शहरं
Join us  
Trending Stories
1
“दिल्लीत मोदींचे सरकार तयार झाले नसते, ४०० पार सांगत होते पण...”; शरद पवारांचे सूचक विधान 
2
“जनतेचे प्रश्न सोडवण्यात भाजपा महायुती सरकार अपयशी, फक्त पैसा वसुली...”: रमेश चेन्नीथला
3
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
4
महाविकास आघाडीचे जागावाटप ठरले? काँग्रेस १०० जागा, तर ठाकरे शिवसेना, पवार गट एवढ्या जागा लढविणार
5
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: दुधाच्या अनुदानात वाढ; मंत्रिमंडळ बैठकीत २३ मोठे निर्णय
6
'३४ वर्ष वाट पाहिली अन्..'; 'लापता लेडीज'ची ऑस्कर २०२५ मध्ये एन्ट्री होताच रवी किशन भावुक
7
Nicholas Pooran ला तोड नाही; कॅरेबियन गड्यानं सेट केला षटकारांचा 'महा-रेकॉर्ड'
8
Video : रस्त्यावरील खड्ड्याने केंद्रीय मंत्र्याचीच केली फजिती, शिवराज सिंह चौहानांचा व्हिडीओ व्हायरल
9
"...तर ईश्वर आम्हाला माफ करणार नाही", 'हिट अ‍ॅण्ड रन' घटनेवर उच्च न्यायालय काय म्हणाले?
10
“संभाजीराजेंना ओबीसींचा द्वेष, मतांच्या बेरजेसाठी मनोज जरांगेंना भेटले”; कुणी केली टीका?
11
सरपंच-उपसरपंचांच्या वेतनात वाढ, ग्रामसेवक पदाचं नाव बदललं; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
12
देशातील रोजगार वाढले, जुलै 2024 मध्ये EPFO मध्ये जोडले गेले 19.94 लाख नवीन सदस्य
13
'भाऊ बोलून गळा पकडायचा!' अंकिताने सूरजला केलं टार्गेट, DP चांगलाच भडकला! प्रोमो बघाच
14
Rishabh Pant नं शेअर केली बांगलादेशची फिल्ड सेट करण्यामागची Untold Story
15
हरियाणात काय परिस्थिती? ९० जागांपैकी १६-१८ भाजपा जिंकणार? उरलेल्या आप की काँग्रेस...
16
गिरीश महाजनांविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! जयंत पाटलांकडून शिक्कामोर्तब
17
"आता सर्व काही शुद्ध झाले आहे…", तिरुपती मंदिरातील शुद्धीकरण विधींबाबत पुजाऱ्याचे भाष्य
18
लोकलमध्ये सापडली नोटांनी भरलेली बॅग, रक्कम पाहून पोलीसही अवाक्, तपास सुरू
19
“मिस्टर संभाजी भोसले, ही रयत तुम्हाला राजा मानणार नाही”; लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
20
तिरुपती बालाजी मंदिराचे शुद्धीकरण, भगवान व्यंकटेश्वर स्वामींची मागितली माफी

भारतीय लोकशाहीच्या यशाचे गमक जाणून घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2017 12:43 AM

राजकारणापासून लष्कराला अलिप्त ठेवण्यात भारत कसा यशस्वी झाला याचे गमक जाणून घ्या, असा सल्ला पाकिस्तानचे नवे लष्करप्रमुख

इस्लामाबाद : राजकारणापासून लष्कराला अलिप्त ठेवण्यात भारत कसा यशस्वी झाला याचे गमक जाणून घ्या, असा सल्ला पाकिस्तानचे नवे लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांनी तेथील लष्करी अधिकाऱ्यांना दिला आहे.जनरल बाजवा यांनी डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात रावळपिंडी येथील लष्करी अधिकाऱ्यांना उद्देशून केलेल्या भाषणाचा वृत्तांत प्रसिद्ध झाला आहे.स्वतंत्र देश म्हणून स्थापन झाल्यापासूनच्या गेल्या सात दशकांपैकी निम्म्याहून अधिक काळ पाकिस्तानात लष्करी राजवट राहिली आहे. तेथील सत्ताकारणात लष्कर नेहमीच वजनदार भूमिका बजावत असते. परंतु जनरल बाजवा यांना लष्कराने राजकारणात पडणे अजिबात मान्य नाही व लष्कराने लोकशाही शासनव्यवस्थेत आपली मर्यादा ओळखून राहावे, असे त्यांनी अधिकाऱ्यांना स्पष्टपणे सांगितले.याच संदर्भात त्यांनी भारताचे उदाहरण दिले व तेथील लोकशाही लष्कराला राजकारणापासून पूर्णपणे दूर ठेवण्यात यशस्वी झाल्याचे सांगितले. या अनुषंगाने जनरल बाजवा यांनी भारतविषयक एक अमेरिकी अभ्यासक स्टिव्हन आय. विल्किन्सन यांनी लिहिलेले ‘आर्मी अ‍ॅण्ड नेशन: दि मिलिटरी अ‍ॅण्ड इंडियन डेमॉक्रसी’ हे पुस्तक आवर्जून वाचण्याचा सल्ला दिला. विल्किन्सन हे येल विद्यापीठात निलेकेनी अध्यासनाचे प्राध्यापक आहेत.सन २०१५ मध्ये प्रसिद्ध झालेले हे पुस्तक अमेरिकेत व भारतातही टिकाकारांकडून वाखाणले गेले. भारतीय लोकशाही व्यवस्थेने लष्कराला राजकारणापासून अलिप्त ठेवण्यात कसे व का यश मिळविले याचे अभ्यासपूर्वक विवेचन त्यांनी या पुस्तकात केले आहे. (वृत्तसंस्था)