शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

कुवैत परकीयांची संख्या कमी करणार, भारतीय कामगारांची संख्या मोठी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2020 06:08 IST

कोरोनाचा फटका : शेख सबाह अल खालीद यांची माहिती

कुवैत सिटी : कोरोनाची जागतिक साथ आणि इंधनाच्या किमती यामुळे आखाती देशांच्या अर्थव्यवस्थांना घरघर जाणवू लागली आहे. त्यामुळेच आपल्या देशातील स्थलांतरितांची संख्या ७० टक्क्यांवरून ३० टक्क्यांपर्यंत खाली आणण्याचा विचार कुवैत करीत आहे. देशाचे प्रमुख शेख सबाह अल खालीद शेख सबाह यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली.

आखातातील छोटा देश असलेल्या कुवैतची लोकसंख्या ४.८ दशलक्ष असून, यापैकी ३.४ दशलक्ष हे परकीय नागरिक आहेत. लोकसंख्येच्या सुमारे ७० टक्के असलेले हे स्थलांतरितांचे प्रमाण ३० टक्क्यांपर्यंत कमी करण्याचा विचार सध्या सुरू आहे. त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवरील ताण कमी होईल व देशातून बाहेर जाणाऱ्या संपत्तीला आळा बसेल, असे शेख म्हणाले. खनिजतेलाच्या घसरत्या किमतींमुळे अनेक आखाती देशांच्या अर्थव्यवस्था डगमगायला लागल्या आहेत. त्यातच आता कोरोनाच्या साथीमुळे अर्थव्यवस्थांपुढे नवे संकट उभे राहिले आहे. त्यामुळेच आखाती देश स्थलांतरितांच्या प्रश्नावर विचार करू लागले आहेत. कुवैतमधील बहुसंख्य परदेशी नागरिक हे अकुशल कामगार असून, ते घरगुती कामगार आहेत. अशी हलकी कामे करण्याची कुवैती नागरिकांची तयारी नसल्यामुळे अशा कामगारांची संख्या मोठी आहे.भारतीय कामगारांची संख्या मोठीजगभरामधून स्थलांतरित होण्याला जर्मनी आणि सौदी अरेबिया या देशांना पसंती मिळत आहे. तसेच मागील वर्षामध्ये संयुक्त अरब अमिरातीने फ्रान्स आणि कॅनडापेक्षा अधिक परदेशी नागरिकांना आकर्षित केले आहे. सध्या कुवैतमध्ये ६.५ लाख घरगुती कामगार असून, त्यांच्यामध्ये फिलिपाइन्स, भारत, श्रीलंका आणि बांगलादेशामधील कामगार मोठ्या संख्येने आहेत. त्यामुळे कुवैतने धोरणात्मक बदल केल्यास त्याचा परिणाम भारतालाही भोगावा लागण्याची शक्यता आहे.