शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
3
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
4
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
5
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
6
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
7
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   
8
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
9
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
10
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
11
जिद्द असावी तर अशी! अंगणवाडी ते IAS अधिकारी; ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास
12
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
13
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
14
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
15
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
16
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
17
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
18
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
19
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
20
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'

"हे जेथे गेले, तेथे अशांतता..."; इंडोनेशियातील लोकांचा रोहिंग्या मुस्लिमांना विरोध, बोटीतून उतरूही दिलं नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2024 10:23 IST

दक्षिण आचेमध्ये मच्छीमार समुदायाचे प्रमुख मोहम्मद जबल यांनी म्हटले आहे, "आमच्या मच्छिमार समुदायने त्यांना येते उतरू दिले नाही, कारण इतर ठिकाणी जे काही घडले ते येथे होऊ नये, अशी आमची इच्छा आहे. ते जेथे गेले, तेथे स्थानिकांमध्ये अशांतता निर्माण झाली."

इंडोनेशियामध्ये मोठ्या संख्येने प्रवेश करण्याचा प्रयत्न करणाऱ्या रोहिंग्या मुस्लिमांना तेथील स्थानिक लोकांनी बोटीतून खालीही उतरू दिले नाही. लाकडाच्या बोटीतून आलेले 140 रोहिंग्या मुस्लीम इंडोनेशियाच्या उत्तरेकडील प्रांत आचेच्या किनाऱ्यापासून साधारणपणे 1 मैल (0.60 किलोमीटर) दूर उतरण्याचा प्रयत्न करत होते. यात अधिकांश महिला आणि मुलांचा समावेश होता. 

स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बांगलादेशातील कॉक्स बाजारातून दक्षिण आचे जिल्ह्यातील लाबुहान हाजीच्या किनाऱ्यापर्यंत जवळपास दोन आठवड्यांच्या प्रवासादरम्यान तीन रोहिंग्यांचा मृत्यू झाला आहे. अधिकाऱ्यांनी रविवारी 11 रोहिंग्यांना प्रकृती खालावल्याने रुग्णालयात दाखल  केले आहे.

"आम्हाला येथे शांतता हवी आहे" -दक्षिण आचेमध्ये मच्छीमार समुदायाचे प्रमुख मोहम्मद जबल यांनी म्हटले आहे, "आमच्या मच्छिमार समुदायने त्यांना येते उतरू दिले नाही, कारण इतर ठिकाणी जे काही घडले ते येथे होऊ नये, अशी आमची इच्छा आहे. ते जेथे गेले, तेथे स्थानिकांमध्ये अशांतता निर्माण झाली." याशिवाय, बंदरावर लटकलेल्या एका मोठ्या बॅनरवर लिहिले होते की, “या प्रदेशात रोहिंग्या निर्वासितांच्या आगमनाला दक्षिण आचे रीजेंसीच्या लोकांचा विरोध आहे."

आचे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहिंग्या मुस्लिमांचा हा समूह 9 ऑक्टोबरला कॉक्स बाजारातून रवाना झाला होता. त्यांना  मलेशियात जायचे होते. जबल यांनी म्हटले आहे की, स्थानिक नागरिकांनी रोहिंग्या समूहाला भोजन दिले. याशिवाय, या निर्वासितांना संयुक्त राष्ट्र उच्चायुक्तांनीही भोजन उपलब्ध करून दिले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही बोट बांगलादेशातून निघाली तेव्हा तिच्यावर 216 लोक होते. यांपैकी 50 लोक इंडोनेशियातील रियाउ प्रांतात उतरले होते. यातच, आचे पोलिसांनी कथितपणे लोकांच्या तस्करीसंदर्भात तीन संशयितांना अटक केली आहे. 

टॅग्स :Rohingyaरोहिंग्याIndonesiaइंडोनेशियाPoliceपोलिस