शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
3
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
4
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
5
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
7
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
8
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
9
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
10
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
11
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
12
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
13
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
14
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
15
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
16
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
17
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
18
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
19
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
20
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन

नवाझ शरीफ पाकिस्तानचे पंतप्रधान होणार नाहीत! 'ही' आहेत २ महत्त्वाची कारणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2024 15:56 IST

पाकिस्तानात कोणालाही स्पष्ट बहुमत नाही

Pakistan New PM Nawaz Sharif Shahabaz Sharif: पाकिस्तानात निवडणुका पार पडल्या असून त्यात कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. अशा वेळी इम्रान खान विरूद्ध नवाझ शरीफ असा सामना असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. गेल्या वर्षी नवाझ शरीफ लंडनहून पाकिस्तानात परतले तेव्हा ते केवळ पंतप्रधान होण्यासाठी परतले होते, असे सांगण्यात आले होते. त्यांच्यावर सुरू असलेले खटलेही संपले होते आणि त्याला लष्कराचा पाठिंबाही मिळाला. एवढे सगळे होऊनही त्यांच्या पक्षाला निवडणुकीत बहुमत मिळू शकले नाही. बहुमतापासून दूर असूनही नवाझ शरीफ यांचा PML-N सरकार स्थापन करणार असल्याचा दावा करत आहे. मात्र ते स्वत: पंतप्रधान होत नाहीत. त्यांनी त्यांचे भाऊ शाहबाज शरीफ यांना पंतप्रधान करण्याचा निर्णय घेतला आहे. नवाझ शरीफ यांना पंतप्रधानपदी पाहायचे आहे, असे शाहबाज यांनी जाहीरपणे सांगितले होते, पण नवाझ यांनी हे पद न घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच्या या निर्णयामागे दोन प्रमुख कारणे आहेत.

पहिले कारण-

नवाझ शरीफ पंतप्रधान न होण्याचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे त्यांचा पक्ष बहुमतापासून दूर आहे. निवडणुकीच्या निकालानंतर त्यांनीही आपल्याला बहुमताची अपेक्षा असल्याचे सांगितले. दुसरीकडे, त्यांनी निकालापूर्वीच आघाडी सरकार न चालवण्याची इच्छा व्यक्त केली होती. निवडणुकीच्या दिवशी मतदान केल्यानंतर त्यांनी पत्रकारांना सांगितले होते की, कठोर निर्णय घेऊन आणि दिलेली आश्वासने पूर्ण करण्याची जबाबदारी घेऊन बहुमत असलेले सरकारच देशाला सध्याच्या संकटातून बाहेर काढू शकते. अशा परिस्थितीत बहुमत न मिळाल्याने त्यांनी पंतप्रधानपदापासून दूर राहण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. PML-Nचे ज्येष्ठ नेते राणा सनाउल्लाह म्हणतात की त्यांच्या पक्षाला नवाझ शरीफ यांना चौथ्यांदा पंतप्रधान म्हणून पाहायचे होते, परंतु आम्हाला स्वबळावर सरकार स्थापन करण्यासाठी संख्याबळ मिळू न शकल्याने त्यांनी माघार घेतली.

दुसरे कारण-

हे सरकार चालवण्यासाठी आम्ही आघाडीचे सूत्रधार शाहबाज शरीफ यांना पुढे केले आहे, असे राणा सनाउल्लाह सांगतात. इम्रान खान यांचे सरकार पडल्यानंतर त्यांनी १६ महिने १३ पक्षांचे युतीचे सरकार यशस्वीपणे चालवले. त्यांचा अनुभव लक्षात घेता शाहबाज शरीफ पंतप्रधान व्हावेत यावर सर्वपक्षीय नेत्यांमध्ये एकमत झाले. ते म्हणाले की नवाझ शरीफ आणि बाकीच्या पक्षाचा विश्वास आहे की शाहबाज आघाडीचे सरकार अधिक प्रभावीपणे हाताळतील. मात्र, पीएमएलएनने नवाझ शरीफ राजकारण सोडल्याचा अंदाज निराधार असल्याचेही ते म्हणाले. पक्षाच्या नेत्यांनी म्हटले आहे की ते पद घेत नसले तरी पुढील पंतप्रधान आणि पंजाबच्या पुढील मुख्यमंत्र्यांना ते मदत करतील. समर्थकांना पक्षाशी जोडण्याचे कामही तेच करणार आहेत.

टॅग्स :Pakistan Electionsपाकिस्तान निवडणूकPakistanपाकिस्तानNawaz Sharifनवाज शरीफprime ministerपंतप्रधानImran Khanइम्रान खान