शहरं
Join us  
Trending Stories
1
अखेर रणजीतसिंह मोहिते पाटलांचं ठरलं! आमदारकीचा राजीनामा; लवकरच पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश
2
ठाकरेंना कोणत्या जागा हव्यात, ज्यामुळे महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा गाडा फसलाय?
3
वडील बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर झिशान सिद्दीकींची संतप्त पोस्ट; शायरीतून रोख कुणाकडे?
4
भाजप नेतृत्वाच्या मनात नेमकं काय?; फडणवीस-अजितदादा बाहेर, अमित शाह-CM शिंदेंची बंद दाराआड चर्चा!
5
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला की नाही? फडणवीसांनी दिली महत्वाची माहिती
6
माढ्यात पवारांना धक्का बसणार? काँग्रेसच्या इच्छुक उमेदवाराने मराठा समाजाकडेच मागितली उमेदवारी
7
JMM-काँग्रेसमध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, कोण किती जागांवर निवडणूक लढवणार? जाणून घ्या...
8
IND vs NZ : कसोटी जिंकण्याची गॅरंटी किती? रेकॉर्ड बघून म्हणाला; "टीम इंडिया है तो मुमकिन है"
9
'वादळवाट', 'आभाळमाया' मालिकांचे गीतकार मंगेश कुलकर्णी यांचं निधन
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "...तर महाराष्ट्रात पडसाद उमटतील", बाबासाहेब देशमुखांनी ठाकरेंची चिंता वाढवली!
11
महागड्या प्लॅनचे टेन्शन संपले, Jio चा 84 दिवसांचा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन
12
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'सांगोला'मध्ये ठाकरेंविरोधात पुन्हा 'सांगली पॅटर्न'?
13
Ladki Bahin Yojana: मोठी बातमी! लाडक्या बहिणी दिवाळी बोनसपासून मुकणार? निवडणूक आयोगाने योजना रोखली
14
IND vs NZ : भारताने ५४ धावांत ७ गडी गमावले; सुवर्णसंधी हुकली, विजयासाठी न्यूझीलंडसमोर खूप सोपे आव्हान
15
महाविकास आघाडीला झटका! अखिलेश यादवांनी चार उमेदवार केले जाहीर
16
झारखंडमध्ये निवडणूक आयोगाची मोठी कारवाई; पोलीस महासंचालकांना हटविले
17
माढ्यात तुतारीबाबतचा संभ्रम कायम; चार इच्छुक शरद पवारांच्या भेटीला पोहोचल्यानंतर काय घडलं? 
18
"प्रत्यार्पण करण्यास नकार दिला तर..."; शेख हसीना प्रकरणात बांगलादेशचा भारताला इशारा
19
Scorpio पेक्षा महागडी आहे 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत पाहून तुमचा विश्वास बसणार नाही
20
"राणा हे आमदार नव्हे, तर सावकार आहेत", रवी राणांवर भाजपच्या तुषार भारतीयांचा हल्लाबोल

भारत, पाकसह 5 देशांत सर्वाधिक गरीब लोक; संयुक्त राष्ट्रांच्या ताज्या अहवालातील माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2024 1:59 PM

संयुक्त राष्ट्रे : भारत , पाकिस्तानसह पाच देशांमध्ये सर्वाधिक लोक गरिबीत जीवन कंठत असल्याचे असे संयुक्त राष्ट्रांच्या ताज्या अहवालात ...

संयुक्त राष्ट्रे : भारत, पाकिस्तानसह पाच देशांमध्ये सर्वाधिक लोक गरिबीत जीवन कंठत असल्याचे असे संयुक्त राष्ट्रांच्या ताज्या अहवालात म्हटले आहे. त्यापैकी भारतात (२३.४ कोटी), पाकिस्तान (९.३ कोटी), इथिओपिया (८.६ कोटी), नायजेरिया (७.४ कोटी), काँगो (६.६ कोटी) गरीब लोक आहेत.  जगात १.१ कोटी लोक गरिबीने पिचून निघाले आहेत. त्यात निम्मे प्रमाण मुलांचे आहे. अशांपैकी ४० टक्के मुले युद्धग्रस्त तसेच सामाजिक, राजकीय स्थिती अतिशय नाजूक असलेल्या देशांमध्ये राहत आहेत. 

संयुक्त राष्ट्रांचा विकास कार्यक्रम (यूएनडीपी) व ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या दारिद्र्य, मानवी विकास विषयक विभागाने तयार केलेल्या ताज्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. त्यात म्हटले आहे की, गरिबांपैकी ८३ टक्के लोक ग्रामीण भागात राहतात. आफ्रिकेचा काही भाग व दक्षिण आशियामध्ये हे प्रमाण अधिक आहे. आरोग्य, शिक्षण आणि राहणीमान यासह दहा मापदंडांचा वापर करून बहुआयामी गरिबी निर्देशांकांबाबतचे अहवाल संयुक्त राष्ट्रे व ऑक्सफर्ड विद्यापीठ २०१०पासून तयार करत आहे. यंदाच्या अहवालात ११२ देशांतील गरिबीचा आढावा घेण्यात आला. या देशांतील एकूण लोकसंख्या ६.३ अब्ज आहे. गरिबीत जगणाऱ्या लोकांपैकी निम्मे प्रमाण मुलांचे असून ते १८ वर्षांहून कमी वयोगटातील आहेत. 

११.७ कोटी लोकांनी जीव वाचविण्यासाठी केले पलायनदुसऱ्या महायुद्धानंतर जगात सर्वाधिक संघर्ष २०२३मध्ये उफाळून आला. त्यात नैसर्गिक आपत्ती व अन्य कारणांचीही भर पडली. या कारणांमुळे त्यावर्षी ११.७ कोटी लोकांना जीव वाचविण्यासाठी स्वत:ची घरेदारे सोडून पलायन करावे लागले होते. जगातील ४५.५ कोटी गरीब लोकांना पोषक आहार, पाणी, स्वच्छता, वीज, शिक्षण आदी मूलभूत सुविधा मिळविण्यासाठी खूप संघर्ष करावा लागतो.  

टॅग्स :united nationsसंयुक्त राष्ट्र संघIndiaभारतPakistanपाकिस्तान