शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानी फवाद खानचा 'लिजेंड ऑफ मौला जट' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही; राज ठाकरेंचा इशारा
2
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
3
मोठा अनर्थ टळला! रेल्वे ट्रॅकवर गॅस सिलिंडर; लोको पायलटच्या प्रसंगावधानामुळे अपघात टळला 
4
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
5
चीन समर्थक दिशानायके यांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपती निवडणुकीत घेतली विजयी आघाडी   
6
ENG vs AUS : इंग्लंडचे पुनरागमन पण मिचेल स्टार्क भिडला! यजमानांचा पुन्हा पराभव; ऑस्ट्रेलियाची गाडी सुस्साट
7
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
8
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
9
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
10
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
11
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
12
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
13
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
14
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
15
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
16
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
17
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
18
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
20
आता मेडिकलच्या ‘पीजी’च्या जागा वाढणार; वैद्यकीय आयोगाने अर्ज मागविले

नरेंद्र मोदींनी वाजपेयींच्या मार्गाने जावं - खुर्शीद कसुरींची अपेक्षा

By admin | Published: October 12, 2015 7:08 PM

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींचा मार्ग योग्य होता आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनीदेखील हे ओळखायला हवं आणि त्याच मार्गाने जायला हवं अशी अपेक्षा पाकस्तानचे

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १२ - माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींचा मार्ग योग्य होता आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनीदेखील हे ओळखायला हवं आणि त्याच मार्गाने जायला हवं अशी अपेक्षा पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री खुर्शीद कसुरी यांनी व्यक्त केली आहे.  भारत व पाकिस्तान या दोन्ही राष्ट्रांनी इतिहासाचं पार खोबरं केलेलं आहे असं सांगताना पुढचा प्रवास हा सहमतीने, चर्चेने करायला हवा असं कसुरी म्हणाले. दोन्ही देशांमध्ये चांगल्या विचारांची बुद्धीमान माणसं आहेत, त्यांना प्रोत्साहन द्यायला हवं आणि त्यांनी दोन्ही देशांच्या संबंधांबाबत प्रत्येक गोष्टीवर देखरेख करावी असं सांगतानाच संयुक्त राष्ट्रांच्या देखरेखीपेक्षा ही माणसं जास्त चांगलं आणि सकारात्मक काम करतील असा प्रस्ताव कसुरी यांनी मांडला.
सुधींद्र कुलकर्णी यांना काळं फासल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कसुरींना व कार्यक्रमाला सुरक्षा पुरवणं हे सरकारचं कर्तव्य असल्याचं सांगितलं तर शिवसेनेचा विरोध कायम राहील आणि वेट अँड वॉच करा असं सांगत शिवसेनेच्या संजय राउत यांनी कार्यक्रम उधळण्याची शक्यता व्यक्त केली. या पार्श्वभूमीवर अत्यंत कडेकोट पोलीस बंदोबस्तात कार्यक्रम सुरू झाला व कुठलाही अनुचित प्रकार न घडता पारही पडला. 
इतिहासासंबंधी असलेले गैरसमज सुधारणं हा पुस्तक लिहिण्यामागचा हेतू आहे असं सांगणा-या कसुरींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे पुढीलप्रमाणे:
 
- दोन्ही देशांतील तणावामुळे सामान्य नागरिक, जवान शहीद होत आहेत. इच्छा असेल तर या सर्व परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी मार्ग मिळेलच.
- भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना विकासाचे वचन दिले आहे, पण आपल्याला शांततेची आवश्यकता आहे. यासंदर्भात अटलबिहारी वाजपेयी यांचा मार्गच योग्य होता, हे मोदींच्या लक्षात येईल अशी मला आशा आहे.
- दोन्ही देशांनी इतिहासाची हत्या केल्यानेच आज ही परिस्थिती निर्माण झाली आहे.
- या पुस्कातून मी वस्तुस्थिती मांडली आहे.
- भारत-पाकिस्तान संबंधांच्या चर्चेदरम्यान सरकारबाह्य शक्तींना असता कामा नये.
- दोन्ही देशांमध्ये काही गैरसमज आहेत, ते दूर करणे, हाच हे पुस्तक लिहीण्यामागचा उद्देश होता.
- फाळणीच्या निर्णयामुळे तेथील हिंदू खूप संतापले होते, त्यामुळे पंडित जवाहरलाला नेहरूंनी लाहोरला भेट दिल्याची आठवण कसुरींनी सांगितली.
- आपसांत संवाद साधला तरच नवीन इतिहास निर्माण होऊ शकतो, दोन्ही देशांच्या सरकारनी संवाद कायम राखला पाहिजे.
- माझ्यासाठी कडेकोट सुरक्षा बंदोबस्त तैनात केल्याबद्दल मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानतो.