शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
2
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
3
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
4
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
5
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
6
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
7
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
8
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
9
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
10
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
11
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
12
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
13
पहलगाम हल्ल्यानंतर भारतात होणारी मोठी स्पर्धा पुढे ढकलली
14
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
15
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
16
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
17
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
18
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
19
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
20
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   

'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2024 21:37 IST

Indian MEA on Russia-Ukraine : भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी ऑस्ट्रेलियन वृत्तवाहिनीला दिलेली मुलाखत चर्चेत आहे.

Foreign Minister S. Jaishankar’s Interview : भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांची एक मुलाखत खूप चर्चेत आहे. एका ऑस्ट्रेलियन वृत्तवाहिनीला परराष्ट्रमंत्र्यांनी ही मुलाखत दिली आहे. मुलाखतीत भारताच्यारशियाशी असलेल्या मैत्रीच्या प्रश्नावर एस. जयशंकर यांनी पाकिस्तानवर हल्लाबोल करत प्रत्युत्तर दिले. ऑस्ट्रेलियन न्यूज अँकरने भारत-रशिया संबंधांबाबत भारतीय परराष्ट्रमंत्र्यांना प्रश्न विचारला होता. त्याला उत्तर देताना जयशंकर म्हणाले की, भारताच्या ऑस्ट्रेलियासोबतच्या संबंधांवर याचा कोणताही परिणाम होणार नाही. 

पाकिस्तानबद्दल काय म्हणाले जयशंकर...ऑस्ट्रेलियन न्यूज अँकरने भारताच्या रशियाशी असलेल्या मैत्रीमुळे ऑस्ट्रेलियासोबतच्या संबंधांमध्ये काही अडचण आहे का? असा प्रश्न जयशंकर यांना विचारला होता. या प्रश्नाला उत्तर देताना जयशंकर म्हणाले की, आमच्या रशियासोबत असलेल्या मैत्रिचा ऑस्ट्रेलियाशी असलेल्या संबंधांवर कोणताही परिणाम होणार नाही. आजच्या काळात कोणत्याही देशाशी विशेष संबंध नाहीत. पाकिस्तानला टोला लगावत जयशंकर म्हणथात, तुमच्या तर्कानुसार विचार केला तर अनेक देशांचे पाकिस्तानशी संबंध आहेत. अशा स्थितीत भारताने काळजी करण्याची गरज आहे का?

भारत-रशिया संबंधांचा जगाला फायदा जयशंकर पुढे म्हणाले की, भारताच्या रशियासोबतच्या चांगल्या संबंधांचा आंतरराष्ट्रीय समुदायाला फायदा होत आहे. रशियाकडून तेल खरेदी करण्याच्या भारताच्या निर्णयावर जयशंकर म्हणतात, भारताने हे केले नसते, तर जागतिक ऊर्जा बाजार पूर्णपणे नष्ट झाला असता. जगात ऊर्जेचे संकट आले असते, जागतिक बाजारपेठेत तेलाच्या किमती गगनाला भिडल्या असत्या आणि जगभर महागाई शिगेला पोहोचली असती. भारताचे रशियासोबतचे चांगले संबंध रशिया आणि युक्रेन यांच्यात चर्चा सुरू करण्यास मदत करू शकतात.

भारताचे रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांशी चांगले संबंध रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांशी भारताचे चांगले संबंध आहेत. अशा परिस्थितीत भारत युक्रेन आणि रशिया या दोन्ही देशांशी चर्चा करण्यास सक्षम आहे. जगाला आणि अगदी ऑस्ट्रेलियालाही अशा देशाची गरज आहे, जो युद्धाला चर्चेच्या टेबलावर आणण्यास मदत करू शकेल. बहुतांश युद्धे वाटाघाटीच्या टेबलावर संपतात, अशी प्रतिक्रियाही जयशंकर यांनी दिली.  

टॅग्स :S. Jaishankarएस. जयशंकरIndiaभारतrussiaरशियाAustraliaआॅस्ट्रेलिया