शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूच्या उपमुख्यमंत्रीपदी उदयनिधी स्टॅलिन, मंत्रिमंडळात मोठे फेरबदल
2
Team India Announced, IND vs BAN T20 Series: भारताचा संघ जाहीर! बांगलादेशविरूद्ध २ IPL स्टार्स संघात, आणखी एकाचं ३ वर्षाने 'कमबॅक'
3
मेहबूबा मुफ्ती यांनी नसराल्लाहला म्हटलं शहीद; उद्याच्या सर्व निवडणूक सभा केल्या रद्द!
4
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
5
"सर्व मुस्लिम देशांनी एकत्र येऊन इस्रायलशी लढावं", इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं आवाहन 
6
बांगलादेशी फॅनचा 'पर्दाफाश'! ५ वर्षांसाठी भारतात येण्यावर बंदी येण्याची शक्यता, प्रकरण काय?
7
"रस्त्यावर हरे कृष्ण-हरे राम करताना दिसतील..."; श्रीकृष्ण जन्मभूमीचा उल्लेख करत काय म्हणाले CM योगी?
8
सौंदर्याचा 'सन्मान'... समंथाला मिळाला विशेष पुरस्कार, सोहळ्यातील 'हॉट लूक'वर खिळल्या नजरा
9
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
10
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
11
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
12
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
13
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
14
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
15
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
16
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
17
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
18
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
19
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
20
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत सुधारणा करणे जरूरी

By admin | Published: September 26, 2015 2:55 AM

प्रत्येकाला सुरक्षित वाटेल, सर्वांना संधी असेल आणि सर्वांचा आदर होईल, अशा नवीन विश्वाची स्थापना करण्याची हाक देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेची

न्यूयॉर्क : प्रत्येकाला सुरक्षित वाटेल, सर्वांना संधी असेल आणि सर्वांचा आदर होईल, अशा नवीन विश्वाची स्थापना करण्याची हाक देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेची विश्वसनीयता आणि प्रासंगिकता कायम राहावी म्हणून सुरक्षा परिषदेत व्यापक सुधारणा करणे जरूरी असल्याचे आग्रही प्रतिपादन युनोच्या आमसभेत केले.विकसित देश विकास आणि हवामानातील बदलाबाबत स्वार्थाचा विचार न करता आपापली वित्तीय जबाबदारी पार पाडतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. अलिप्त राहून या आव्हानांचा मुकाबला करणे शक्य नाही. त्यांनी महात्मा गांधी आणि पं. दीनदयाल उपाध्याय यांचाही भाषणात उल्लेख केला.जगातून दारिद्र्याचे निर्मूलन करण्याची गरज अधोरेखित करताना मोदी म्हणाले की, जगाच्या पाठीवर १.३ अब्ज लोकांना दारिद्र्यात जीवन जगावे लागत आहे. भारताने दारिद्र्य निर्मूलन, सर्वसमावेशी विकास, महिला सशक्तीकरण, पायाभूत सुविधा, कौशल्य विकास, कृषी क्षेत्राच्या विकासासाठी योजलेल्या उपाययोजनांचाही पंतप्रधान मोदी यांनी भाषणात उल्लेख केला.‘सर्वेपि सुखिन: संतु सर्वे संतु निरायम:, सर्वे भद्राणि पश्यंतु मा कश्चिद दु:ख माप्नुयात..’ या शांतीमंत्राने अवघ्या विश्वासाठी मंगलमय कामना करीत पंतप्रधान मोदी यांनी भाषणाचा शेवट केला.दरम्यान, महत्त्वाकांक्षी टिकाऊ विकासाच्या कार्यक्रमाला संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत मंजुरी दिली. येत्या १५ वर्षांत दारिद्र्य आणि उपासमार हद्दपार करून लैंगिक समानतेसह सर्वांना आदरासह संधी उपलब्ध करणे, हा या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमाचा उद्देश आहे. या ऐतिहासिक क्षणी पंतप्रधान मोदी यांच्या समवेत जगभरातील नेते उपस्थित होते.येत्या १५ वर्षांत १७ महत्त्वाकांक्षी उद्देशांची पूर्तता करण्यात येणार असून यात दारिद्र्य निर्मूलन, उपासमार संपुष्टात आणण्यासह उच्च शिक्षण, लैंगिक समानता, शुद्ध पेयजल आणि स्वच्छतेचा समावेश आहे.