शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: दहिसरमध्ये ठाकरेंकडून तेजस्वी घोसाळकरांना उमेदवारी
2
शिंदेंच्या शिवसेनेत गेलेल्या बच्चू कडूंच्या आमदाराचा महायुतीत पत्ता कट
3
मनसेची १५ उमेदवारांची पाचवी यादी जाहीर; सोलापूर, कोल्हापूर, बीडमध्ये कोणाला संधी?
4
नवाब मलिक मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघात लढणार; भाजपा काय भूमिका घेणार?
5
कोरेगावची जागा राष्ट्रवादीला दिली, सातारा मतदारसंघातून ठाकरे गट लढणार; संजय राऊतांची माहिती
6
अपक्ष आमदार किशोर जोरगेवार भाजपात प्रवेश करणार; सुधीर मुनगंटीवारांची नाराजी दूर?
7
गौतम गुरुजींचं नशीब फुटकं! आधी खेळाडू अन् आता कोचिंगमध्ये टीम इंडियावर आली 'गंभीर' वेळ
8
Harun Khan: ठाकरेंनी उतरवला अल्पसंख्याक उमेदवार, कोण आहेत हारुन खान?
9
Sanjay Singh : "भाजपाने केला केजरीवालांना मारण्याचा प्रयत्न, द्वेषाच्या राजकारणाने..."; आप नेत्याचा गंभीर आरोप
10
'बटेंगे तो कटेंगे': भाजपच्या भूमिकेवर RSS चं पहिल्यांदाच भाष्य; होसबळे म्हणाले...
11
नेत्रदिपक कामगिरी! CA चं शिक्षण घेतल्यानंतर 'तो' शेतीकडे वळला; आता ५५ लाखांचा टर्नओव्हर
12
बंडोबा झाले थंड! उल्हासनगरमध्ये आयलानी व कलानी लढतीकडे सगळ्यांचे लक्ष का?
13
"आम्हाला टोलमाफीचे गाजर नको", सुमीत राघवनचा संताप, शिंदे-फडणवीसांना टॅग करत म्हणाला...
14
नेटकऱ्यांनी रोहित-विराटला दाखवला 'आरसा'; सचिनच्या चाळीशीतील 'त्या' व्हिडिओचाही दिला दाखला
15
मोठी बातमी: भाजपची दुसरी उमेदवार यादी जाहीर; जतमधून पडळकर, खडकवासल्यातून पुन्हा तापकीर!
16
मुंबईत उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का; २ नेते पक्ष सोडणार, अपक्ष लढण्याची तयारी
17
पोटनिवडणुकीत पराभव तरी भाजपने दिली पुन्हा संधी! हेमंत रासनेंनी कसं जुळवलं गणित?
18
शरद पवार गटाच्या २२ उमेदवारांची यादी जाहीर; बीडमधून संदीप क्षीरसागरांना पुन्हा संधी
19
मुंबईतल्या ३ जागांवर ठाकरे गटाचे उमेदवार जाहीर; मुस्लीम चेहरा उतरवला रिंगणात
20
भयंकर! "सर, आमचा जीव वाचवा..."; गुंडांच्या भीतीने शिक्षकांनी अधिकाऱ्यांसमोर जोडले हात

तळागाळातील लोकांबाबत न्यायव्यवस्थेचे चुकलेच!; CJI चंद्रचूड यांनी दाखवला आरसा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2023 5:32 AM

कायदेशीर चौकटीचा वापर पद्धतशीरपणे काही समुदायांवर अत्याचार करणे आणि त्यांना उपेक्षित ठेवण्यासाठी एखाद्या हत्याराप्रमाणे करण्यात आला आहे.

न्यूयॉर्क : समाजाच्या तळागाळातील वर्गाबाबत न्यायव्यवस्थेने दुर्दैवाने अनेक चुकीच्या गोष्टी केल्या आणि त्यामुळे पिढ्यानपिढ्या मोठे नुकसान सोसावे लागले आहे, असे पररखड मत भारताचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी व्यक्त केले.

अमेरिकेतील मॅसॅच्युसेट्सच्या वॉल्थम येथील ब्रँडीस विद्यापीठात चंद्रचूड यांनी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा चिरंतन वारसा’ या विषयावरील सहाव्या आंतरराष्ट्रीय परिषदेत बीजभाषण केले. ते म्हणाले की, उपेक्षित सामाजिक घटकांसंदर्भात भयंकर गंभीर चुका करण्यात आल्या. पूर्वग्रह, भेदभाव आणि विषमता यांच्या प्रभावामुळे त्या चुका घडल्या. 

ट्रान्साटलांटिक गुलामांच्या व्यापारामुळे लाखो आफ्रिकी लोकांचे बळजबरीने समूळ उच्चाटन झाले. मूळ अमेरिकी रहिवाशांचे झालेले विस्थापन, भारतातील जातीय भेदभाव, भारतातील स्थानिक आदिवासी समुदाय, महिलांवरील होणारे अत्याचार, एलजीबीटीक्यूआय व्यक्ती आणि इतर अल्पसंख्याक समुदाय यांच्यावरील भीषण अन्याय या गोष्टींनी इतिहासाची पाने डागाळली आहेत, असेही  चंद्रचूड यांनी आपल्या भाषणात नमूद केले.

सरन्यायाधीश म्हणाले...

कायदेशीर चौकटीचा वापर पद्धतशीरपणे काही समुदायांवर अत्याचार करणे आणि त्यांना उपेक्षित ठेवण्यासाठी एखाद्या हत्याराप्रमाणे करण्यात आला आहे. ऐतिहासिक चुका एक सामाजिक प्रणाली निर्माण करून अन्याय कायम ठेवतात. त्यातून समाजात हिंसाचाराचा भडका उडू शकतो. उपेक्षित आणि अल्पसंख्याक समुदायांना महत्त्वाचे स्थान देण्याचा निर्णय हा केवळ कागदावरच राहू नये, तर त्यांना निर्णयप्रक्रियेत सहभागी करून घेतले पाहिजे.

 

टॅग्स :DY Chandrachudडी. वाय. चंद्रचूड