शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याच्या राजकारणात काय शिजतंय?; विधानसभेपूर्वीच महायुतीत मोठा भूकंप होण्याची शक्यता
2
मुख्यमंत्रिपदाबाबत बाळासाहेब थोरातांचं विधान; नाना पटोलेंच्या नावाला विरोध?
3
शरद पवार गटाच्या मतदारसंघावर दावा; विधानसभा निवडणुकीत वसंत मोरेंची होणार कोंडी?
4
IND vs BAN : मॅचनंतर बायकोनं टाकली 'गुगली'! प्रीतीनं अशी घेतली अश्विनची फिरकी (VIDEO)   
5
६ वर्षांच्या मुलीला माकडांनी बलात्काराची शिकार होण्यापासून वाचवले, जबरदस्ती करणाऱ्या इसमाला फटकावले
6
धक्कादायक! UPSC ची तयारी करणाऱ्या युवकाचा मृतदेह जंगलात सापडला, हत्या की आत्महत्या?
7
पडळकरांकडून सरकारविरोधातच आंदोलनाचं हत्यार; रास्ता रोकोसाठी धनगर समााजाला केलं महत्त्वाचं आवाहन 
8
रेखा झुनझुनवाला यांचे सुपरहिट स्टॉक्स, २०२४ मध्ये दिलाय ८९% परतावा; पाहा कोणते आहेत शेअर्स?
9
Maharashtra Assembly Elections : हरियाणा-काश्मीरनंतर आता महाराष्ट्र विधानसभेचे बिगुल वाजणार! निवडणूक आयोगाने तयारी केली सुरू
10
Maharashtra Politics : शिवसेना शिंदे गटात पक्षातंर्गत वाद?; भरत गोगावलेंच्या गौप्यस्फोटानं उडाली खळबळ
11
सिनेट निवडणुकीत चुरस; शिंदेगटाच्या युवासेनेचे 'अभाविप'शी फाटले; पाठिंबा काढला
12
Pitru Paksha 2024: आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी पितृपक्षातील अष्टमीला करा 'गजलक्ष्मी व्रत'!
13
महाविकास आघाडीत विदर्भ-मुंबईचा तिढा; मुंबईत उद्धवसेनेला २२, तर विदर्भात काँग्रेसला हव्या ४५ जागा
14
ATM Card वर मिळतो १० लाखांपर्यंतचा फ्री इन्शूरन्स; पाहा केव्हा घेता येतो या सुविधेचा लाभ?
15
रश्मी ठाकरे पुढच्या मुख्यमंत्री...! कलानगरात झळकले बॅनर्स, राजकीय वर्तुळात चर्चा
16
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरी व व्यापारात लाभ होतील; अचानक धन प्राप्ती होईल
17
चार हजार वर्षांपूर्वीच्या प्राचीन वस्तू अमेरिका भारताला देणार; पंतप्रधानांनी मानले आभार
18
अग्रलेख : पंतप्रधान पुन्हा आक्रमक; महायुतीची सत्ता टिकविण्यासाठी भाजप पुन्हा सरसावला
19
मराठा, ओबीसी आरक्षणावरून तणाव कायम; वडीगोद्रीत दोन्ही समाजांचे आंदोलक रस्त्यावर
20
सर्व्हे सांगतात, मविआला मुंबईत २२ जागा मिळणार

ईशनिंदा कायद्याच्या पीडितांचा करणार बचाव

By admin | Published: February 10, 2015 10:46 PM

वादग्रस्त ईशनिंदा कायद्याखाली खटल्यांना सामोरे जात असलेल्या संशयितांपैकी काहींना बळीचा बकरा बनविले गेले असल्याचे पाकिस्तानातील पंजाब

इस्लामाबाद : वादग्रस्त ईशनिंदा कायद्याखाली खटल्यांना सामोरे जात असलेल्या संशयितांपैकी काहींना बळीचा बकरा बनविले गेले असल्याचे पाकिस्तानातील पंजाब सरकारला वाटते. त्यामुळे सरकारने अशा ५० जणांचा न्यायालयात बचाव करण्याचा निर्णय घेतला आहे.पुराव्यांचा अभाव, कमकुवत पुरावे व वकील उपलब्ध नसल्यामुळे दोषी न ठरविल्या गेलेल्या ५० जणांची यादी तयार करण्यात आली असून, त्यांच्या भवितव्याचा लवकर निर्णय घेतला जावा, अशी सरकारची भूमिका आहे.सरकारने २०१० पासून विविध न्यायालयांत सुरू असलेल्या ईशनिंदेच्या २६२ खटल्यांपैकी ५० खटल्यांची लवकर निवाड्यासाठी निवड केली आहे. प्रांताच्या एका उच्चस्तरीय समितीने हे खटले जलदगतीने चालविण्याच्या पद्धतीवर चर्चा करण्यासाठी अलीकडेच बैठक घेतली. सुटकेनंतर छळ होण्यापासून संशयितांचा बचाव करण्यासाठी विविध पंथांच्या विचारसरणीशी संबंधित संघटनांना विश्वासात घेण्यावरही या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली होती. मुल्तानमध्ये मानवाधिकार कार्यकर्ते आणि वकील राशीद रहमान यांच्या हत्येनंतर या समितीची स्थापना करण्यात आली होती. त्यानंतरची समितीची ही चौथी बैठक होती. रहमान हे ईशनिंदेच्या आरोपीची बाजू न्यायालयात मांडत होते. माजी लष्करशहा झिया उल हक यांनी त्यांच्या राजवटीचे समर्थन करणाऱ्या धार्मिक गटांना खुश करण्यासाठी ईशनिंदा कायदा लागू केला होता. (वृत्तसंस्था)