शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
2
Bengaluru Murder : फ्रीजमध्ये सर्वात खालच्या कप्प्यात होतं शिर, पोलिसांनाही फुटला घाम
3
शाब्बास पोरा! वडिलांसोबत चहा विकला, मोलमजुरी करून उदरनिर्वाह; IAS होऊन रचला इतिहास
4
काँग्रेसच्या बड्या नेत्याला केंद्रीय मंत्र्याने दिली ऑफर, हरियाणात भाजपाने टाकला नवा डाव
5
श्रीगोंदा मतदारसंघातील उमेदवारावरून शरद पवार यांनी संजय राऊतांना सुनावले, म्हणाले...
6
५०० रुपयांची लाच घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला ५ वर्षांची शिक्षा; १० वर्षांनी कोर्टाने दिला निकाल
7
IND vs BAN : पहिला सामना जिंकताच BCCI ची मोठी घोषणा; दुसऱ्या कसोटीसाठी भारताचा संघ जाहीर
8
पाकिस्तानी फवाद खानचा 'लिजेंड ऑफ मौला जट' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही; राज ठाकरेंचा इशारा
9
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
10
'वयस्कर' अश्विनला तोड नाय! भारताला अडचणीतून बाहेर काढले; सामना जिंकवला, विक्रमही नोंदवला
11
पु्ण्याकडे येत होती ट्रेन, अचानक आला मोठा आवाज आणि रुळांवरून घसरलं इंजिन
12
'लाफ्टर शेफ' शोला लागली नजर? एकानंतर एक सेलिब्रिटींसोबत अपघात; राहुल वैद्यच्या चेहऱ्यावर...
13
IND vs BAN 4th Day Live : बांगलादेशने लय पकडली पण अश्विन-जडेजाने डोकेदुखी वाढवली; भारताची विजयाकडे वाटचाल
14
मोठा अनर्थ टळला! रेल्वे ट्रॅकवर गॅस सिलिंडर; लोको पायलटच्या प्रसंगावधानामुळे अपघात टळला 
15
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
16
चीन समर्थक दिशानायके यांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपती निवडणुकीत घेतली विजयी आघाडी   
17
ENG vs AUS : इंग्लंडचे पुनरागमन पण मिचेल स्टार्क भिडला! यजमानांचा पुन्हा पराभव; ऑस्ट्रेलियाची गाडी सुस्साट
18
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
19
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
20
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज

आम्हाला मोकळे सोडा, मग भारताला दाखवतो, मसुद अझरने ओकली गरळ

By admin | Published: October 13, 2016 11:23 AM

भारताविरोधात दहशतवादी कारवाया करण्यासाठी काश्मीरमध्ये दहशतवादी समुह वाढण्यात यावेत, यासाठी पाकिस्तानच्या सरकारने हिम्मत दाखवावी, असे सांगत त्याने पाकिस्तानी सरकारलाच चुचकारले आहे.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 13 - कुख्यात दहशतवादी आणि जैश-ए- मोहम्मदचा प्रमुख मसूद अझरने पुन्हा भारताविरोधात गरळ ओकली आहे. भारताविरोधात दहशतवादी कारवाया करण्यासाठी काश्मीरमध्ये जिहादी समुह वाढण्यात यावेत, यासाठी पाकिस्तानच्या सरकारने हिम्मत दाखवावी, असे सांगत त्याने पाकिस्तानी सरकारलाच चुचकारले आहे. जैश-ए-मोहम्मदचे मॅगझिन अल-कलामद्वारे अझरने ही गरळ ओकली आहे. निर्णायक निर्णय घेण्यात होत असलेल्या दिरंगाईमुळे पाकिस्तान काश्मीरमधील ऐतिहासिक संधी गमावू शकतो, असेही त्याने म्हटले आहे. मसूद अझरच्या या मागणीमुळे भारत आणि पाकिस्तानातील संबंध आणखी ताणण्याची शक्यता आहे. 
 
काश्मीरमधील दहशतवादी हालचाली वाढवण्यासाठी पाकिस्तान सरकारने थोडेशी जरी हिम्मत दाखवली, तरी काश्मीरमधील समस्या, येथील पाण्यासंदर्भातील वाद संपुष्टात येतील, हे जमत नसेल तर, सरकारने जिहादींचे मार्ग मोकळे करावेत, अशी थेट मागणी त्याने मॅगझिनद्वारे केली आहे. असे झाल्यास 1971मधील कटू आठवणी या वर्षातील विजयामुळे पुसल्या जातील, असेही म्हणत अझरने विष पेरण्याचे काम केले आहे. अखंड भारत हे भारताचे स्वप्न आहे, मात्र जिहादी समुहांनी त्यांचे अंग-अंग जखमी केल्यामुळे अखंड भारताची त्यांची आशा अपूर्ण राहिली आहे.  तसेच, पठाणकोट आणि उरी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराची क्षमता किती आहे, हे उघड झाल्याचे देखील त्याने म्हटले आहे.  दरम्यान,1990 पासून चालत आलेल्या जिहादी नीतीमुळे पाकिस्तानला फायदा झाल्याचा दावाही त्याने केला आहे.  
 
आणखी बातम्या 
उरी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानावर दबाव निर्माण करत आहे. मात्र काश्मीममधील परिस्थिती पाहिली असता, पाकिस्तानने भारतावर दबाव टाकायला हवा होता, असेही त्याने पाकिस्तानी सरकारला डिवचण्याचे काम केले आहे. काश्मीर हा आपल्यासाठी जीवन मरणाचा मुद्दा असून, सार्क परिषद आणि नियंत्रण रेषेवरील शस्त्रसंधी आपण रद्द करायला हवी होती. काश्मीरमधील जिहाद आधीचा आणि नंतरच्या भारताबाबत विचार करा, तुम्हाला यात मोठा फरक जाणवेल. काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यामुळे भारतीय लष्कराला धक्का बसला आहे, असा कांगावाही त्याने केला आहे, असा पोकळ दावाही त्याने केला आहे.  
 
दरम्यान, भारताकडून पाकिस्तानातील दहशतवादी समुहांविरोधात कारवाई करण्याची मागणी होत आहे. मात्र दहशतवाद्यांविरोधात कारवाई करण्यावरुन पाकिस्तानचे सरकार आणि त्यांच्या लष्करातच मतभेद असल्याची बातमी काही दिवसांपूर्वी डॉनचे पत्रकार सायरिल अलमिडा यांनी छापली होती. याप्रकरणी त्यांच्यावर देशाबाहेर जाण्यासाठी बंदीही घालण्यात आली.