शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
2
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
3
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
5
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
6
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
7
इन्स्टाग्राम डिलीट केलं, सोशल मीडियापासून स्वतःला ठेवलं दूर; UPSC मध्ये नेत्रदिपक कामगिरी
8
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले
9
पैसा ही पैसा होगा... सौरव गांगुलीला मिळणार तब्बल १२५ कोटी रूपये! महत्त्वाच्या करारावर झाली स्वाक्षरी
10
Swami Samartha: 'स्वामी' शब्दाचा 'हा' अर्थ जाणून घेतलात तर तारक मंत्राचा अर्थही नव्याने उलगडेल हे नक्की!
11
हॉस्पिटलमध्ये मनीषाला बळ मिळालं डॉक्टरांच्या कुटुंबातील सदस्याकडून; आत्महत्येच्या दिवशी डॉक्टरांचा चेहरा पडला होता
12
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
13
Pahalgam Attack: दहशतवादी हल्ल्यानंतर शाहरुख हळहळला, भाईजान म्हणाला- "स्वर्गासारखं काश्मीर नरकात बदलत आहे..."
14
ट्रम्प टॅरिफची दहशत संपली? निफ्टी ४ महिन्यांच्या शिखरावर, आयटीमध्येही तेजी परतली
15
Pahalgam Terror Attack : हृदयद्रावक! साता जन्माची साथ ७ दिवसांत सुटली; रडली, शवपेटीला मिठी मारली, सॅल्यूट करुन म्हणाली...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून कारवाईची भीती, पाकिस्तानचा शेअर बाजार आपटला
17
Marriage Ritual: लग्नांनंतर वर्षभर उलटे मंगळसूत्र घालण्यामागे काय आहे कारण? जाणून घ्या!
18
हे पहिल्यांदाच घडलं.. गौतम अदानींचा 'या' व्यवसायातून काढता पाय; सुनील मित्तल यांना विकण्याची तयारी
19
Post Office ची 'ही' स्कीम करणार तुमचे पैसे डबल, जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
20
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी

७.१ रिश्टर स्केलच्या शक्तिशाली भूकंपामुळे विध्वंस; ५३ जणांचा मृत्यू, आकडा वाढण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 11:27 IST

तिबेटमधील भूकंपात आतापर्यंत ५३ जणांचा मृत्यू झाला असून मृतांची आकडेवारी वाढण्याची शक्यता आहे.

Earthquake In Tibet:नेपाळच्या सीमेला लागून असलेल्या तिबेटमधील शिजांग या डोंगराळ भागात मंगळवारी भूकंपाचा धक्का बसला आहे. ७.१ रिश्टर स्केलच्या भूकंपामुळे मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली आहे. या भूकंपाच्या धक्क्याने आतापर्यंत ५३ जणांचा मृत्यू झाला असून ६४ जण जखमी झाले आहेत. बचाव पथकाडून मदत आणि बचावकार्य सुरु करण्यात आलं असून मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. भारताच्या काही भागातही या भूकंपाचे धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे.

लोक गाढ झोपेत असतानाच भारत, नेपाळ आणि चीन ७.१ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाने हादरले. भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळ-तिबेट सीमेजवळ होता. या शक्तिशाली भूकंपामुळे ५३ जणांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी पहाटे ७.१ रिश्टर स्केलचा भूकंप झाल्यानंतर त्याचा प्रभाव चीन आणि भारतातील अनेक शहरांमध्येही दिसून आला. तिबेटमधील भूकंपामुळे दिल्ली, बिहार, बंगालसह अनेक राज्यांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले.

चीनच्या भूकंप निरीक्षण संस्थेने भूकंपाची तीव्रता ६.८ इतकी नोंदवली. भूकंपामुळे तिबेटमध्ये प्रचंड विध्वंस झाला आहे. सकाळी ९:०५ वाजता शिआन स्वायत्त प्रदेशातील शिगाझे शहरातील डिंगरी काउंटीला भूकंपाचा धक्का बसल्याने ५३ लोकांचा मृत्यू झाला आणि ६४ हून अधिक जखमी झाल्याची माहिती आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

तिबेटमध्ये सकाळच्या सुमारास झालेल्या या भूकंपामुचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. भूकंपानंतर काही सेकंदात किती इमारती मोडकळीस आल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. भूकंपाच्या जोरदार धक्क्याने घाबरलेले लोक घराबाहेर पळताना दिसत आहेत.

नेपाळ, भूतान आणि भारताच्या काही भागांसह शेजारील देशांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाचा प्रभाव लक्षणीय होता ज्यामुळे अनेक ठिकाणी इमारती हादरल्या. तिबेटमधील स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, भूकंपाच्या केंद्राजवळील भागामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती दिली. त्यापैकी काही भूकंपाच्या केंद्रापासून फक्त ५ किलोमीटर अंतरावर होते. 

तिबेट शेजारील नेपाळमध्ये सक्रिय भूकंपीय क्षेत्र आहे. ज्यामुळे वारंवार आणि कधीकधी आपत्तीजनक भूकंप होत असतात. याआधी २०१५ मधील ७.८ रिश्टर स्केलच्या मोठ्या भूकंपाने नेपाळला उद्ध्वस्त केले होते. त्यात जवळपास ९,००० लोक मारले गेले आणि २२,००० हून अधिक लोक जखमी झाले होते.

टॅग्स :EarthquakeभूकंपNepalनेपाळIndiaभारत