शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
2
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
3
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
4
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
5
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
6
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
7
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
8
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
9
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
10
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
11
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
12
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू
13
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
14
सत्ता कुणाचीही येऊ देत, रामदास आठवलेंची जागा पक्की आहे- नितीन गडकरी
15
'यूपीआय'मध्ये मार्केटमध्ये PhonePe सुसाट! Google Pay, Paytm किती मागे?
16
video: दोन लाख रुपये देऊन बिहारचा तरुण बनला 'IPS' अधिकारी; पाहून पोलीसही चक्रावले...
17
"आम्ही कुणालाही सोडणार नाही!’’, तिरुपती लाडू भेसळीप्रकरणी आंध्र प्रदेश सरकार आक्रमक   
18
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
19
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
20
IND vs BAN : "मला कोणी गिफ्ट दिलं नाही...", 'सामनावीर' अश्विनची मिश्किल प्रतिक्रिया, संघाला जिंकवलं

भारताचा पाकपुढे मैत्रीचा हात

By admin | Published: December 09, 2015 11:29 PM

भारताने पाकिस्तानकडे आज मैत्रीचा हात पुढे केला. दोन्ही देशांसाठी एकमेकांसोबत काम करण्याची वेळ येऊन ठेपली आहे, असे सांगतानाच अतिरेक्यांना कुठल्याही स्वरूपात आश्रय देऊ नका

इस्लामाबाद : भारताने पाकिस्तानकडे आज मैत्रीचा हात पुढे केला. दोन्ही देशांसाठी एकमेकांसोबत काम करण्याची वेळ येऊन ठेपली आहे, असे सांगतानाच अतिरेक्यांना कुठल्याही स्वरूपात आश्रय देऊ नका, असे आवाहन परराष्ट्र व्यवहारमंत्री सुषमा स्वराज यांनी केले. हार्ट आॅफ एशिया संमेलनात परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज बोलत होत्या. त्या म्हणाल्या की, अतिरेकी कारवाया करणाऱ्या शक्तींना कुठल्याही नावाने, कुठल्याही स्वरूपात आश्रय देण्यात येऊ नये. विशेषत: आंतरराष्ट्रीय समुदायाने याकडे लक्ष द्यावे. जग बदलाच्या दिशेने वाटचाल करीत आहे. त्यासाठी भारताने पाकिस्तानला विकासासाठी सहकार्य करण्याचा प्रस्ताव दिला. सुषमा स्वराज म्हणाल्या की, भारत एका अशा अफगाणिस्तानची कल्पना करतो जो की, व्यापार, परिवहन, ऊर्जा आणि संचार यांनी परिपूर्ण केंद्र असेल. पाकिस्तानसोबत विकासाच्या वाटेवर पुढे जाण्यासाठी किंबहुना त्यांना सहकार्य करण्यासाठी आमची तयारी तर आहेच; पण तूर्तास अफगाणिस्तानच्या मदतीचा संकल्प तर करू या. दरम्यान, अफगाणिस्तानच्या मुद्यावर बोलताना सुषमा स्वराज म्हणाल्या की, त्या देशात अतिरेकी कारवायांचे क्षेत्र आणि तीव्रता यात मोठी वाढ झाली आहे. अफगाणिस्तान सरकारसोबत काम करण्यास, त्यांची संरक्षण क्षमता मजबूत करण्यासाठी आम्ही सहकार्य करू. (वृत्तसंस्था)भारत आणि पाकिस्तान परस्पर संबंध सुधारण्यासाठी प्रयत्न करीत असल्याच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी बुधवारी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांची येथे भेट घेतली. यावेळी भारताचे परराष्ट्रसचिव एस. जयशंकर व शरीफ यांचे परराष्ट्र व्यवहारविषयक सल्लागार सरताज अजीज यांची उपस्थिती होती.सुषमा स्वराज म्हणाल्या की, पाकिस्तानसोबतही आम्ही मैत्रीचा हात पुढे करण्यास तयार आहोत. ती वेळ आता आली आहे की, आम्ही एकत्र काम करणे आवश्यक आहे. त्यासाठी आत्मविश्वास आणि समजूतदारपणा दाखविण्याची गरज आहे. व्यापार व सहकार्य मजबूूत करायला हवे. कारण, संपूर्ण जग त्या क्षणाची वाट पाहत आहे. आम्ही त्यांना निराश करायला नको.सार्क परिषद सप्टेंबर २०१६ मध्ये पाकिस्तानात होणार आहे. यापूर्वी जानेवारी २००४ मध्ये तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी पाकिस्तानच्या दौऱ्यावर गेले होते. वाजपेयींनंतर पंतप्रधान बनलेले मनमोहनसिंगही पाकिस्तानचा दौरा करू इच्छित होते. मात्र त्यांना शक्य झाले नाही.सार्क शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील वर्षी पाकिस्तानचा दौरा करतील, असे स्वराज यांनी सांगितले.