शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

काश्मीर भारताचे होते, आहे अन् राहील, संयुक्त राष्ट्रात भारताने पाकला खडसावलं

By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2023 11:34 AM

तुर्की, ओआयसीला ढवळाढवळ न करण्याचा सल्ला

जिनेव्हा : संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत (यूएनएचआरसी) भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानला आरसा दाखवला आहे. पाकचे लोक पोटापाण्यासाठी तळमळत आहेत. परंतु त्यांचे भारतविरोधाचे खूळ सुटत नाही, असा घणाघात भारताच्या मुत्सद्दी सीमा पूजानी यांनी केला.

दोन दिवसांपूर्वी पाकिस्तानच्या परराष्ट्र राज्यमंत्री हिना रब्बानी खार यांनी यूएनएचआरसीमध्ये भारतावर खोटे आरोप केले होते. त्याला पूजानी यांनी चोख प्रत्युत्तर दिले. पाकला दहशतवादी देश संबोधत तो भारताविरुद्ध अपप्रचार करत असल्याचे त्या म्हणाल्या. एवढेच नाही तर पूजानी यांनी तुर्कस्तान व इस्लामिक सहकार्य संघटनेच्या (ओआयसी) प्रतिनिधींनी जम्मू आणि काश्मीरबाबत केलेल्या वक्तव्यावरही खेद व्यक्त केला. जम्मू-काश्मीरचा मुद्दा हा आमचा अंतर्गत विषय आहे. त्यामुळे या विषयावर भाष्य करणे टाळा, असा सल्ला त्यांनी तुर्की आणि ओआयसीला दिला. जम्मू-काश्मीर व लडाख हा संपूर्ण प्रदेश भारताचाच भाग होता, आहे व कायम राहील, असे त्यांनी ठामपणे सांगितले. (वृत्तसंस्था)

पाकने मानवाधिकारावर बोलणे हाच मोठा विनोदपाकिस्तानी मंत्र्यांच्या तोंडून मानवाधिकाराची चर्चा ऐकणे म्हणजे विनोद आहे. आवाज उठवणारे पाकिस्तानात गायब होतात. पाकिस्तानच्या स्वतःच्या चौकशी आयोगाकडे गेल्या दशकात बेपत्ता व्यक्तींच्या ८,४६३ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. जे भारतातील अल्पसंख्याकांच्या स्वातंत्र्याबद्दल बोलतात त्यांनी आधी स्वतःच्या अंगणात डोकावले पाहिजे. पाकिस्तानमध्ये अल्पसंख्याकांना धार्मिक स्वातंत्र्य नाही. ते त्यांच्या धर्माचे पालन करू शकत नाहीत, असेही त्या म्हणाल्या.

काय म्हणाल्या होत्या पाकच्या मंत्रीगेल्या गुरुवारी पाकच्या मंत्री हिना रब्बानी खार यांनी भारताचे नाव न घेता पारंपरिक व अपारंपरिक शस्त्रास्त्रांच्या पुरवठ्यावर चिंता व्यक्त केली होती. यामुळे दक्षिण आशियातील सामरिक स्थैर्य आणि पाकच्या राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण झाल्याचे त्या  म्हणाल्या होत्या. 

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तानJammu Kashmirजम्मू-काश्मीर