 5 प्रकल्प देण्यात आले आहेत.

सामंजस्य करारांवर स्वाक्षरी केल्यानंतर केंद्रीय ऊर्जा आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री आर के सिंह म्हणाले, “राज्याचे दरडोई उत्पन्न महाराष्ट्र आणि गुजरातपेक्षा जास्त असेल. अमेरिका, कॅनडा आणि नॉर्वेसह सर्व विकसित देशांनी त्यांच्या जलविद्युत क्षमतेपैकी ८०% ते ९०% वापर केला आहे. भारतातही जलविद्युत क्षमतेचा वापर करणाऱ्या राज्यांची भरभराट झाली आहे. जलविद्युत वापरामुळे भूजल पातळी देखील वाढेल आणि वनस्पती आणि प्राणी यांच्या वाढीस प्रोत्साहन मिळेल.

टॅग्स :Arunachal Pradeshअरुणाचल प्रदेशchinaचीन