शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
3
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
4
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
5
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
6
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
7
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   
8
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
9
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
10
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
11
जिद्द असावी तर अशी! अंगणवाडी ते IAS अधिकारी; ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास
12
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
13
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
14
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
15
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
16
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
17
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
18
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
19
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
20
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'

"चीनला काहीही बडबडू दे, आम्ही स्पष्टच सांगतोय अरूणाचल प्रदेश भारताचाच"; पराराष्ट्र मंत्रालयाचे सडेतोड प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2024 15:11 IST

भारताचे पंतप्रधान मोदी अरूणाचल प्रदेशच्या दौऱ्यावर गेल्यानंतर चीनी नेत्यांनी विरोध केला होता

Arunachal Pradesh, India vs China: भारत आणि चीन यांच्यातील राजकीय संबंध गेल्या काही वर्षांपासून तणावाचे बनले आहेत. चीन सातत्याने शेजारील देशांवर आपली सत्ता गाजवण्याचा प्रयत्न करत आहे. भारतातही चिनी घुसखोरीचा प्रयत्न होताना सतत दिसतो. पण भारत सरकार आणि भारतीय लष्कर चीनचा प्रयत्न प्रत्येक वेळी हाणून पाडते. नुकताच भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने गुरुवारी चीनला जोरदार प्रत्युत्तर दिले. अरुणाचल प्रदेश हा भारताचाच हिस्सा आहे आणि तो कायम भारतातच राहिल, असे भारताने ठणकावून सांगितले. परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले की चीनने कितीही वेळा आपल्या बेताल दाव्यांची पुनरावृत्ती केली तरी, अरुणाचल प्रदेश आमचा भाग होता, आहे आणि नेहमीच राहील ही आमची भूमिका बदलणार नाही.

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनी पत्रकार परिषदेत चीनने अरुणाचल प्रदेशवर आपला दावा सुरू ठेवल्याच्या प्रश्नाला उत्तर देताना ही माहिती दिली. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लिन जियान यांनी सोमवारी चीनच्या दाव्याचा पुनरुच्चार केल्यानंतर काही दिवसांतच भारताकडून या दाव्याला प्रत्युत्तर देण्यात आले. चीनला प्रत्युत्तर देताना परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, अरुणाचल प्रदेशच्या मुद्द्यावर आम्ही वारंवार सांगितले आहे की, चीन आपले बिनबुडाचे दावे हवे तितक्या वेळा करू शकतो, आमचा मुद्दा बदलणार नाही. अरुणाचल प्रदेश भारताचा भाग होता, आहे आणि राहील. याआधीही भारताने एका निवेदनात म्हटले होते की, भारतीय नेत्यांच्या अरुणाचल दौऱ्याला चीनचा विरोध मूर्खपणाचा आणि निराधार आहे.

चीनने काय केला दावा?

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने हे उत्तर चीनच्या दाव्यानंतर दिले. चीनने अरुणाचल प्रदेश हा चीनचा भाग असल्याचे सांगितले होते. चीनच्या संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते कर्नल झांग झियाओगांग यांनी १५ मार्च रोजी एक निवेदन जारी करून भारतीय नेत्यांच्या अरुणाचल दौऱ्याला विरोध केला होता. पंतप्रधान मोदींनी नुकतेच अरुणाचल प्रदेशमधील सेला बोगद्याचे उद्घाटन केले होते. त्यानंतर चीनचे हे वक्तव्य समोर आले होते. ज्यामध्ये चीनने म्हटले की, 'जिजांग (तिबेटचे चिनी नाव) हा चीनचा भाग आहे आणि चीन भारतीय नेत्यांचा तथाकथित अरुणाचल प्रदेश कधीही स्वीकारणार नाही आणि त्याचा कडक विरोध करेल.' मात्र, भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने चीनला जोरदार प्रत्युत्तर देत चीनचे असे दावे फेटाळून लावले आहेत.

टॅग्स :Arunachal Pradeshअरुणाचल प्रदेशchinaचीनIndiaभारत