शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
2
"...तर ईश्वर आम्हाला माफ करणार नाही", 'हिट अ‍ॅण्ड रन' घटनेवर उच्च न्यायालय काय म्हणाले?
3
“संभाजीराजेंना ओबीसींचा द्वेष, मतांच्या बेरजेसाठी मनोज जरांगेंना भेटले”; कुणी केली टीका?
4
सरपंच-उपसरपंचांच्या वेतनात वाढ, ग्रामसेवक पदाचं नाव बदललं; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
5
देशातील रोजगार वाढले, जुलै 2024 मध्ये EPFO मध्ये जोडले गेले 19.94 लाख नवीन सदस्य
6
Rishabh Pant नं शेअर केली बांगलादेशची फिल्ड सेट करण्यामागची Untold Story
7
हरियाणात काय परिस्थिती? ९० जागांपैकी १६-१८ भाजपा जिंकणार? उरलेल्या आप की काँग्रेस...
8
गिरीश महाजनांविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! जयंत पाटलांकडून शिक्कामोर्तब
9
"आता सर्व काही शुद्ध झाले आहे…", तिरुपती मंदिरातील शुद्धीकरण विधींबाबत पुजाऱ्याचे भाष्य
10
लोकलमध्ये सापडली नोटांनी भरलेली बॅग, रक्कम पाहून पोलीसही अवाक्, तपास सुरू
11
“मिस्टर संभाजी भोसले, ही रयत तुम्हाला राजा मानणार नाही”; लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
12
तिरुपती बालाजी मंदिराचे शुद्धीकरण, भगवान व्यंकटेश्वर स्वामींची मागितली माफी
13
Airtel New Recharge Plans: एअरटेलनं लाँच केले ३ नवे प्लॅन्स; रिचार्ज करण्यापूर्वी एकदा पाहाच, काय आहे खास?
14
टीम इंडियानं पाडला बांगलादेशचा बुक्का; मग चव्हाट्यावर आला पाक क्रिकेटमधील 'मॅटर'; जाणून घ्या सविस्तर
15
"त्याला आवर घालायचे काम तुमच्याकडून..."; नितेश राणेंच्या भाषेवरून शरद पवार संतापले, भाजपाला सुनावले
16
युक्रेन युद्धादरम्यान रशियाला मोठा धक्का, चाचणीदरम्यान फुटलं महाक्षेपणास्त्र
17
तिरुपती लाडू वाद: सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल; तपास समिती स्थापन करण्याची मागणी
18
डेटिंग अ‍ॅपवरून ओळख, मुलावर जडलं प्रेम अन् एका फोनमुळे गमावले लाखो रुपये...
19
महिलांसाठी मोठी बातमी: लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता कधी मिळणार?; नवी माहिती समोर
20
डॉक्टर व्हायचेय, पण बजेट २० लाख आहे, मग या देशात होऊ शकता MBBS

"बालाकोटचा वापर मोदी सरकारने निवडणुकांसाठी केला"; इम्रान खान 

By देवेश फडके | Published: January 18, 2021 1:25 PM

अर्णव गोस्वामी आणि पार्थ दासगुप्ता यांच्यातील व्हॉट्सअॅप चॅट व्हायरल झाल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. यासंदर्भातील वादात आता पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी उडी घेतली असून, मोदी सरकारवर टीका केली आहे.

ठळक मुद्देअर्णव गोस्वामी आणि पार्थ दासगुप्ता यांच्या व्हायरल चॅटवरून इम्रान खान यांची टीकाबालाकोटचा वापर मोदी सरकारने निवडणुकांसाठी केला - इम्रान खानपाकिस्तानातील दहशतवाद भारत पुरस्कृत; इम्रान खान यांचा दावा

इस्लामाबाद : अर्णव गोस्वामी आणि पार्थ दासगुप्ता यांच्यातील व्हॉट्सअॅप चॅट व्हायरल झाल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. यासंदर्भातील वादात आता पाकिस्तानचेपंतप्रधानइम्रान खान यांनी उडी घेतली असून, मोदी सरकारवर टीका केली आहे. मोदी सरकार भारताचे रुपांतर वाईट देशामध्ये करत आहे, असा दावा इम्रान खान यांनी केला आहे. 

अर्णव गोस्वामी आणि पार्थ दासगुप्ता यांचे व्हॉट्सअॅप संभाषण व्हायरल झाल्यानंतर पाकिस्तानचेपंतप्रधान इम्रान खान यांनी ट्विट करत मोदी सरकारवर टीका केली. या दोघांच्या व्हॉट्सअॅप संवादात बालाकोट एअर स्ट्राइकबद्दलही उल्लेख आढळला आहे. त्यानंतर इम्रान खान यांनी या प्रकरणी भाष्य केले आहे. 

सन २०१९ मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्र संघाच्या सर्वसाधारण सभेत बोलताना भारतातील फॅसिस्ट नरेंद्र मोदी सरकारने देशातील निवडणुकांसाठी बालाकोटचा वापर केला, असे सांगितले होते. एका भारतीय पत्रकाराच्या संवादातून हा नवीन खुलासा झाला आहे. हा पत्रकार त्याच्या आक्रमकपणामुळे ओळखला जातो. या संवादातून मोदी सरकार आणि भारतीय माध्यमांमध्ये असलेले चुकीच्या संबंधाचाही खुलासा झाला आहे, असे ट्विट इम्रान खान यांनी केले आहे.   

पुढे केलेल्या आणखी एका ट्विटमध्ये इम्रान खान म्हणतात की, पाकिस्तानातील दहशतवादामागे भारतच आहे. गेल्या १५ वर्षांपासून भारतव्याप्त जम्मू काश्मीर आणि आमच्याविषयी चुकीची माहिती पसरवली जात आहे. या चॅटमुळे महत्त्वाच्या बाबी उघडकीस आल्या आहेत. भारतातील माध्यमांचे संबंध उघड झाले आहेत, जे आण्विक क्षेत्राला संघर्षाकडे ढकलत आहेत, असा दावा इम्रान खान यांनी केला. 

पुन्हा सांगतो की, आमचे सरकार पाकिस्तान आणि मोदी सरकारचे डाव उघडे पाडत राहिले. आंतरराष्ट्रीय समुदायाने भारताला बेजबाबदार आणि लष्करी अजेंड्यापासून थांबवायला हवे. कारण मोदी सरकार संपूर्ण खंडाला एका संघर्षामध्ये ढकलू शकते, असेही इम्रान खान यांनी आपल्या ट्विटमध्ये सांगितले आहे. 

टॅग्स :Imran Khanइम्रान खानPakistanपाकिस्तानprime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदी