शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
3
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
5
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
6
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
7
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
8
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
9
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
10
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
11
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
12
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
13
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
14
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
15
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
16
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
17
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
18
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
19
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
20
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...

बांगलादेशचे मोहम्मद युनूस सरकार पाकिस्तानवर मेहरबान; भारतासाठी राष्ट्रीय सुरक्षेचा धोका वाढणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2024 13:49 IST

बांगलादेशने पहिल्यांदाच पाकिस्तानसोबत थेट सागरी संपर्क करत आहे.

बांगलादेशमध्ये मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली अंतरिम सरकार स्थापन झाल्यापासून भारतासोबतचे संबंध सुरळीत राहिलेले नाहीत. आता बांगलादेशचे अंतरिम सरकार पाकिस्तानवर मेहरबान झाल्याचे दिसत आहे. दरम्यान, समुद्रमार्गे वाढता व्यापार चर्चेत आला आहे. सप्टेंबर महिन्यातच बांगलादेश सरकारने पाकिस्तानी मालाला तपासणीतून दिलासा दिला होता आणि आता एक पाकिस्तानी जहाज चितगावला पोहोचले.

'सत्ते'पुढे शहाणपण नाही! सरकार वाचवण्यासाठी PM नेतन्याहू मान्य करणार हमासच्या अटी?

पाकिस्तानमधील कराची येथून हे जहाज बांगलादेशातील चितगाव येथे पोहोचले. ११ नोव्हेंबर रोजी त्याच जहाजातून माल बांगलादेशात उतरवण्यात आले, त्या जहाजाला तपासणीतून सूट देण्यात आली. पाकिस्तानी जहाज बांगलादेशच्या कापड उद्योगासाठी कच्चा माल आणि खाद्यपदार्थ घेऊन जात होते. बांगलादेशातील पाकिस्तानचे राजदूत सय्यद अहमद मारूफ यांनी हे पाऊल दोन्ही देशांमधील संबंधांमधील महत्त्वाचे पाऊल असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की, येणारा काळ दोन्ही देशांमधील व्यापाराच्या नवीन संधी उघड करेल.

बांगलादेशला १९७१ मध्ये स्वातंत्र्य मिळाले आणि त्यानंतर पाकिस्तानशी थेट सागरी संपर्क साधण्याची ही पहिलीच वेळ आहे. ऑक्टोबर महिन्यातच बांगलादेशच्या अंतरिम सरकारने पाकिस्तानातून येणाऱ्या वस्तूंच्या आवश्यक चाचणीवरही बंदी घातली होती. आता बांगलादेशात पाकिस्तानमधून अशाच प्रकारच्या आयातीवर लादण्यात आलेले निर्बंधही बरेच शिथिल करण्यात आले आहेत. या संपूर्ण घटनेचा आशिया खंडावर परिणाम होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. म्यानमार देखील चितगावजवळ आहे. याचा भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेवरही परिणाम होईल.

भारत अनेक दिवसांपासून चितगाव बंदरावर होत असलेल्या हालचालींवर लक्ष ठेवून आहे. अनेकवेळा भारताने येथे आक्षेपार्ह वस्तूही जप्त केल्या आहेत. आता पाकिस्तान आणि बांगलादेशमधील वाढणारे सागरी व्यापारी संबंध भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी चिंतेचा विषय बनू शकतात.

टॅग्स :Bangladeshबांगलादेश