शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारचा मोठा निर्णय; 'वन नेशन वन इलेक्शन' प्रस्तावाला मंत्रिमंडळाची मंजुरी
2
"बाळासाहेब असते, तर तुम्हाला उलटे टांगले असते", बोरनारेंचा उद्धव ठाकरेंवर वार
3
जगातील अनेक देशांमध्ये 'वन नेशन वन इलेक्शन'चा फॉर्म्युला लागू, अशी आहे प्रक्रिया...
4
रोहित शर्माची मुलाखत घेताना पहिला प्रश्न कुठला विचारशील? विराट कोहलीने दिलं मजेशीर उत्तर
5
५०० रुपयांत गॅस सिलिंडर, मोफत उपचार... हरियाणा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून जाहीरनामा प्रसिद्ध, कोणासाठी काय-काय?
6
Bigg Boss Marathi Season 5: निक्कीसोबत मैत्री? वैभव चव्हाण म्हणाला, 'तोंडावर सांगतो तिच्याशी माझी कधीच..."
7
राज्याला महिला CM मिळेल? सुप्रिया सुळे-रश्मी ठाकरेंचे नाव चर्चेत? काँग्रेस खासदार म्हणतात...
8
“राहुल गांधींच्या जीवाला धोका, रणनीती आखली जाते, केंद्रीय गृहमंत्री...”; राऊतांचा मोठा आरोप
9
राहुल गांधी यांच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्ये; काँग्रेस आरपारच्या भूमिकेत, कार्यकर्ते रस्त्यावर उतरले
10
४ वर्ष IPL च्या मैदानात! बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची क्रिकेटमधून बंपर कमाई
11
Vastu Shastra: मीठ मोहरीने केवळ व्यक्तीचीच नाही तर वास्तुचीही दृष्ट काढता येते; वाचा वास्तु टिप्स!
12
BSEच्या शेअरमध्ये 'बुल रन'; दिवसभरात १५% पेक्षा अधिक वाढ; NSE IPO शी काय आहे कनेक्शन?
13
...अन् आमदार सुरेश भोळे पडले खाली; गणपती मिरवणुकीतील व्हिडीओ व्हायरल
14
IND vs BAN : ड्रॉप नाही करत म्हणत गंभीरनं या दोघांना बसवलं बाकावर
15
राजकीय स्टेटमेंट करणार नाही असे म्हणत जरांगेंचे पुन्हा फडणवीसांवर आरोप; काय म्हणाले...
16
रुग्णांकडून एक रुपया जास्त घेतली फी, भाजप आमदार झाले संतप्त; कर्मचाऱ्याची गेली नोकरी
17
Ricky Ponting प्रीती झिंटाच्या PBKS संघाच्या ताफ्यात; मिळाली ही मोठी जबाबदारी
18
"...तर फडणवीस मुख्यमंत्री होतील"; महाजनांच्या विधानावर शिंदे गट म्हणतो, "आम्ही वाद घालणार नाही, पण..."
19
नरहरी झिरवळांविरोधात शिंदेंच्या माजी आमदारानेच थोपटले दंड, दिंडोरीतून देणार आव्हान!
20
सुखी, समाधानी, समृद्ध जीवन हवे? पाहा, स्वामी समर्थ अन् शंकर महाराजांची प्रभावी वचने

भारतासाठी धोक्याची घंटा? बांग्लादेशातील नवीन सरकारने 'या' कट्टर दहशतवाद्याची केली सुटका

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2024 9:29 PM

Bangladesh Terror Groups : शेख हसीना यांनी शेकडो दहशतवादी आणि इतर गुन्हेगारांसह यालाही तुरुंगात टाकले होते.

Bangladesh Terror Groups : बांग्लादेशमध्ये शेख हसीना यांचे सरकार कोसळले असून, आता देशात मोबम्मद युनूस यांच्या नेतृत्वात अंतरिम सरकार स्थापन झाले आहे. दरम्यान, हे सरकार स्थापन होताच अन्सारुल्ला बांगला टीम (ABT) या दहशतवादी संघटनेचा प्रमुख मुफ्ती जशीमुद्दीन रहमानी याची तुरुंगातून सुटका करण्यात आली आहे. भारतासाठी ही मोठी चिंतेची बाब ठरू शकते, कारण ABT ने भारतात आपले दहशतवादी नेटवर्क वाढवण्याचा प्रयत्न केला होता. यामुळेच दोन वर्षांपूर्वी भारतीय यंत्रणांना अनेक महिने दहशतवादविरोधी अभियान राबवावे लागले होते. ABT ही अल-कायदा इन द इंडियन सबकॉन्टिनेंट (AQIS) शी संबंधित दहशतवादी संघटना होती.

जशीमुद्दीन रहमानी तुरुंगातून बाहेर बांग्लादेशी मीडिया रिपोर्ट्सनुसार, मुफ्ती जशीमुद्दीन रहमानी 27 ऑगस्ट रोजी गाझीपूरच्या उच्च सुरक्षा असलेल्या काशिमपूर मध्यवर्ती कारागृहातून बाहेर आला. त्याच्या एक दिवस आधीच त्याला 2008 च्या एका दहशतवादी प्रकरणात जामीन मिळाला होता. मागील शेख हसीना सरकारने जे शेकडो दहशतवादी आणि इतर गुन्हेगारांना तुरुंगात टाकले होते, त्यात याचाही समावेश होता. 

शेख हसीना सरकारने कारवाई केली शेख हसीना यांच्या राजीनाम्यानंतर लगेचच बांग्लादेशातील दोन तुरुंगातून अनेक संशयित दहशतवाद्यांसह 700 हून अधिक कैदी पळून गेले. त्यामुळे भारताबरोबरच बांग्लादेशातही सुरक्षेला मोठा धोका निर्माण झाला आहे. सध्याची राजकीय अस्थिरता बांग्लादेशातील कट्टरपंथी इस्लामी घटकांच्या एकत्रीकरणात महत्त्वाची भूमिका बजावू शकते, अशी भीती विश्लेषकांनी व्यक्त केली आहे. पाकिस्तानी गुप्तचर संस्था इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजन्स (आयएसआय) च्या सांगण्यावरून हे लोक भारतविरोधी कारवायांमध्येही सहभागी होऊ शकतात, असे त्यांचे म्हणणे आहे.

संघटना भारतासाठी का धोका आहे?जाणकारांच्या म्हणण्यानुसार, AQIS आणि इस्लामिक स्टेट प्रामुख्याने पैसा उभारण्यासाठी बांग्लादेश आणि आसपासच्या प्रदेशात त्यांचे नेटवर्क वाढवत होते. पण, सुरक्षा यंत्रणांनी सुरू केलेल्या कारवाईमुळे भारतीय तरुणांना आपल्या संघटनेत सामावून घेण्याचे त्यांचे प्रयत्न यशस्वी झाले नाहीत. 

कोण आहे जशीमुद्दीन रहमानी?रहमानी याला 2013 मध्ये सेक्युलर ब्लॉगर राजीव हैदर यांच्या हत्येप्रकरणी दोषी ठरवण्यात आले होते. 15 फेब्रुवारी 2013 रोजी रात्री हैदरची ढाका येथील घरासमोर हत्या करण्यात आली होती. या हत्येप्रकरणी शहर न्यायालयाने फैसल बिन नईम आणि रेझवानुल आझाद राणा या दोघांना फाशीची शिक्षा सुनावली होती. रहमानी आणि इतर चौघांना तुरुंगवासाची शिक्षा झा

टॅग्स :BangladeshबांगलादेशterroristदहशतवादीIndiaभारत