शहरं
Join us  
Trending Stories
1
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
2
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळविरांनी..."
3
नंदुरबारमध्ये तणाव; जाळपोळ, दगडफेक रोखण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधूर
4
“भ्रष्ट मार्गाने आलेले खोके सरकार घालवून राज्यात मविआचा मुख्यमंत्री होणार”: बाळासाहेब थोरात
5
Narendra Modi : "ते आपल्या देवी-देवतांना 'देव' मानत नाहीत...", पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर घणाघात
6
आता मनोज जरांगे यांचा भाऊही आंदोलन करणार, मुख्यमंत्र्यांना भेटून दिला इशारा
7
"धर्माच्या नावाखाली गरिबांच्या पोरांचा बळी देऊ नका", निवृत्ती महाराजांचं कळकळीचं आवाहन, कीर्तन चर्चेत
8
“वाढत्या लोकप्रियतेमुळेच घाबरलेल्या भाजपाकडून राहुल गांधींना धमक्या”; काँग्रेसची टीका
9
मोसादही पाहत राहिल... ना मिसाईल, ना बाँब; घातक एनर्जी वेव्हजचे शस्त्र भारताच्या हाती लागणार
10
‘लाडकी बहीण’पेक्षा कांद्याला भाव द्या, भाजपा-काँग्रेसला उखडून फेकायचे दिवस आलेत: बच्चू कडू
11
नरेंद्र मोदी उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर, पीएम विश्वकर्मा योजनेच्या कार्यक्रमाची वर्ध्यात जोरदार तयारी
12
बिहारचे मराठमोळे, दबंग आयपीएस शिवदीप लांडे यांचा तडकाफडकी राजीनामा; एवढे काय घडले?
13
Kolkata Doctor Case : संदीप घोष, अभिजित मंडलच्या मोबाईलमध्ये दडली आहेत अनेक गुपितं; CBI चा मोठा दावा
14
भारतात कुठे वापरले जातात सर्वाधिक कंडोम? राज्याचं नाव जाणून थक्क व्हाल!
15
"पापा कहते हैं, "बड़ा नाम करेगा"; R Ashwin च्या वडिलांनी एन्जॉय केली लेकाची फटकेबाजी
16
‘’राहुल गांधींना जीवे मारणारी धमकी सहन करणार नाही; ‘ईंट का जवाब पत्थर से देंगे’’, नाना पटोले यांचा इशारा   
17
'बलात्कार, व्हिडीओ अन् दुसऱ्यांसोबत ठेवायला लावले संबंध'; भाजपा आमदारावर गुन्हा
18
"राहुल गांधी यांना १०० वेळा दहशतवादी म्हणेन’’, रवनीत सिंग बिट्टू यांची टीका   
19
विधानसभेपूर्वी तुतारी हाती घेणार?; चर्चेनंतर भाजप आमदार अश्विनी जगताप यांचं स्पष्टीकरण 
20
मोदींच्या पोस्टवर वीरेंद्र सेहवागची प्रतिक्रिया; पण काही वेळातच पोस्ट केली डिलीट, कारण...

भयंकर...! हा देश 70 हत्ती, 300 झेब्रे अन् घोड्यांसह 700 जानवरं मारणार, ओढवलीय भीषण परिस्थिती? 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 01, 2024 12:32 PM

...यामुळे, आता नागरिकांचा जीव वाचवण्यासाठी येथील सरकारने काही प्राणी मारण्याचा निर्णय घेतला आहे.

दक्षिण आफ्रिकन देश नामिबिया सध्या गेल्या 100 वर्षांच्या इतिहासातील सर्वात भीषण दुष्काळाचा सामना करत आहे. यामुळे येथील नागरिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. येथील नागरिकांना दोन वेळचे अन्न मिळणेही अवघड झाले आहे. पिण्याच्या पाण्याचाही मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. सरकारी धान्याची गोदामेही रिकामी झाली आहेत. कुठून तरी मदत मिळेल, अशी आशाही नाही, अशा संपूर्ण परिस्थितीमुळे सरकारही हतबल दिसत आहे. यामुळे, आता नागरिकांचा जीव वाचवण्यासाठी येथील सरकारने काही प्राणी मारण्याचा निर्णय घेतला आहे.

आता नामिबिया सरकारने लोकांची भूक भागविण्यासाठी हत्ती आणि पाणघोड्यांसह 700 हून अधिक वन्य प्राण्यांना मारण्याचे आदेश दिले आहेत. यासंदर्भात, देशाचे म्हणणे आहे की, ते या प्राण्यांपासून मिळणारे मांस नागरिकांमध्ये वितरित करणार आहेत. याचे मुख्य कारण नामिबियातील अन्न संकट आहे.

न्यूयॉर्क टाइम्समध्ये दिलेल्या वृत्तानुसार, दक्षिण आफ्रिकेतील बहुतांश भाग दुष्काळाने त्रस्त आहेत. संपूर्ण प्रदेशात 30 दशलक्षाहून अधिक लोक प्रभावित झाले असल्याचे युनायटेड नेशन्स वर्ल्ड फूड प्रोग्रामने जूनमध्ये म्हटले होते.

हे प्राणी मारले जाणार - हत्तींशिवाय, 300 झेब्रा, 30 पाणघोडे, 50 इम्पाला, 60 म्हशी, 100 ब्लू वाइल्डबीस्ट आणि 100 एलँड मारण्याची देशाची योजना आहे. तसेच, नामिबियातील 84 टक्के अन्न संसाधने आधीच संपली आहेत, असे संयुक्त राष्ट्राच्या प्रवक्त्यांनी गेल्या आठवड्यातच म्हटले होते.

56,800 किलो मांस सरकारला मिळालं -नामिबियाच्या पर्यावरण, वनीकरण आणि पर्यटन मंत्रालयाने सोमवारी दिलेल्या माहितीनुसार, हे प्राणी राष्ट्रीय उद्याने आणि असा भागातून येतील जेथे त्यांची संख्या अधिक आहे. या प्राण्यांना व्यावसायिक शिकाऱ्यांकडून मारले जाईल. काही कंपन्यांना कंत्राटही देण्यात आली आहेत. आतापर्यंत 157 प्राण्यांची शिकार करण्यात आली असून यातून सरकारला 56,800 किलोपेक्षा अधिक मांस मिळाले आहे. हे मांस लोकांमध्ये वितरित केले जात आहे. मंत्रालयाने म्हटले आहे की, नैऋत्य आफ्रिकन देशांतील दुष्काळाचा परिणाम कमी करणए हा या कार्यक्रमाचा उद्दिष्ट आहे. 

टॅग्स :South Africaद. आफ्रिकाdroughtदुष्काळ